महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
यादवकालीन नंदीगृह म्हणजेच आजचे आधुनिक नंदूरबार होय. दंतकथेनुसार नंद या गवळी राजाने हे शहर वसविले.
संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.
हिंदुस्थानात संस्थात्मक जीवनाचा व सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा होय. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि दलित मुक्तीसाठी लढणारे दादासाहेब गायकवाड हे सगळे विविध क्षेत्रांतील दिग्गज नाशिक जिल्ह्याच्या भूमीतले होते.
अरुणाचल प्रदेशातील लोअर सुंबासिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. सर्वाधिक शंभरपेक्षा जास्त खासगी आणि शासकिय शाळा येथे आहेत.
तमिळनाडूची सांस्कृतिक ओळख सांगायची झाली तर तंजावर (थंजावूर) हे नाव अग्रस्थानी येतं. इथलं वैभव फक्त इतिहासात नाही; ते आजही वास्तु-कलेत, संगीत-नृत्यात, कलेत आणि वस्त्र संस्कृतीत जिवंत धडधडतं.
जी ईश्वरनिर्मित असल्याने चिरंतन टिकून आहे, ती ज्ञानेश्वरी. मराठी भाषेतील सर्वांत मोठा प्राचीन असा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे लिहिला. शिर्डी येथील प्रसिध्द साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात आहे.
अॅडियाट्रिकचा मोती समजले जाणारे ड्युब्रॉनिक हे शहर क्रोएशियात आहे. या शहराचा शोध सातव्या शतकात लागला रिनायझन्स काळातील सुंदर चर्च. इमारती येथे पहायला मिळतात.
पाकिस्तान हा दक्षिण आशियात असलेल्या भारताच्या वायव्य सीमेवरील देश आहे. पाकिस्तान हे के॓द्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे (परगणा) आणि चार के॓द्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी तर कराची ही सर्वात मोठे शहर आहे. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १७ कोटी असून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा सहावा क्रमा॓क आहे. इंडोनेशिया पाठोपाठ जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते. बोलीभाषा, वंश, भूगोल, वन्यप्राणी यात प्रचंड विविधता पाकिस्तानात आढळते. पाकिस्तान हा एक विकसनशील देश असून, औद्योगिकरण हे उर्जितावस्तेत आहेत. पाकिस्तानी अर्थव्यवस्था जगात २७ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून, लष्करी राजवट, राजकीय अस्थिरता, शेजारी भारतासोबत असलेले वादग्रस्त संबंध यामुळे सतत अस्थिरतेला पाकिस्तानी जनतेला सामोरे जावे लागले. देश अजूनही दहशतवाद, दारिद्र्य, निरक्षरता आणि भ्रष्टाचार अशा समस्यांशी झगडत आहे.
ब्रिटिश काळात १८५४ साली सुरू झालेली ही सेवा आजही अविरतपणे सुरू आहे. त्याकाळी सर्वसामान्यांचे पोस्टाशी जुळलेले नाते आजही तसेच टिकून आहे. आधुनिकतेच्या युगात सुमारे १६० वर्षे हे नाते जपले जात आहे,
डेन्मार्क हा उत्तर युरोपामधील व स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. हा देश अतिशय विकसीत असून या देशाचे दरडोई उत्पन्न अति उच्च आहे. डेन्मार्क हा देश दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कोपनहेगन ही डेन्मार्क ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti