(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • कुर्नूल

    कुर्नूल हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर असून या शहरात जिल्हा मुख्यालय असल्याने अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत. हैदराबादपासून हे शहर २१२ कि.मी.वर आहे.

  • नांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    दुर्गोत्सवासाठी विदर्भात प्रसिध्द असलेल्या माहुरच्या रेणुका देवीच्या मंदिरात हजारे भाविकांची दररोज गर्दी उसळत आहे. माहूर येथे रेणुका देवीचे ३०० वर्षांपेक्षा जास्त जुने हेमाडपंथी मंदिर आहे, तसेच माहूर गडावर महानुभावपंथी दत्त मंदिर, परशुराम मंदिर व महासती अनुसया मंदिर असल्याने भाविकांची इथे सतत गर्दी असते.

  • महाराष्ट्रातील भद्रावती वरदविनायक

    महाराष्ट्रातील भद्रावती या शहरापासून ३ कि.मी. अंतरावर वरदविनायकाचे पुरातन मंदिर आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी वरद विनायक एक गणपती आहे.

  • बुलढाणा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    अन्नधान्यांपैकी ज्वारी हे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असून तूर, भुईमूग, करडई, गहू, हरभरा, कापूस, मिरची, ऊस आणि केळी ही पिके घेतली जातात.

  • लातूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    लातूर जिल्ह्यात सुमारे ८७६३ कि.मी.लांबीचे रस्ते असून त्यापैकी राज्य मार्गाची लांबी ८४५ कि.मी.आहे. रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ८०% गावे जिल्हा मुख्यालयाशी जोडली गेली आहेत.

  • कोझीकोडे

    कोझीकोडे हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. केरळमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये कोझीकोडेचा तिसरा क्रमांक लागतो. तिरुअनंतपूरमपासून ३८० किलोमीटरवर ते वसलेले आहे.

  • अकोला जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे. या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र अकोला हे आहे. अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात येतो.

  • जालना जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

    समर्थ रामदास स्वामी – श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे काम समर्थांमुळे सोपे झाले आणि या महाराष्ट्राच्या भुवनी आनंदवन उदयास आले.

  • हिंगोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    भारतातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे औंढा- नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे हेमाडपंती मंदिर असून ते द्वादशकोनी व शिल्पसमृद्ध आहे. धर्मराजाने हे मंदिर महाभारतकाळात बांधल्याचं एका आख्यायिकेत म्हटलं आहे.

  • सांगली जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगळुरू या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो. मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.