महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
अन्नधान्यांपैकी ज्वारी हे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असून तूर, भुईमूग, करडई, गहू, हरभरा, कापूस, मिरची, ऊस आणि केळी ही पिके घेतली जातात.
नागपूर येथे महाराष्ट्रातील पहिले “पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ” आहे अशा प्रकारचे हे विद्यापीठ भारतातील तिसरे असून, पशुधनावर संशोधन करणारी मध्य भारतातील ही महत्त्वपूर्ण संस्था आहे.
जपान (En-us-Japan.ogg उच्चार (सहाय्य·माहिती))(जपानी- 日本) हा पूर्व आशियामधील एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. जपानी भाषेत “जपान” या नावासाठी वापरल्या जाणाऱ्या कांजीचा (日本) (कांजी = चिनी / जपानी भाषेचे वर्ण) अर्थ “सूर्य उगम” असा होतो. त्यामुळे आणि जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे संबोधण्यात येते.
राज्यातील बहुतांश शेती अनियमित स्वरुपाच्या मोसमी पावसावर अवलंबून असल्याने शासनाचा जलसिंचनावर भर आहे.
रेडी हे गांव सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असून तेथील गणपती हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव सुप्रसिद्ध गणपती आहे.
नाउरू हे ऑस्ट्रेलियाच्या उत्तर-पूर्वेकडील एक छोटेसे बेट. इंग्रज प्रवासी नाऊरुमध्ये येण्यापूर्वी प्रशांत महासागरातील बेटवासीयांची येथे वस्ती होती. ब्रिटिश प्रवाशांनी त्यांचे `Pleasant Island’ असे नामकरण केले.
ताजिकिस्तान, अधिकृत नाव ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक भूवेष्टित देश आहे. याच्या दक्षिणेस अफगाणिस्तान, पश्चिमेस उझबेकिस्तान, उत्तरेस किर्गिझस्तान व पूर्वेस चीन हे देश वसले आहेत. याच्या सीमा पाकिस्तानाच्या चित्रल आणि गिलगित-बाल्तिस्तान प्रदेशांपासून नजीक असून अफगाणिस्तानाच्या वाखान पट्ट्यामुळे त्या दुरावल्या आहेत.
फिलिपाईन्स (अधिकृत नाव: फिलिपिन्साचे प्रजासत्ताक ; अन्य लेखनभेद: फिलिपिन्स, फिलिपाइन्स ; फिलिपिनो: Pilipinas ; स्पॅनिश: Filipinas ; इंग्लिश: Philippines 😉 हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर वसलेल्या फिलिपाईन्सचे लुझॉन, विसायस व मिंदानाओ ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. मनिला ही फिलिपाईन्सची राजधानी व त्या देशातले सर्वांत मोठे शहर आहे.
रामायण काळात जिल्ह्याचा परिसर एक ठळक स्थान होता. कारण वनवासात असताना श्रीराम,लक्ष्मण व सीतामाई हे त्रिकूट या परिसरात निवासाला होते असे मानले जाते. रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापल्याने या शहराला नाशिक असे नाव पडल्याचे (नाक-नासिका-नाशिक या संगतीने) सांगितले जाते.
राज्यातील २५ शहरांत शहरांतर्गत वाहतूक सेवा आहे. यासाठी म.रा.प.म. दररोज सरासरी ५२० बसगाड्यांचा वापर करते.
Copyright © 2025 | Marathisrushti