(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • ध्यानी, मनी ते स्वप्नी.

    माणसाला स्वप्ने पडत असल्याची नोंद ५००० वर्षांची तरी आहे. आधीही पडत होतीच असतील. जंगलात रहाणाऱ्या माणसालाही स्वप्ने पडत होतीच असतील की. कारण स्वप्न माणसाला आपोआप पडतात. कांही करावचं लागत नाही. अर्थात किमान झोपावं लागतेच म्हणा. तर ह्या आपोआप पडणाऱ्या स्वप्नांना तो आदिमानव कसा सामोरा गेला असेल ? घाबरला असेल ? त्याची स्वप्ने कशी असतील ?

  • काकड आरती

    रामदास काकांनं लाऊड स्पीकरात हळी देली आण मंग मलं लय आनंद झाला. तसं पाह्यलं तं काकड आरतीचा काकडा आण परसाद याच्यासाठी गावातल्या बऱ्याच जणायची चढावढं लागायची, म्या बी मांघल्ल्या पाच-सात दिसापसनं परयत्नात व्हतो. आखरच्यान आज कुठं मव्हा नंबर लागला व्हता. मव्ह नाव पहाटं पहाटं लावूड स्पीकरात वाजलं व्हत त्यामुळ मल लय भरून आलतं.

  • ड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन

    जकार्ता विमानतळावर फक्त एअर इंडियाच्या विमानासाठी भारतीय जमा होतं होते. भारतीय दूतावासातील कर्मचारी आपुलकीने सहकार्य आणि मार्गदर्शन करत होते. इंडियन नेव्हीचे एक कमांडर स्वतः अडचण असलेल्या प्रवाशाला शांतपणे ऐकून आणि समजून घेत होते तसेच त्याची समस्या दूर करत होते. भारतीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विमानतळावर भारतात परतण्यासाठी आतुर असलेल्या तणाव ग्रस्त भारतीयांशी आपुलकीने आणि सहजतेने वागतानाचे भावनात्मक क्षण पाहून भारावल्यासारखे झाले होते.

  • उद्यान एक्सप्रेसचा थरार

    इकडे स्टेशन मास्तरांच्या एव्हाना ही घटना दृष्टीस पडली होती. त्यांनी स्वप्नील कडे नजर टाकली आणि शुभांगी च्या दिशेने हात करत बोलले,” स्वप्नील,  तिकडे  बघ,  कोणीतरी लहान मुलगा ट्रॅक वर पडला आहे.” स्वप्नील ने तिकडे बघितले आणि तो एकदम बेभान झाला. काय करावे हा तो विचार करत होता तेवढ्यात स्टेशन मास्तरांनी आपल्या हातातील लाल झेंडा उंच उभारून उद्यान एक्स्प्रेस च्या लोकोपायलट ला धोक्याचा इशारा दिला होता.

  • विक्रम – वेधा

    आर. माधवन आणि विजय सेथुपथी या दोन अभिनेत्यांचा अभिनय, अंडरवर्ल्डचे विदारक आणि वास्तवपूर्ण चित्रण, पोलिसदलातील अंतर्गत राजकारण, अंडरवर्ल्ड मधील जीवघेणं राजकारण यासाठी ही मुव्ही पाहायलाच हवी.

  • सत्यम् शिवम् सुंदरम्

    माणसाचं मन असतं कुठे? त्यात काय, काय असतं? ते सगळं आपल्याला कळतं का? माणूस मनाचा वापर करतो, की मन आपल्यावर स्वार होतं? असे एका ना दोन अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ माझं मन कुरताडत असतं. अस्वस्थ करीत असतं. माझ्या वयाच्या अकराव्या वर्षी मी पहिली चोरी केली. एका पानटपरीवाल्याचे आठ रुपये पंचेचाळीस पैसे मी लांबविले. ती घटना मी विसरलो, असं समजत होतो. नित्यजीवनावर त्या घटनेचे काही परिणामही जाणवत नव्हते; पण दहा वर्षांच्या कालावधीनंतर जेव्हा मी त्या पानवाल्याकडे या चोरीची कबुली दिली, त्याचे पैसे दामदुपटीने परत केले तेव्हा कळलं, की माझी चोरी त्याला त्याचवेळी ज्ञात होती. तो काही बोलला नव्हता. त्या दहा वर्षांत त्यानं कधीही या घटनेची आठवणही मला करून दिलेली नव्हती. मी चोर नाही, माझा सद्सद्विवेक जागा आहे, असा त्याचा विश्वास होता. एका अर्थानं चूक कबूल केल्यानंतरही तोच जिंकला होता. एक साधा पानवाला; पण मनाच्या नीतळपणाची साक्ष तो अजूनही मला देत असतो.

  • ठकास महाठक

    देसाईआजोबांनी जोऱ्यात फोन आपटला . रागानी ते अगदी हिरवे पिवळे पडले होते , टकलाला घाम आला होता , त्यांनी हाताशीच असलेल्या टॉवेलनी टकालाचा घाम पुसल्यावर टकलाला आधीच्या पेक्षा जास्त केस चिकटलेले वाटले तेंव्हा लक्षात आले कि तो त्यांच्या मनीचा बसायचा टॉवेल होता .

  • जान बचीं, लाखों गये

    शहरातील गेल्या रविवारचीच घटना आहे. उच्चभ्रू सोसायटीतील एक बंगला. बंगल्यात तिघेचजण रहाणारे. ऐंशीच्या घरातील पती-पत्नी व त्यांचा केअरटेकर. रात्री साडेआठची वेळ. तीन चोर बंगल्याजवळ येऊन कानोसा घेऊ लागले. त्या केअरटेकरने किचनच्या खिडकीतून त्यांना हटकले. तरीदेखील त्यांनी आत प्रवेश केलाच.

  • जोडवी – भाग ३

    संध्याकाळी यामिनी ऑफिसमधून लवकर घरी आली तेंव्हा विजय घरी आलेला नव्हताच ! यामिनी घरी आल्या आल्या फ्रेश होऊन हॉलमध्ये टी.व्ही. पाहत बसलेली असताना दारावरची बेल वाचली चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेऊन ती दरवाजा उघडायला उठली , दरवाज्यात प्रतिभा उभी होती तिला आत घेताच...
    प्रतिभा : मॅडम आज लवकर आलात का ?
    यामिनी : हो ! आज जरा लवकर सुटका झाली ! प्रतिभा ! मी चहा बनविला आहे तो तू घे ! आणि कामाला सुरुवात कर !
    प्रतिभा : ठीक आहे मॅडम !
    यामिनी : बर ! आज रात्रीसाठी पनीरची भाजी कर ! मी पनीर आणून ठेवलाय फ्रिजमध्ये ! यापूढे काही आणायचे असेल तर तूच येताना घेऊन येत जा... मी पैसे देऊन ठेवत जाईन तुला, मी विसरले तर साहेबांकडून घेत जा..
    प्रतिभा : ठीक आहे ...
    म्हणत प्रतिभा स्वयंपाक घरात निघून जाते... यामिनी तेथेच पुन्हां टी. व्ही. पाहण्यात गुंग होते, यामिनी इतकी शिकलेली तरी तिला सास - बहूच्या सीरिअल खूप आवडत असतात... कामाच्या व्यापामुळे तिला फार टी.व्ही. पाहायला मिळत नाही पण जेंव्हा कधी वेळ मिळतो तेंव्हा ती टी.व्ही. पाहते. इतक्यात पुन्हा दारावरची बेल वाजते यामिनी दरवाजा उघडते तर दरवाज्यात विजय उभा असतो ! तो आत येताच सोफ्यावर बसतो आणि...
    विजय : प्रतिभा माझ्यासाठी जरा चहा घेऊन येतेस का ?
    प्रतिभा : स्वयंपाकघरातूनच हो ! हो ! आले
    विजय : यामिनी ! तू आज लवकर घरी आलीस ?
    यामिनी : का ! मी लवकर आले याच तुला वाईट वाटते आहे का ?
    विजय : मला का वाईट वाटेल ?
    यामिनी :वाटणारच ना ! कारण मी लवकर आले कि तुला तुझी आवडती मालिका पाहायला मिळणार नाही ना ! मालिका कसल्या पाहतोस ! त्यातील नायिका पाहत असतोस डोळे फाडून...
    विजय : विनोदाने .. हे बाकी बरोबर बोललीस, " या मालिकेतील अभिनेत्रींनसमोर मला चित्रपटातील अभिनेत्री फिक्या वाटतात.. त्यात प्रत्येक नवीन मालिकेत नवीन अभिनेत्री येतच असते एकीच्या प्रेमात पडतो न पडतो तो दुसरी हजर ! त्यात व्हिलनच काम करणाऱ्या अभिनेत्री तर नायिकेपेक्षाही दिसायला सुंदर असतात..
    यामिनी : बस ! आता त्याच्या सौंदर्याची स्तुती, मला सांग तू कोठे गेला होतास ?
    विजय : मी ना ! बाहेर जरा पाय मोकळे करायला गेलो होतो... ढेरी थोडी कमी करावी म्हणतो...
    यामिनी : ती आता कमी करून कोठे जायचंय ?
    विजय : कोठे जयला कशाला पाहिजे ! पण वजन नियंत्रात ठेवलेले उत्तम , तुला सांगतो मी लहान असताना मला सर्वजण सुकड्या म्हणायचे, तेंव्हा त्याचा मला खूप राग यायचा पण आता लोक सुकड्याना सुकड्या नाही तर झिरो फिगर म्हणतात... आता मी झिरो फिगर राहिलो नाही याचे वाईट वाटते... पूर्वी कसा मी दहा फुटावरूनही उडी मारायचो पण आता चार फुटावरूनही मारता येणार नाही...
    प्रतिभा : इतक्यात चहा नाश्ता घेऊन येते दोघांसाठीही... घ्या साहेब - मॅडम चहा आणि नाश्ता, नाश्त्यात कांदे - पोहे केले आहेत.
    विजय : थँक यु ! प्रतिभा ! खरंच मला खूप भूक लागली होती..
    यामिनी : पोहे खाता खाता .. विजय ह्या प्रतिभाला काहीच सांगावे लागत नाही, ती सारे अगदी घरच्या माणसांसाठी करतात तसेच करते...
    विजय : आपल्यालाही ती घरच्यांसारखीच आहे... पोहे छान केले आहेत हा !
    यामिनी : बरं ! हा घे रिमोट आणि तू तुझ्या नायिका बघत बस ! मी आत जाऊन प्रतिभाला स्वयंपाकात थोडी मदत करते.. आज लवकर आले आहे तर..
    यामिनी प्रतिभाला मदत करायला स्वयंपाक घरात निघून जाते विजय तेथेच सोफ्यावर बसून चॅनेल बदलत राहतो.... त्याला एक चॅनेल दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ पाहवत नाही ! तिकडे स्वयंपाक घरात... यामिनी प्रतिभाला स्वयंपाकात मदत असते.. स्वयंपाक करता करता जश्या कोणत्याही दोन बायकांच्या गप्पा रंगतात तश्या त्यांच्याही गप्पा रंगलया...
    यामिनी : प्रतिभा ! तू मूळची कुठली ?
    प्रतिभा : मी लहानाची मोठी रायगडला झाले
    यामिनी : मग ! तू रायगड किल्ला पाहिलास कि नाही ?
    प्रतिभा : नाही पहिला मॅडम !
    यामिनी : रायगडला राहून तू रायगड किल्ला पाहिला नाहीस ! अगं ! मी रायगडावर चार पाच वेळा गेले आहे ... तुझ्या गावच्या घरापासून किती वेळ लागेल रायगडावर जायला ?
    प्रतिभा : एकदा तास लागत असेल..
    यामिनी : आपण काढू एकदा पिकनिक रायगडावर ! आता मी घेऊन जाईन तुला...
    यामिनी : बरं तुझ्या घरी कोण कोण असतं ?
    प्रतिभा : मी , माझ्या नवरा आणि दोन मुलं, मोठी मुलगी आणि छोटा मुलगा, मोठी मुलगी आता तिसरीला आहे आणि मुलगा पहिलीला...माझं लग्न लवकर झालं ना !
    यामिनी : तुझा नवरा काय काम करतो ?
    प्रतिभा : आहे एका कंपनीत कामाला...
    यामिनी : बाकीचे नातेवाईक ?
    प्रतिभा : सासू सासरे असतात गावाला , दोन दीर आहेत त्याची लग्ने झालेली आहेत ते पाहतात त्याचं त्यांचं !
    यामिनी : तुमचं घर स्वतःच आहे ना ?
    प्रतिभा : नशीब छोटस का होईना आमचं घर स्वतःच आहे नाहीतर या वाढत्या महागाईत मुंबईत राहणं मुश्किल झालं असत.
    मॅडम तुमचं आणि साहेबांचं लग्न कधी झालं ?
    यामिनी : आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली ...
    प्रतिभा : मग ! अजून मुलबाळ का झालं नाही ?
    यामिनी : ते आम्हालाच नको !
    प्रतिभा : का ?
    यामिनी : आहेत आमची आमची काही करणे , सांगेन नंतर कधी तरी तुला सविस्तर... बरं ! तू विजयला कशी काय ओळखतेस ?
    प्रतिभा : साहेब पूर्वी ज्या चाळीत राहायचे त्या बाजूच्या चाळीत साहेबांचा मित्र राहतो, तो माझ्या मावशीचा मुलगा ! मी मुंबईला घर काम करू लागल्यावर सुट्टीत त्याच्या घरी जायचे ! साहेब माझ्या मावस भावाला भेटायला यायचे अधून मधून तेंव्हाच आमची ओळख झाली होती.
    यामिनी : विजयच्या जवळ - जवळ सर्व मित्रांना मी ओळखते काय नाव काय त्या मित्राचे ...
    प्रतिभा : अजय !
    यामिनी : तू अजय भावोजींची ! मावस बहीण आहेस म्हणजे आमच्या घरातीलच आहेस कि ! अजय भावोजी खूप हुशार आहेत हा ! ते येतात वर्षातून एक दोनदा विजयला भेटायला आमच्या घरी... मी आणि विजय गेलो आहोत त्याच्या नव्या घरात...तुझी वाहिनीही माझी छान मैत्रीण आहे ... आमच्यात होत असतात गप्पा अधून मधून...
    प्रतिभा : आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला शिकता आले नाही ... त्याचा आज पश्चाताप होतोय ! मी ही शिकलेले असते तर आज मी स्वतःच्या पायावर उभी असते !
    यामिनी : तू फार शिकली नाहीस म्हणून काय झाले ? तू आजही स्वतःच्याच पायावर उभी आहेस ! तू जे काम करतेस ते काही हलके काम नाही ! ते तर सर्वच बायकांना कधी ना कधी करावेच लागते ! पण तुमचे विशेष कौतुक करायला हवे कारण तुम्ही तुमच्या घरातील कामे करून आमच्या घरातील कामे करता . जर तुम्ही आमच्या घरातील कामे केली नाहीत तर आम्हाला बाहेरच्या जगात कर्तृत्व गाजवता येणार नाही ! विजय ! मला म्हणाला कि तू त्याच्या ओळखीची आहेस पण तो मला हे म्हणाला नाही कि तू अजय भावोजींची बहीण आहेस ! प्रतिभा ! तू यापुढे मला मॅडम नको म्हणू ! तू मला ताईच म्हणत जा !
    प्रतिभा : बरं ताई ! ... ती गालात गॉड हसली ..
    यामिनी : बरं ! आता तुझं आवरलं कि तू घरी जा ! आणि मला जरा चहा गरम करून दे ! साहेबांना घेऊन जाते... साहेबांना एक वेळ जेवायला नसेल तरी चालेल पण सारखा चहा लागतो.

    यामिनी चहाचा कप घेऊन बाहेर हॉलमध्ये आली आणि तो चहाचा कप विजयच्या हातात देत ..

    यामिनी : तू मला सांगितले नाहीस कि प्रतिभा अजय भावोजींची मावस बहीण आहे म्हणून ?

    विजय : सॉरी ! सॉरी !! तुला सांगेन सांगेन म्हणालो आणि विसरून गेलो, म्हणूनच तुला मी म्हणालो होतो ,'' ती आपल्या घरातल्या सारखीच आहे..

    यामिनी : मला एक मोलकरीण हवी होती पण प्रतिभाच्या रूपात बहीणच मिळाली...

    प्रतिभा : बाहेर येऊन ! ताई सर्व कामे झाली आहेत , मी आता निघते ! उद्या सकाळी येते...

    यामिनी : चालेल ! तू ये आता, जरा उशिरा आलीस तरी चालेल ! तसाही मी काही ऑफिसमध्ये डबा वगैरे घेऊन जात नाही ..

    प्रतिभा : बरं !

    प्रतिभा निघून गेल्यावर यामिनी सोफयावर विजयच्या बाजूला बसते आणि ...

    यामिनी : विजय ! प्रतिभा मला विचारत होती कि तुमच्या लग्नाला पाच वर्षे झाली तरी मुलबाळ का नाही ?

    विजय : तू काही सांगितले नाहीस ना ?

    यामिनी : नाही ! मी काहीही सांगितले नाही...

    विजय : सांगूंही नकोस ! तिला ते पचणार नाही...

    यामिनी : हा मुलाबाळांचा प्रश्न हल्ली मला आपल्या बाबतीत जवळ जवळ सर्वांच्याच नजरेत दिसतो...

    विजय : पण या सगळ्या गोष्टी आपण गृहीत धरूनच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता ना ?

    यामिनी : विजय तू बोलतोस ते बरोबर आहे ! पण हे असे प्रश्न पुरुषांना नाही तर फक्त स्त्रियांना विचारले जातात !

    विजय : त्याची मला कल्पना आहे... या विषयावर आपण नंतर चर्चा करू !

    यामिनी : बर ! मी जरा आत जाऊन पडते... जेवणाची वेळ झाली की मला हाक मार ... मग आपण जेवायला बसू ..
    विजय : बरं बाई ...

    -- निलेश बामणे

  • संक्रांत

    तीळगूळ घ्या मधूर बोला विनवीत येई संक्रांत
    परंतु जाई पुन्हा वर्ष ते नियमित ओरड आक्रांत।

    संक्रांतीच्या आक्रांतीतही काळोखाचा अवशेष
    पुन्हा पुन्हा संक्रांती देती सौहार्दाचे संदेश ।।

    --- द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य