(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • श्री शिल्लक

    तिला कळत नव्हतं ,त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय . कालपासून त्यांचं वागणं काहीसं अनाकलनीय वाटत होतं . पंचेचाळीस वर्षांच्या सहजीवनाचा इतिहास ती कालपासून धुंडाळत होती . थोडंसं काही हाती लागत
    होतं , काही हातातून निसटून जात होतं . पण कालपासूनच्या वागण्याचा बोध तिला होत नव्हता .

  • मोबाईलचा पहिला काॅल

    दूरसंचार क्षेत्राच्या इतिहासातील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा! त्या पहिल्या मोबाईलचे नाव होतं ‘डायनाटेक’. एक किलोहून त्याचं वजन जरा जास्तच होतं. त्याची लांबी १३ सें.मी. व रुंदी ५ सें.मी. होती. तो चार्ज होण्यासाठी तब्बल दहा तास लागायचे. पूर्ण चार्ज झाल्यावर तो फक्त अर्धा तास वापरता यायचा.

  • गुन्हा कुणाचां? शिक्षा कुणा?

    सकाळी उठलो, दरवाजा उघडून नेहमी प्रमाणे वर्तमानपत्र हातात घेतलं, इंग्रजी वर्तमान पत्रातील एका बातमीवर माझी नजर गेली. बातमीला जे टायटल दिलं होतं, ते वाचलं. बातमी वाचण्या अगोदरच अंगावर रोमांच उभा राहिला.

    मी पोलीस खात्यात नोकरी करणारा अधिकारी असल्याने वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्या किंवा त्यामध्ये येणाऱ्या घटना माझ्यासाठी नवीन नव्हत्या किंवा त्याचं नाविन्य असं काही नव्हतं.

    पण तरीही प्रत्येक माणसांमध्ये माणुसकीचा, प्रेमाचा एक कप्पा असतो. तसा माझ्यातला जागा झाला. बातमीच तशी होती. इंग्रजी टायटल होतं. Convicted and Punishment दोन्हीही शब्दांचा अर्थ पाहिला तर पहिला शब्द Convicted म्हणजे शाबीत म्हणजे न्यायालयात एखाद्या अपराध्याचा अपराध सिध्द होतो. त्याला दोषसिध्दी म्हणतात.

  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २२)

    खरे तर पुणे माझे जन्मस्थान (आजोळ) पण सातारा माझी कर्मभूमी. या दोन्हीही स्थळांची मला प्रचंड ओढ. माझी सारी जडणघडण सातारच्या मातीत झाली. पण पुढे वडिलोपार्जित व्यवसाय सातारला असून देखील पुणे, मुंबई येथे सुरू केला. १९८४ पुण्यात स्थिरावलो.

  • हौस – Part 2

    घरी आल्यावर बायकोने कपाळावर हात मारला! “अहो, या दोन किलो जिलब्या मी काय माझ्या डोक्यावर थापून घेऊ का? जा, जा, परत करा त्या मी दोनशे ग्रॅम सांगितल्या तर दोन किलो घेऊन आलात? खाणारे आपण तिघं त्यात मला डायबेटीस. तुम्ही एखादा तुकडा खाणार, मग याचं काय करायचं?’

  • नाती ‘रस’वंती

    नाती असावीत देवाला दाखविलेल्या नैवेद्याच्या पानासारखी. नैवेद्याच्या पानात वेगळं मीठ वाढलेलं नसतं कारण प्रत्येक पदार्थ करताना ते वापरलेलं असतंच. हे चवीपुरतं मीठ असावंच लागतं.. काही नाती या मीठासारखीच जीवनाला चवदार बनवतात..

  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ८

    त्या दिवशी रिसेप्शन वरून परतायला उशीर होईल म्हणून ते गाडीवरूनच गेले होते. येताना त्यांच्या अंदाजापेक्षा जरा जास्तच उशीर झाला. रात्री घरी उशिरा पोहोचलो तर झोपायला उशीर होईल आणि सकाळी उठायला उशीर झाला तर कामावर जायला उशीर होतील या विचाराने रात्रीचे ११ वाजलेले असताना देखील त्यांनी या रस्त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला.

  • स्वामी विवेकानंद- भाग ३

    स्वामी विवेकानंदानी सर्वधर्मपरिषदेला हजर रहावं आणि त्या परिषदेत धर्माबद्दल एक नवाच विचार मांडावा, ही नियतीचीच इच्छा असावी. स्वामीजींचे समर्थक, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणारे राजे, त्यांचे शिष्य कोणालाही परिषदेच्या तारखा जाणून घ्याव्या हे सुचलं नव्हतं.

  • लोअर वरळी

    गिरणगांव बचाव म्हणून बुध्दिवंतांची एक बैठक झाली, त्याला कवी-लेखक-शाहीर सगळे हजर होते. एक गाव लाटेखाली बुडायच्या मार्गावर आहे, त्याला वाचवायच म्हणजे काय करायच, हाच खरा प्रश्न आहे. तस हे गाव संपाच्या ओझ्याखाली केव्हाच मोडून गेलय.

  • ठाकूर मॅडम

    बाबांची वर्धा पोलीस स्टेशन वरून मनमाड पोलीस स्टेशनला बदली झाल्यावर आम्ही कल्याणजवळच्या आमच्या गावातून मनमाडला राहायला गेलो. बाबा पोलीस अधिकारी असूनसुद्धा मला पहिलीला गावातल्याच मराठी आणि त्यातल्या त्यात झेड पी च्या शाळेत घातले होते.