महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
नागपूरजवळच्या रामटेक गावामध्ये रामटेकचा गिरीदुर्ग उभा ठाकलेला असला तरी या किल्ल्याची ओळख किल्ला म्हणून कमी आणि धार्मिक स्थळ म्हण्नू जास्त आहे. धार्मिक श्रद्धेमुळे अनेक भाविकांचा किल्ल्याकडे ओढा असतो.
पुणे शहर हे महाराष्ट्रातील महत्त्वाची औद्योगिक नगरी असुन माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. पुणे-मुंबई ही दोन महत्त्वाची शहरे जोडणार्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे.
उत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक देश आहे. हा एक एक अण्वस्त्रधारी देश आहे.
चित्तूर हे केरळ राज्यातल्या पलक्कड जिल्ह्यातील एक शहर आहे. या शहरात असलेले दुर्गा मंदिर चित्तूर भगवती नावाने प्रसिद्ध आहे. सोकनाशिनी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहरातील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे.
सामोआचे स्वतंत्र राज्य हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक देश आहे. सामोअन द्वीपसमूहाच्या पश्चिम भागमध्ये वसलेल्या सामोआची लोकवस्ती प्रामुख्याने उपोलू व सवई ह्या दोन बेटांवर स्थित आहे. आपिया ही सामोआची राजधानी व प्रमुख शहर आहे.
प्राचीन भारतातील प्रसिद्ध गणिततज्ज्ञ भास्कराचार्य हे बीडच्याच परिसरातील होते असे म्हटले जाते.त्याचप्रमाणे गोपिनाथ मुंडे यांचं जन्मगाव आणि मतदारसंघ म्हणून बीड जिल्हा हा देशात प्रसिद्ध आहे.
भगवान रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक शहरात पुरातन अष्टदशभुज गणेश मंदिर आहे. हे मंदिर ११-१२ व्या शतकातील असल्याची नोंद असून १८ हात असलेली ही एकमेव मूर्ती आहे.
देशाच्या स्वातंत्रपुर्वीचे ९ ते ११ मे १९३० असे तीन दिवस सोलापूरने स्वातंत्र्य उपभोगले. या स्वातंत्र्याची घोषणा करणार्या मल्ला धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, किसन सारडा यांना ब्रिटिशांनी जानेवारी १९३१ मध्ये फासावर लटकवले.
चिलीचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Chile RepChile.ogg उच्चार (सहाय्य·माहिती)) हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. चिलीच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. चिलीला ६,४३५ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे[३]. प्रशांत महासागरातील ईस्टर द्वीप चिलीच्या अधिपत्याखाली येते तर अंटार्क्टिका खंडाच्या १२,५०,००० वर्ग किमी भागावर चिलीने आपला हक्क सांगितला आहे.
महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तर जगप्रसिद्ध अजंठा-वेरूळ गुफा, बीबी का मकबरा, दौलताबाद देवगिरी किल्ला ही ऐतिहासिक ठिकाणे याच जिल्ह्यात आहेत. ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी जगाच्या नकाशावर औरंगाबादची ओळख आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti