महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. सध्या गडचिरोलीचे १२ तालुके आहेत, पण विभाजनापूर्वी या भागात गडचिरोली व सिरोंचा हे दोनच मोठे तालुके अस्तित्वात होते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत हा भाग चंद्रपूरमध्येच समाविष्ट होता.
वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे.
नांदगाव-खांडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, तालुक्याचे मुख्यालय या शहरात आहे. येथे असलेले भगवान खांडेश्वराचे प्राचीन मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे.
कझाकस्तानाची अर्थव्यवस्था मध्य आशियाई अर्थव्यवस्थांपैकी सर्वांत मोठी आहे. कझाकस्तानाला नैसर्गिक इंधनसाठ्यांचे वरदान लाभले असल्यामुळे कच्च्या खनिज तेलाचे उत्पादन कझाक अर्थव्यवस्थेचा लक्षणीय हिस्सा आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तेरे खोलची खाडी हे राज्याचे अगदी दक्षिणेकडील टोक असून,या खाडीवरील पुलामुळे महाराष्ट्र व गोवा ही दोन राज्ये जोडली गेली आहेत. मुंबई-पणजी-कोची (म्हणजेच मुंबई – गोवा) हा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ या जिल्ह्यातून गेला आहे.
यवतमाळ ह्या शहराचे नाव आधी ‘यवत’ अथवा ‘यवते’ असावे असे मानले जाते. या यवत किंवा यवतेचा माळ (टेकडीवरील सपाटीचा प्रदेश) किंवा ‘यवते’ चा महाल (परगणा किंवा विभाग) अशा शब्द रचनेतून ‘यवतमाळ’ हे नाव पडले असावे.
व्हेनेझुएला (संपूर्ण नावः व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक; स्पॅनिश: República Bolivariana de Venezuela) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. व्हेनेझुएलाच्या पश्चिमेला कोलंबिया, दक्षिणेला ब्राझील, पूर्वेला गयाना हे देश तर उत्तरेला कॅरिबियन समुद्र आहेत.
महाराष्ट्रातील मुंबई शहरात इ.स. १८५८ साली व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ हे संग्रहालय स्थापन करण्यात आले. या संग्रहालयास व्हिक्टोरिया राणीचे नाव देण्यात आले.
पूर्वी पूर्व खानदेश या नावाने ओळखल्या जाणार्या जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिण-पूर्व दिशेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , दक्षिण-पश्चिमेस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे.
देऊळगावराजा हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरातील जुने बालाजी मंदिर प्रेक्षणीय असून, महाराष्ट्राचे तिरुपती अशी या मंदिराची ख्याती आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti