नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

आजपर्यंत मी ज्येष्ठवृंद साहित्यिक गुरुवर्य आनंद यादव , अशोक कामत , दवी.केसकर , दभी कुलकर्णी , प्राचार्य बलवंत देशमुख, गुरुवर्य शांताबाईं शेळके , यशवंतजी देव , नंदूजी होनफ अशा काही व्यक्तिन्चे अनुभव कथन केले ..जीवनात साहित्य क्षेत्रात ज्यांचे मोलाचे मार्गदर्शक योगदान लाभले अशा अनेक व्यक्तिबद्दल खरे तर खुप लिहायचे आहे..

आजच्या कॅालेजियन्सचा ट्रेंडच आगळा
त्यांचं कॅालेज जीवन म्हणजे,
एक अजब सोहळा
फ्रेंडशिप डे, ट्रेडिशनल डे, रोझ डे,
उरलाच वेळ तर स्टडी डे
कॉलेजात निवडणूकांचे, वाजवीपेक्षा प्रस्थ,
युवामहोत्सव, नाटयमहोत्सव,
घरच्या कार्यापेक्षा जास्त
बापाच्या पॉकेटमनीवर खर्चाची मदार,
पोरींना घेऊन पोरं बाईकवर स्वार
SMS चा चाळा, फॅशनचा लळा,
हेच ह्यांचं रुटीन
अड्डयासाठी कॉलेजचा कट्टा आणि कॅटीन
नावापुरता असतो ह्यांचा, वर्गामध्ये अॅटेंडन्स,
क्लासेसच्या जीवावर, टक्क्यांचा कॉन्फीडन्स
कॉलेजचे प्रोफेसर्स तर
ह्यांच्या जणू खिशात,
धाक आणि आदर,
शब्दच नाहीत कोषात
अश्शी आजची कॉलेजची, तर्हाच आगळी,
वरच्या पिढीला
ती नेहमीच वाटणार वेगळी
नेहमीच वाटणार वेगळी
-- सौ. अलका वढावकर
विजय कोठेही असला तरी त्याचे डोळे आणि कान सताड उघडे असतात. लोकांच्यात होणारे संभाषण हे तर त्याच्या कविता, कथा आणि लेखांचे खाद्य असते. लेखक ,कवी असो अथवा पत्रकार त्यांना सतत लोकांच्या भाव – भावनांचा विचार करत राहावे लागते. काही दिवसापूर्वी विजय बसने प्रवास करत होता. प्रवासात दोन स्त्रियांचा संवाद त्याच्या कानावर पडत होता… बायका तश्या बऱ्यापैकी सुशिक्षित दिसत होत्या म्हणजे त्यांच्या बोलण्यात येणाऱ्या सततच्या इंग्रजी शब्दावरून ते लक्षात येत होते. त्या बायका कमीत कमी दहावी – बारावी पर्यत नक्कीच शिकलेल्या असाव्यात. त्यातील एक तर इतकी व्यवस्थित होती कि ती नक्कीच कोणत्यातरी कार्यालयात कामाला असावी अशी वाटावी.

इथला निसर्ग चारी बाजूने पोखरला जात आहे आणि भयभीत जनावरांची कोंडी झाली आहे. चारी बाजूनी माती आणि दगडांच्या शोधातील मंडळी ट्रक लावून लूट करत आहेत. किंचित आत झुडपात हात भट्टयांची मालिकाच तयार झाली आहे. त्याबरोबरच हौशी शिकारी मंडळीनीही हैदोस मांडला आहे.
काळाप्रमाणे शिक्षण पद्धतीत, क्लासच्या संकल्पनेत बदल होत गेले. मुलांना शिकावं तर लागणारच आहे. नवीन पिढी शिक्षणामध्ये होणाऱ्या बदलांशी जुळवून घेते आहे.
वर्षामागून वर्षे गेली. मीराताईचा लेख लिहितांना त्यांची अगदी जवळची मैत्रीण म्हणून मला शशिकलाताई आठवत होत्या. मीराताईच्या तोंडून कित्येकदा त्यांचा उल्लेख होत असे. दोघींची कित्येक वर्षांत भेट झालीच नाही.

मनातील वादळे तिथल्या तिथे शमविण्याचा प्रयत्न करणे, माझ्य मते न्याय्य होणार नाही. या वादळांना वाट मोकळी करून दिल्यास दिलासा मिळेल, अशी आशा वाटते. परवा नौशाद अली आमच्यातून गेले अन काय लिहू काय नाही असे वाटायला लागले. `न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहाँ जाते? अगर दुनिया चमन होती तो विराने कहाँ जाते?’ असे म्हणून मनाची समजूत घालावी, की `सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगी?’ असे म्हणत स्मृतींना उजाळा द्यावा? जन्नतमध्ये नौशादसाहेबांची मैफील शकील बदायुनी, शैलेंद्र, मदन मोहन, रफी यांच्यासोबत रंगेल का? अनेक वेड्या प्रश्नांनी भंडावून सोडणारे मन! बहिणाबाईंनी म्हटलेच आहे, `मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला परी येत पिकावर!’ माणसाचे आयुष्य फारतर पाचपन्नास वर्षांचे.

बंड्या! काहीसा अबोल, फारसा कोणात न मिसळणारा असा एक साधा भोळा, सामान्य मुलगा … तो तसा व्हायला कारणं देखील होती तशीच. दोन खोल्यांचं घर . कुटुंबं तसं खाऊन पिऊन सुखी असलं तरी परिस्थिती साधारण होती. बंड्याचा भाऊ त्याच्यापेक्षा जेमतेम अडीच वर्षांनी मोठा. त्यामुळे स्वाभाविकपणे लहानपणी बंड्याला दुपटी , टोपडी , खेळणी हे सगळं मोठ्या भावाचंच मिळालं.

फार वर्षांपूर्वी नायर हॉस्पिटलच्या मागे “लाल चिमणी कंपाऊंड ” मधे असलेल्या मोकळ्या जागेत एका गोडाऊन शेजारी युनुसभाईंचे गॅरेज होते. गोडाऊन च्या भिंतीला बसवलेले लोखंडी स्टँड, त्यावर गाड्यांचे छोटे सुटे भाग , हातोड्या , पान्यांचे खोके आणि गॅरेजचे इतर सामान लावलेले.

दार उघडले आणि थंड गार वाऱ्याचा झोत अंगावर आला. शहारून गेलो, केस ताठरले. माझ्यासाठी दार उघडून, कांही तरी पुटपुटत, मोकळे केस सोडलेली, आई देवघराकड़े जात होती.
Copyright © 2025 | Marathisrushti