(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • पुलाखालची माणसं (कथा)

    ही पुलाखालची माणसं मुंबईच भयावह चित्रण आहेत. कुठेतरी वाळवी लागली आहे. बाकी सर्व प्रश्न सुटू शकतात पण एकदा लागलेली ही वाळवी शहर आतून-बाहेरून पोखरून काढणार. वर्षा-दोन वर्षापूर्वी पुलाखाली माणसं नव्हती. आता कुठल्याही पुलाखाली जाऊन पाहा. नशेत बुडालेल्या केविलवाण्या चेहऱ्यांची ही कळकट-मळकट मंडळी जनावराच्या नजरेन तुमच्याकडे पाहतील.

  • एक परीस स्पर्श ( भाग – ५७)

    विजयच्या घराची बेल वाजल्यावर विजयने दरवाजा उघडला तर दरवाज्यात त्याच्या इमारतीतील काही तरुण गणपतीची वर्गणी गोळा करायला आले होते. विजयने सुरुवातील १०० रुपये वर्गणी दिली पण आम्ही सर्वांकडून १५१ रुपये वर्गणी घेत आहोत म्हटल्यावर विजयने आणखी ५१ रुपये वर्गणी दिली. वर्गणी देताना विजयला मनस्ताप वगैरे होत नाही. पण बऱ्याच लोकांना त्याचा त्रास होत असावा असे विजयला प्रामाणिकपणे वाटते.त्यामुळेच विजय कोणालाही वर्गणी देताना कमीत कमीच देतो कारण एका वर्षी आपल्याला जास्त वर्गणी द्यायला परवडत असेल तरी ती द्यायला प्रत्येक वर्षी आपल्याला परवडेलच असे नाही ना ? माणसाने धार्मिक कार्यात सहभाग नोंदवायलाच हवा !

  • अंबाक्का

    या चित्रपटाचं यश जातं, पटकथा-संवाद लिहिणाऱ्या अण्णा देऊळगावकरांना.. कथानक जरी उत्तम असलं तरी ते चुरचुरीत संवादांनी फुलवणं, हे काम अण्णांनी लीलया केलं. प्रेमा किरणचा हा पहिलाच चित्रपट होता.. तिला त्यांनी ‘अंबाक्का’ हे टिपिकल गावठी नाव दिलं.. तिच्या पहिल्याच एंट्रीला ‘काॅटन स्मिता’ असा लक्ष्याच्या तोंडी संवाद दिला.. सिल्क स्मिता ही दक्षिणेकडील हाॅट नायिका होती, ही महाराष्ट्रातील.. म्हणून ‘काॅटन स्मिता’! पहिल्याच चित्रपटात तिची व लक्ष्याची केमिस्ट्री जुळली व नंतर दोघांनी अनेक चित्रपटांतून धमाल कारकिर्द केली..

  • वटपौर्णिमा (कथा)

    मीरग संपत आलता. आभाळ ठणठण व्हतं.ढग कुठ बियाल पण दिसत नव्हते.निराशेनं कौतीका वसरीत दुचित बसला व्हता. मनात घालमेलं चालली व्हती.काय कराव ते त्यालं काय बी सुदरयनं गेलतं.बसल्या जागुन उठायलं आवसन व्हत नवतं.त्यालं आस वाटु लागलं की आभाळानं ढगायबरोबरच आपलं आवसन बी पळवलय की काय.अन्नाचा घास गोड लागयन गेलता.मंग जरा चहान तरी बर वाटल मनुन कस बस वसरीतुन उठत त्यानं नेमकच पाणी शेंदुन आलेल्या बायकोल,ईमलीलं चहा कर आसं मनलं.तस वस्काळतच ईमली त्यालं मनली,“घरात गुळ ,साकर्‍या,पत्ती कशाचाच पत्त्या नाय….सगळे डब्बे तुमच्यासारखेच ठणठण गोपाळ झालेतं.आज वडपौर्णिमेचा सन हे.जरा दुकानावर जाऊन किराणा माल आणा.काय बाई किती वढाव एकटीन संसार. या माणसाचं बिलकुल जरासं सुद्धा घरात लक्ष नाही.मी आहे म्हणून टिकली या घरात….दुसरी कोणी टिकली नसती. काय पाहून बापानं मलं या घरी दिलं काय माहीत.कोण्या जन्माचा सुड काढला बापाणं काय ठाऊक माय…. ये पोर्‍हयवो काय हुडदंग माजवलाय रे….ईकडं या .ईथ बसा मह्यापुढं अभ्यासालं.”

  • वेबसिरीज : एक रेसिपी 

    वैधानिक इशारा : या रेसिपीमुळं कुणाचं मनःस्वास्थ्य बिघडलं , घरात भांडणं होऊ लागली , लहान पिढी आणि तारुण्यातली पिढी वाया जाऊ लागली , संस्कृती नष्ट होऊ लागली , शिक्षणावर कुणी पाणी सोडलं , समाजात अनाचार , अत्याचार होऊ लागला , सगळ्या प्रकारचं प्रदूषण होऊ लागलं तर त्याला लेखक जबाबदार नाही !

  • टपरी नेहमीचीच ठरलेली..

    आम्ही कुठेही मोट्या हॉटेलमध्ये खाल्ले तरीपण चहा प्यायला टपरीवर जायचो. ठाण्याच्या गडकरीमध्ये चहा प्यायला जायचो परंतु एका चहासाठी ३० -३२ रुपये टू मच ..वाटत असे, म्हणून जवळच्या टपरीवर सात रुपये कटींग बेस्ट..

  • उकळता प्रयोग

    काल हस्तकलेचा तास होता. वर्गातल्या मुलांनी रंगीबेरंगी जाड कार्डशीटचे कागद आणले होते. मुले म्हणाली आज आम्ही या कागदाचा ट्रे करणार आहोत. तर काही मुले म्हणाली आम्ही कागदाचं छोटसं भांडं करणार आहोत. इतक्यात सिमरन म्हणाली, “या कागदातून तुमच्यासाठी काय करू?” आता बाकीची मुलेपण चिवचिवू लागली. “सर्वांनी मिळून माझ्यासाठी, काडेपेटीच्या आकारापेक्षा थोडसं मोठं असं कागदाचं भांडं तयार करा. पण लक्षात ठेवा हे भांडं करताना कुठेही गोंद वापरायचा नाही. कागदाच्या घड्या घट्ट घालायच्या आणि गोंदाऐवजी दोन पेपरक्लीप वापरायच्या. असं म्हणताच मुले म्हणाली, ‘नक्की!’ पण तरीही हात उंचावत रोहन म्हणाला, “पण गोंद वापरला तर काय होईल?” या प्रश्नावर वर्गात शांतता पसरली.

  • देवा, ह्याही देशात पाऊस पाड

    ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ ही प्रतिज्ञा आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो, परंतु आज या देशाचे खरेखुरे चित्र कसे आहे? वास्तवरूप कसे आहे, हे डोळसपणे पाहू लागलो तर आपल्याला वेगळेच दर्शन घडते. आपल्या देशात अनेकदा जातीय दंगली माजतात, एकमेकांच्या धर्माचा अपमान करून सामान्य जनतेला चिथावणी दिली जाते. अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्टाचार अशा गोष्टींना उत्तेजन दिले जाते. पुढारी लोक खोटे मुखवटे धारण करून समाजसेवेचा आभास निर्माण करतात. प्रत्यक्षात मात्र स्वत:चे आणि नातेवाइकांचे हित करून घेतात. स्वतःच्या अधिकारपदाचा वापर करून घेऊन जवळच्या लोकांना मोठमोठी पदे, नोकऱ्या मिळवून देताना इतर बुद्धिमान, आणि वशिलेबाजीचा वापर न करणाऱ्या तरुण वर्गावर अन्याय करतात. अशा परिस्थितीमुळे देशाची विभागणी सरळसरळ दोन वर्गांत होते. एक अत्यंत धनिक वर्ग, जो गरिबांचे शोषण करून स्वतः श्रीमंत होत राहतो आणि दुसरा अत्यंत गरीब, अन्याय निमूटपणे सहन करणारा शोषित वर्ग. अशा प्रकारे शोषक आणि शोषित अशी विभागणी या देशात शतकानुशतके चालत आली आहे. एका बाजूला वैभव मिरवणाऱ्या उत्तुंग इमारती आणि दुसऱ्या बाजूला दारिद्र्याने खचलेली झोपडपट्टी असे दृश्य भारतातील प्रत्येक शहरात दिसते.

  • जोडवी – भाग ३

    संध्याकाळी यामिनी ऑफिसमधून लवकर घरी आली तेंव्हा विजय घरी आलेला नव्हताच ! यामिनी घरी आल्या आल्या फ्रेश होऊन हॉलमध्ये टी.व्ही. पाहत बसलेली असताना दारावरची बेल वाचली चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेऊन ती दरवाजा उघडायला उठली , दरवाज्यात प्रतिभा उभी होती तिला आत घेताच...
    प्रतिभा : मॅडम आज लवकर आलात का ?
    यामिनी : हो ! आज जरा लवकर सुटका झाली ! प्रतिभा ! मी चहा बनविला आहे तो तू घे ! आणि कामाला सुरुवात कर !
    प्रतिभा : ठीक आहे मॅडम !
    यामिनी : बर ! आज रात्रीसाठी पनीरची भाजी कर ! मी पनीर आणून ठेवलाय फ्रिजमध्ये ! यापूढे काही आणायचे असेल तर तूच येताना घेऊन येत जा... मी पैसे देऊन ठेवत जाईन तुला, मी विसरले तर साहेबांकडून घेत जा..
    प्रतिभा : ठीक आहे ...
    म्हणत प्रतिभा स्वयंपाक घरात निघून जाते... यामिनी तेथेच पुन्हां टी. व्ही. पाहण्यात गुंग होते, यामिनी इतकी शिकलेली तरी तिला सास - बहूच्या सीरिअल खूप आवडत असतात... कामाच्या व्यापामुळे तिला फार टी.व्ही. पाहायला मिळत नाही पण जेंव्हा कधी वेळ मिळतो तेंव्हा ती टी.व्ही. पाहते. इतक्यात पुन्हा दारावरची बेल वाजते यामिनी दरवाजा उघडते तर दरवाज्यात विजय उभा असतो ! तो आत येताच सोफ्यावर बसतो आणि...
    विजय : प्रतिभा माझ्यासाठी जरा चहा घेऊन येतेस का ?
    प्रतिभा : स्वयंपाकघरातूनच हो ! हो ! आले
    विजय : यामिनी ! तू आज लवकर घरी आलीस ?
    यामिनी : का ! मी लवकर आले याच तुला वाईट वाटते आहे का ?
    विजय : मला का वाईट वाटेल ?
    यामिनी :वाटणारच ना ! कारण मी लवकर आले कि तुला तुझी आवडती मालिका पाहायला मिळणार नाही ना ! मालिका कसल्या पाहतोस ! त्यातील नायिका पाहत असतोस डोळे फाडून...
    विजय : विनोदाने .. हे बाकी बरोबर बोललीस, " या मालिकेतील अभिनेत्रींनसमोर मला चित्रपटातील अभिनेत्री फिक्या वाटतात.. त्यात प्रत्येक नवीन मालिकेत नवीन अभिनेत्री येतच असते एकीच्या प्रेमात पडतो न पडतो तो दुसरी हजर ! त्यात व्हिलनच काम करणाऱ्या अभिनेत्री तर नायिकेपेक्षाही दिसायला सुंदर असतात..
    यामिनी : बस ! आता त्याच्या सौंदर्याची स्तुती, मला सांग तू कोठे गेला होतास ?
    विजय : मी ना ! बाहेर जरा पाय मोकळे करायला गेलो होतो... ढेरी थोडी कमी करावी म्हणतो...
    यामिनी : ती आता कमी करून कोठे जायचंय ?
    विजय : कोठे जयला कशाला पाहिजे ! पण वजन नियंत्रात ठेवलेले उत्तम , तुला सांगतो मी लहान असताना मला सर्वजण सुकड्या म्हणायचे, तेंव्हा त्याचा मला खूप राग यायचा पण आता लोक सुकड्याना सुकड्या नाही तर झिरो फिगर म्हणतात... आता मी झिरो फिगर राहिलो नाही याचे वाईट वाटते... पूर्वी कसा मी दहा फुटावरूनही उडी मारायचो पण आता चार फुटावरूनही मारता येणार नाही...
    प्रतिभा : इतक्यात चहा नाश्ता घेऊन येते दोघांसाठीही... घ्या साहेब - मॅडम चहा आणि नाश्ता, नाश्त्यात कांदे - पोहे केले आहेत.
    विजय : थँक यु ! प्रतिभा ! खरंच मला खूप भूक लागली होती..
    यामिनी : पोहे खाता खाता .. विजय ह्या प्रतिभाला काहीच सांगावे लागत नाही, ती सारे अगदी घरच्या माणसांसाठी करतात तसेच करते...
    विजय : आपल्यालाही ती घरच्यांसारखीच आहे... पोहे छान केले आहेत हा !
    यामिनी : बरं ! हा घे रिमोट आणि तू तुझ्या नायिका बघत बस ! मी आत जाऊन प्रतिभाला स्वयंपाकात थोडी मदत करते.. आज लवकर आले आहे तर..
    यामिनी प्रतिभाला मदत करायला स्वयंपाक घरात निघून जाते विजय तेथेच सोफ्यावर बसून चॅनेल बदलत राहतो.... त्याला एक चॅनेल दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ पाहवत नाही ! तिकडे स्वयंपाक घरात... यामिनी प्रतिभाला स्वयंपाकात मदत असते.. स्वयंपाक करता करता जश्या कोणत्याही दोन बायकांच्या गप्पा रंगतात तश्या त्यांच्याही गप्पा रंगलया...
    यामिनी : प्रतिभा ! तू मूळची कुठली ?
    प्रतिभा : मी लहानाची मोठी रायगडला झाले
    यामिनी : मग ! तू रायगड किल्ला पाहिलास कि नाही ?
    प्रतिभा : नाही पहिला मॅडम !
    यामिनी : रायगडला राहून तू रायगड किल्ला पाहिला नाहीस ! अगं ! मी रायगडावर चार पाच वेळा गेले आहे ... तुझ्या गावच्या घरापासून किती वेळ लागेल रायगडावर जायला ?
    प्रतिभा : एकदा तास लागत असेल..
    यामिनी : आपण काढू एकदा पिकनिक रायगडावर ! आता मी घेऊन जाईन तुला...
    यामिनी : बरं तुझ्या घरी कोण कोण असतं ?
    प्रतिभा : मी , माझ्या नवरा आणि दोन मुलं, मोठी मुलगी आणि छोटा मुलगा, मोठी मुलगी आता तिसरीला आहे आणि मुलगा पहिलीला...माझं लग्न लवकर झालं ना !
    यामिनी : तुझा नवरा काय काम करतो ?
    प्रतिभा : आहे एका कंपनीत कामाला...
    यामिनी : बाकीचे नातेवाईक ?
    प्रतिभा : सासू सासरे असतात गावाला , दोन दीर आहेत त्याची लग्ने झालेली आहेत ते पाहतात त्याचं त्यांचं !
    यामिनी : तुमचं घर स्वतःच आहे ना ?
    प्रतिभा : नशीब छोटस का होईना आमचं घर स्वतःच आहे नाहीतर या वाढत्या महागाईत मुंबईत राहणं मुश्किल झालं असत.
    मॅडम तुमचं आणि साहेबांचं लग्न कधी झालं ?
    यामिनी : आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली ...
    प्रतिभा : मग ! अजून मुलबाळ का झालं नाही ?
    यामिनी : ते आम्हालाच नको !
    प्रतिभा : का ?
    यामिनी : आहेत आमची आमची काही करणे , सांगेन नंतर कधी तरी तुला सविस्तर... बरं ! तू विजयला कशी काय ओळखतेस ?
    प्रतिभा : साहेब पूर्वी ज्या चाळीत राहायचे त्या बाजूच्या चाळीत साहेबांचा मित्र राहतो, तो माझ्या मावशीचा मुलगा ! मी मुंबईला घर काम करू लागल्यावर सुट्टीत त्याच्या घरी जायचे ! साहेब माझ्या मावस भावाला भेटायला यायचे अधून मधून तेंव्हाच आमची ओळख झाली होती.
    यामिनी : विजयच्या जवळ - जवळ सर्व मित्रांना मी ओळखते काय नाव काय त्या मित्राचे ...
    प्रतिभा : अजय !
    यामिनी : तू अजय भावोजींची ! मावस बहीण आहेस म्हणजे आमच्या घरातीलच आहेस कि ! अजय भावोजी खूप हुशार आहेत हा ! ते येतात वर्षातून एक दोनदा विजयला भेटायला आमच्या घरी... मी आणि विजय गेलो आहोत त्याच्या नव्या घरात...तुझी वाहिनीही माझी छान मैत्रीण आहे ... आमच्यात होत असतात गप्पा अधून मधून...
    प्रतिभा : आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला शिकता आले नाही ... त्याचा आज पश्चाताप होतोय ! मी ही शिकलेले असते तर आज मी स्वतःच्या पायावर उभी असते !
    यामिनी : तू फार शिकली नाहीस म्हणून काय झाले ? तू आजही स्वतःच्याच पायावर उभी आहेस ! तू जे काम करतेस ते काही हलके काम नाही ! ते तर सर्वच बायकांना कधी ना कधी करावेच लागते ! पण तुमचे विशेष कौतुक करायला हवे कारण तुम्ही तुमच्या घरातील कामे करून आमच्या घरातील कामे करता . जर तुम्ही आमच्या घरातील कामे केली नाहीत तर आम्हाला बाहेरच्या जगात कर्तृत्व गाजवता येणार नाही ! विजय ! मला म्हणाला कि तू त्याच्या ओळखीची आहेस पण तो मला हे म्हणाला नाही कि तू अजय भावोजींची बहीण आहेस ! प्रतिभा ! तू यापुढे मला मॅडम नको म्हणू ! तू मला ताईच म्हणत जा !
    प्रतिभा : बरं ताई ! ... ती गालात गॉड हसली ..
    यामिनी : बरं ! आता तुझं आवरलं कि तू घरी जा ! आणि मला जरा चहा गरम करून दे ! साहेबांना घेऊन जाते... साहेबांना एक वेळ जेवायला नसेल तरी चालेल पण सारखा चहा लागतो.

    यामिनी चहाचा कप घेऊन बाहेर हॉलमध्ये आली आणि तो चहाचा कप विजयच्या हातात देत ..

    यामिनी : तू मला सांगितले नाहीस कि प्रतिभा अजय भावोजींची मावस बहीण आहे म्हणून ?

    विजय : सॉरी ! सॉरी !! तुला सांगेन सांगेन म्हणालो आणि विसरून गेलो, म्हणूनच तुला मी म्हणालो होतो ,'' ती आपल्या घरातल्या सारखीच आहे..

    यामिनी : मला एक मोलकरीण हवी होती पण प्रतिभाच्या रूपात बहीणच मिळाली...

    प्रतिभा : बाहेर येऊन ! ताई सर्व कामे झाली आहेत , मी आता निघते ! उद्या सकाळी येते...

    यामिनी : चालेल ! तू ये आता, जरा उशिरा आलीस तरी चालेल ! तसाही मी काही ऑफिसमध्ये डबा वगैरे घेऊन जात नाही ..

    प्रतिभा : बरं !

    प्रतिभा निघून गेल्यावर यामिनी सोफयावर विजयच्या बाजूला बसते आणि ...

    यामिनी : विजय ! प्रतिभा मला विचारत होती कि तुमच्या लग्नाला पाच वर्षे झाली तरी मुलबाळ का नाही ?

    विजय : तू काही सांगितले नाहीस ना ?

    यामिनी : नाही ! मी काहीही सांगितले नाही...

    विजय : सांगूंही नकोस ! तिला ते पचणार नाही...

    यामिनी : हा मुलाबाळांचा प्रश्न हल्ली मला आपल्या बाबतीत जवळ जवळ सर्वांच्याच नजरेत दिसतो...

    विजय : पण या सगळ्या गोष्टी आपण गृहीत धरूनच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता ना ?

    यामिनी : विजय तू बोलतोस ते बरोबर आहे ! पण हे असे प्रश्न पुरुषांना नाही तर फक्त स्त्रियांना विचारले जातात !

    विजय : त्याची मला कल्पना आहे... या विषयावर आपण नंतर चर्चा करू !

    यामिनी : बर ! मी जरा आत जाऊन पडते... जेवणाची वेळ झाली की मला हाक मार ... मग आपण जेवायला बसू ..
    विजय : बरं बाई ...

    -- निलेश बामणे

  • मालिका मल्लिका (कथा)

    दैनिक ‘रोजची पहाट’चे संपादक सूर्याजीराव रविसांडे अत्यंत अस्वस्थ होते. त्यांचे प्रमुख वार्ताहर काका सरधोपट दिवाळीची सुट्टी घेऊन जे गायब झाले होते ते अजूनही उगवलेले नव्हते. रोजची पहाट होत होती, पण काका नसल्यामुळे दूरदर्शन मालिकांवर विशेषांक काढायचे काम रखडलेल होते. प्रसिद्ध ‘दूरदर्शन मालिका’ लेखिका ज्यांना ‘मालिका मल्लिका’ म्हणत त्या कादंबरीबाई गुंडाळे यांची मुलाखत घ्यायचे काम काकांना दिले होते. पण ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ तसे हे भरवशाचे काका, सूर्याजीरावांच्या काळजाचा ठोका चुकवित होते. त्यामुळेच ते बेचैन होते, तेवढ्यात काका आले.