वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सन १९८२ मधली घटना… तुर्कस्तानच्या दक्षिण भागात, उलुबुरून म्हणून ओळखला जाणारा, भूमध्य सागरात शिरलेला एक लांबट भूभाग आहे. सागरी स्पंजाचा शोध घेताना एका पाणबुड्याला, या उलुबुरूनच्या किनाऱ्यापासून सुमारे साठ मीटर अंतरावर, समुद्राच्या तळाशी पडलेलं एक जुनं जहाज दिसलं.
भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आंध्र राज्यातील विशाखापटटम ( वैझ्याग ) हे पुरातन काळापासूनचे महत्वाचे बंदर. ब्रिटीश राज्यकर्त्यानी मोठी गोदी बांधून समुद्र व्यापार मार्गाचे महत्वाचे ठिकाण तयार केले. आज भारतीय नौदलात त्याचे अनन्य साधारण महत्व असून सबमरीन्सचा महत्वाचा बेस येथे आहे. विशाखापट्टणम येथील रामकृष्ण बीच वरील सबमरीन म्युझियम पाहून डोळ्याचे पारणे फिटले. प्रत्येक भारतीय नागरीकाने त्याला भेट देऊन मानाचा मुजरा दिलाच पाहिजे अशी ही विशेष जागा आहे. आशिया खंडातील अशा तऱ्हेचे हे एकमेव म्युझियम आहे.


लाहोरमध्ये एक रात्र काढून पेशावरकडे जायचं असल्यानं हॉटेल शाहताजवर सामानाची उचकाउचकी करत बसलो नाही. खालच्या मजल्यावर असलेल्या हॉटेल व्यवस्थापकाकडे पेशावरला कसं जाता येईल, या संदर्भात माहिती घ्यायला मी गेलो. तो मला म्हणाला, ‘आत्ता रात्री आठनंतर पेशावरला जाणाऱ्या बऱ्याच बसेस पलीकडून सुटतात. त्यांपैकी कोणतीही घेतलीत तरी पेशावरला जाता येईल. तथापि माझा मित्रत्वाचा सल्ला आहे, की ‘तुम्ही आत्ता न जाता सकाळीच जाणं चांगलं. रावळपिंडीच्या पलीकडे घाटात गाड्या अडवून नेहमीच लुटालूट होत असते. तुम्ही भारतीय आहात.
मानसिक असंतुलन अनेक कारणांमुळे बिघडते. शारीरिक व्याधी, परावलंबित्व, आर्थिक विवंचना, अहंकार, एकटेपणा, आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव अशा कित्येक गोष्टींमुळे मानसिक संतुलन बिघडते. तरुण वयात परिवरासाठी आपण घेतलेले कष्ट, त्याग, मुलाबाळांच्या संगोपानासाठी साठी घेतलेले परिश्रम यांची कुणालाच जाणीव नाही अशी काहीशी मनस्थिती या वयात होते.
तोंडात अन्न घेतल्याबरोबर लगेचच लाळ येऊन पचनाची पहिली प्रक्रिया सुरू होते. वार्धक्यात कधीकधी लालाग्रंथींमधून पुरेशा प्रमाणात लाळ निर्माण होत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. काही औषधांचे दुष्परिणाम, विशिष्ट आजारांचे लक्षण, केमो किंवा रेडिएशनचे दुष्परिणाम, लालाग्रंथींच्या नलिकांमध्ये खडा होणे, उलट्या होणे, तळलेले पदार्थ अधिक सेवन करणे, रक्तस्राव होणे, सिगारेट व तंबाखू सेवन करणे अशी मुख्य कारणे आहेत.


अमेरिकेत पुन्हा जायला मिळेल न मिळेल, पण पाकिस्तानात पुन्हा जायला मिळालं तर मला ते आवडेल, असं मी पहिल्यांदा पाकिस्तानात जाऊन आलो तेव्हा म्हणालो होतो. त्यानंतर मी दोनदा पाकिस्तानात गेलो. गेलो हेही स्वप्न आणि परत आलो तेही स्वप्नच कारण एकाहून एक प्रसंगच जिवावर बेतणारे होते. पाकिस्तानातून परतलो हे सत्य, अगदी निखळ सत्य. अन्यथा पाकिस्ताननामा लिहायला माझी लेखणी शाबूत राहिली नसती.

वाद्यांना विविध मानवी संस्कृतींत महत्त्वाचं स्थान आहे. वाद्यांचा उपयोग हा वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो – करमणूक म्हणून, संदेश पाठवण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी, वगैरे. वाद्यांचा असा उपयोग आजच नव्हे, तर प्राचीन काळीही केला जात असे. त्यामुळे प्राचीन काळी कोणत्या संस्कृतींत कोणती वाद्यं वापरात होती, हा अभ्यासकांच्या दृष्टीनं एक उत्सुकतेचा विषय आहे.

अतिथंड तापमानाला धातूंचे आणि मिश्रधातूंचे गुणधर्म बदलतात. सर्वसाधारण तापमानाला अतिशय उपयुक्त ठरणारा एखादा धातू वा मिश्रधातू हा अतिथंड तापमानात ठिसूळ बनतो व निरुपयोगी ठरतो. त्यामुळे अतिथंड तापमानाला वापरायच्या धातू व मिश्रधातूंवर मर्यादा येते. परंतु हा प्रश्न कदाचित नजीकच्या भविष्यात सुटण्याची शक्यता आहे.
सर्जिकल स्ट्राइक युद्ध पध्दत भारताने आजमावली त्यामधे पॅरा कमांडोनी सहभाग केला होता. ज्या भागात दिवसा सरळ चालता येत नाही. त्याभागात अमावस्ये च्या रात्री पूर्ण काळोखात एकही जवान जखमी न होता पॅरा कमांडो नी सर्जिकल स्ट्राइक पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडली.. पण पॅरा कमांडो म्हणजे काय? ते खुप कमी लोकांना माहित आहे.

मुंबई ही हरवून गेलेल्यांची नगरी आहे. इथे मनापासून आत्म्यापर्यंत अनेक गोष्टी रोज हरवतच असतात. अशावेळी १६ फेब्रुवारीला कुणी “ओके? नावाचा माणूस हरवला आहे ह्या बातमीचं फारसं | कुणाला वाटलं नसणार, पण ज्यांची कुणाची “ओके? नावाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ओळख होती, त्यांचा मात्र क्षणभर का होईना, काळजाचा ठोका चुकला असणार. पण मग वाटलं, “ओकेंना मनात येईल तेव्हा ट्रेकिंगला, तेदेखील विशेष करून हिमालयात जायची लहर यायची. तसंच तर काही झालं नाही ना? तसं “ओके’चं वर्षांचे) झालं होतं. स्मृतिश्रंशाच्या विकाराने त्यांना वेढलं होतं हे सगळं खरं, पण वाटलं, शेवटी सगळं जरी खरं असलं तरी ती कलावंताची कुडी आहे आणि तसंच झालं. २ मार्चला ‘ओके’ सापडले!
Copyright © 2025 | Marathisrushti