महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
कुंभकोणम हे तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तंजावरपासून ते अवघ्या ४० किलोमीटरवर वसलेले आहे. या शहराच्या उत्तरेस कावेरी नदी वाहते, तर दक्षिणेस अर्सलर नावाची नदी वाहते.
राजमुंद्री हे आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. आद्य तेलगू कवी नन्नय्या यांचे हे जन्मठिकाण असून, आंध्र प्रदेशची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
ग्रेनेडा हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. ग्रेनेडा ह्याच नावाचे मोठे बेट तसेच ग्रेनेडीन्स द्वीपसमूहातील दक्षिणेकडील सहा बेटे ग्रेनेडाच्या अधिपत्याखाली आहेत तर उत्तरेकडील बेटांवर सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स देशाची सत्ता आहे.
भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात आहे. तसेच या परिसराशी जोडले गेलेले रामायणातील संदर्भ, अंबेजोगाई येथील श्री योगेश्र्वरी देवीचे स्थान यामुळे बीड जिल्हा संपूर्ण भारतात धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
कुर्नूल हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर असून या शहरात जिल्हा मुख्यालय असल्याने अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत. हैदराबादपासून हे शहर २१२ कि.मी.वर आहे.
नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी स्थित असून भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. नागपूर देशाच्या मध्यवर्ती स्थानावर असल्याने रस्ते, विमान व रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. देशातील दुसर्या क्रमांकाचे हिरवे शहर असा नागपूरचा लौकिक आहे.
तामिळनाडूच्या बाजूने पश्चिम घाटातून केरळ राज्यात प्रवेश करताना सर्वप्रथम हे शहर लागत असल्याने पलक्कड शहराला ‘गेट वे ऑफ केरला’ असे म्हटले जाते.
श्रीलंका (जूने नाव – सिलोन / Ceylon), हा हिंदी महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान ३१ कि.मी. रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी पसरली आहे. श्रीलंकेच्या पश्चिमेला पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात, उत्तर व पूर्वेकडे बंगालची खाडी तथा दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. भारत आणि मालदीव हे श्रीलंकेचे शेजारी देश आहेत. श्रीलंका इ.स. १९४८ साली राष्ट्रमंडळाचा सदस्य या नात्याने स्वतंत्र झाला.
मॉरिटानिया हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे.
परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागाच्या अखत्यारीत येतो.परभणीला पूर्वी प्रभावतीनगर असे म्हटलं जात असे.
Copyright © 2025 | Marathisrushti