महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
श्री पद्मालय,एरंडोल (अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ) – जळगाव जिल्ह्यातील एरंडोल जवळ असलेल्या पद्मालय येथील गणेश मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्हणून प्रसिध्द आहे. ‘पद्म’ म्हणजे कमळ आणि ‘आलय’ म्हणजे घर यावरून या ठिकाणाचे वैशिष्ट्य लक्षात येते.
महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेजवळ वसलेले नंदुरबार हे खानदेशातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करुन नंदुरबार हा वेगळा जिल्हा करण्यात आला.
नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते तर नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते.
धुळ्यामधून मुंबई – आग्रा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ३) व हाजीरा-धुळे-कोलकत्ता (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६) हे महामार्ग जातात. भुसावळ – शिंदखेडा – नंदूरबार – सूरत हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो.
मुंबईतल्या लॅंडमार्क वास्तूंपैकी एक महत्त्वाची इमारत म्हणजे ‘जहांगीर आर्ट गॅलरी’.
अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. ‘सधन शेतकऱ्यांचे गाव’ म्हणून महाराष्ट्रभर ‘अकलूज’ ओळखले जाते.
रोमेनिया (मराठी-हिंदीत रुमानिया) हा पूर्व युरोपामधील एक देश आहे. रुमानियाच्या पश्चिमेला सर्बिया व हंगेरी, उत्तरेला युक्रेन, पूर्वेला मोल्दोव्हा, दक्षिणेला बल्गेरिया हे देश तर आग्नेयेला काळा समुद्र आहे. बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
जिल्ह्यात केवळ बीडमधे औद्योगिक वसाहत आहे. जिल्ह्यात के १९७० साली परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आले. १९९५ मध्ये वृक्षारोपणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने या केंद्रास गौरविण्यात आले.
बहरैन (मराठीत बहारीन, बहरीन(हिंदी), बाऽरेन्(इंग्रजी)) हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश आहे. मनामा ही बहारीन देशाची राजधानी आहे.
धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८०६१ चौ. किमी. इतके आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti