१२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहनलाल सिन्हा यांनी निवडणुकीतील गैरव्यवहारप्रकरणी राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्यात इंदिरा गांधी यांना दोषी ठरवून त्यांची खासदारकी रद्द केली.
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे, चीन येथे हुमेन या गावी फार मोठ्या प्रमाणात ओपियमची (खसखस) शेती केली जात होती. याच ओपियमच्या फळांचा उपयोग मोठ्या प्रमाणात विविध ड्रग्ज (अंमली पदार्थ) बनविण्यासाठी व्हायचा. याच्या विरोधात लिन झीयू या व्यक्तीने खूप मोठे आंदोलन तेथे उभे करून यशस्वी केले. याच कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्यांच्या सन्मानार्थ २६ जून १९८९ पासून ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ साजरा करण्यात येऊ लागला.
कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन आणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे.
आजकाल सतत एक उपदेश ऐकवला जातो. वैज्ञानिक दृष्ठिकोन बाळगा. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची आत्यंतिक गरज आहे. समाजधुरीण, रातकीय नेते, शिक्षणमहर्षी, एवढंच कशाला पण गल्लीतल्या सत्यनारायणाच्या पूजेला पाहुणा म्हणून बोलावलेला एखादा अभिनेता किंवा असाच पेज थ्रीवरचा सेलिब्रिटीही आपल्याला ते सुनावून जातो.
एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो.
पंधरा एकरांवर असलेल्या या गार्डनमध्ये तुम्हाला असंख्य भारतीय व परदेशी फुले पाहायला मिळतील. मुघल गार्डन आज पासून, म्हणजेच ५ फेब्रुवारीपासून ६ मार्चपर्यंत सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
पुण्याचे भूषण असलेली संगीत क्षेत्रातील एक पूज्य वास्तू " पुणे भारत गायन समाज " आज १०७ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. देवगंधर्व पंडित भास्करबुवा बखले यांनी १ सप्टेंबर १९११ साली स्थापन केलेली हि वास्तू पुढे अनेक दिग्गज कलावंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आणि आजही होत आहे. या संस्थेमार्फत संगीत प्रचार आणि प्रसाराचे काम गेली १०७ वर्ष अविरत पणे चालू आहे.
याच संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयामध्ये गायन,तबला,सतार,हार्मोनियम,व्हीयोलीन,कथ्थक, भरतनाट्यम इत्यादी कलाप्रकारांचे शात्रोक्त पद्धतीनी शिक्षण दिले जाते . यामध्ये मध्यमा,विशारद,पारंगत अशा १० वर्षाचा लिखित अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जाते.
संस्थेच्या अभ्यासक्रमाला १९६२ मध्ये राज्यसरकारने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक संगीत विद्यालये भास्कर संगीत विद्यालयाशी संलग्न आहेत.सौ.शैला दातार या पुणे भारत गायन समाजच्या अध्यक्षा आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ.इंटरनेट
‘जागतिक कडधान्य दिन’ पहिल्यांदा २०१६ मध्ये साजरा करण्यात आला, नंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १० फेब्रुवारी हा जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. तेव्हापासून हा दिवस ‘जागतिक कडधान्य दिन’ म्हणून साजरा केला जातो.
ठरल्याप्रमाणे वर्षभर ही मालिका चालणार होती. त्यानुसार ५२ भाग प्रसारित करण्याचे ठरविले होते. १९५५ सालच्या रामनवमीला सुरू होऊन १९५६ सालच्या रामनवमीपर्यंत गीतरामायण प्रसारित करण्याचे ठरले. त्याप्रमाणे दर शुक्रवारी सकाळी ८.४५ वा. आकाशवाणीवरून लोक गीतरामायण ऐकायचे. हाच भाग शनिवारी व रविवारी पुन्हा त्याचवेळी ऐकविला जायचा. योगायोग असा की, यंदाच्या वर्षाप्रमाणे ५५ सालीही अधिक मास होता. त्यामुळेच ५२ भागांवरून ५६ भाग झाले. अर्थात ५६ गाण्यांची निर्मिती झाली.
दरवर्षी ६ मे हा दिवस जागतिक अॅकॉर्डियन दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर २००९ पासून हा दिवस साजरा केला जातो परंतु भारतात २०११ पासून अॅ्कॉर्डियन दिन साजरा करण्यास सुरवात झाली. पहिला जागतिक अॅकॉर्डियन दिवस हा पहिला अॅकॉर्डियन १८२९ ला बनविला गेला व त्याचे पेटंट ६ मे १८२९ रोजी व्हिएन्ना येथे ख्रिस्तीफर डिमेनी यांनी घेतले, या गोष्टीला १८० वर्षे झाली म्हणून ६ मे २००९ पासून जागतिक अॅकॉर्डियन दिवस साजरा करण्यास सुरवात झाली.
भारतात बॉलीवूडमध्ये केसी लॉर्ड इनॉक डॅनियल्स ही नावे अॅकॉर्डियन मध्ये अग्रगण्य मानले जातात. केसी लॉर्ड यांची अॅकॉर्डियन वाजवण्याची एक विशिष्ट शैली होती आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या अॅकॉर्डियन वादनाचा अंतर्भाव आहे. रुप तेरा मस्ताना आणि शर्मिली सारख्या अजरामर गीतांमधील अॅकॉर्डियन वादन त्यांनी स्वत: केले होते. ‘आराधना’तल्या ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्यातले धुंद वातावरण क्षणात् उभे करणारा सुरुवातीचा तो थरारून टाकणारा अॅाकॉर्डियन या वाद्याचा पीस आणि नंतर अॅ कॉर्डियन आणि सॅक्सेफोन यांची जुगलबंदी सुरू असावी असे वाटणारे एकाहून एक सरस पीसेस, ‘है अपना दिल’ आणि ‘आईये मेहरबाँ’ गाण्यांतले ठेका धरायला लावणारे चायनीज टेंपल ब्लॉक्स, ‘तस्वीर तेरी दिल में’, ‘मुझे दुनियावालों शराबी न समझो’ अशा शेकडो गाण्यांमध्ये अॅाकॉर्डियनच्या बेलोजचा परिणामकारक वापर करून घेतला होता. तसेच मा.इनॉक डॅनियल्स हे सुद्धा भारतीय चित्रपट संगीतातील एक महान अॅकॉर्डियन वादक. त्यांचा टेक दोन-तीन तासांतच ओके होत असे.
व्हायोलिनचा चाळीस वादकांचा ताफा त्यांच्याकडे होता. जयकिशन बॅकग्राऊंड म्युझिकचा सम्राट होता.. सलील चौधरी स्वत: संयोजक, पियानोवादक असूनही इनॉक डॅनियल्स यांना सन्मानपूर्वक बोलावत. त्यांना पाश्चात्त्य संगीताची फार चांगली समज होती. सर्व सिंफनी त्यांच्या आवडत्या होत्या. ‘छाया’च्या ‘इतना ना मुझसे तू प्यार’मध्ये त्यांनी मोझार्टच्या सिंफनीचे स्वर घेतले आहेत. त्यांच्या रचना पूर्ण मेलडीवर असल्या तरी हार्मनीकडे त्यांचा कल होता. त्यामुळे त्यांच्या रचना हार्मनी-ओरिएंटेड आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्वही उदात्त होते. रेडिओ सिलोनवर ‘साज और आवाज’ या सात ते सव्वासातच्या सुमारास सकाळी कित्येक वर्षे मा.इनॉक डॅनियल्स यांच्या अॅनकॉर्डियनवर वाजविलेल्या रचना वाजवल्या जातात. बॉलीवूड मध्ये गुडी सिरवाई, मा.धीरजकुमार,मा. सुमित मिश्रा यांसारखे अॅजकॉर्डियन वादक होऊन गेले. याशिवाय शंकर जयकिशन, एस.डी.बर्मन, वसंत देसाई, सी.रामचंद्र यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या अनारी, श्री ४२०, काला पानी, छाया, प्रेम पत्र, चोरी चोरी या चित्रपटांतील गीतात अॅकॉर्डियनचा प्रभावी पणे वापरला गेला होता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti