एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
१९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदाच भारतीय सैन्यांनी पाकिस्तानाच्या हद्दीत घुसून हवाई हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्यही बिथरलं. त्यांना प्रत्युत्तर देण्याची संधीही भारताने दिली नाही. ग्वालियरपासून उड्डाण घेतलेले भारतीय वायूसेनेचे १६ मिराज २००० ही लढाऊ विमाने मध्यरात्री साडेतीन वाजता पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत घुसली. या विमानाने बालाकोट भागात बॉम्ब हल्ले चढवले. जैशच्या दहशतवादी तळांना टार्गेट केले गेले. यात अनेक दहशतवादी ठार झाले.
इतिहासात प्रथम २६ जुलै १७४५ मध्ये महिलांचा पहिला क्रिकेट सामना खेळला गेला. १८८७ साली प्रथमच यॉर्कशायरमध्ये महिला क्रिकेट क्लबचे नाव समोर आले. तीन वर्षानंतर इंग्लंडमध्ये पहिली महिलांची टीम बनली जिचे नामकरण इंग्लंड लेडी क्रिकेटर ठेवले गेले.
कोरीव मंदिरे, लेणी, तेथील दगडात कोरलेली शिल्पे आणि त्यांचे सौदर्य यांचा अभ्यास भारतीय विद्या या शाखेत केला जातो. निसर्ग आणि मानव हे एकमेकांच्या साह्चार्याने राहतात त्यामुळे वन्य जीव, पशु आणि पक्षी, निसर्गातील वैविध्य यांची काळजी घेणे यासातही अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांचे महत्व अविवाद्य आहे.
पूर्वीचे शिक्षक आणि आताचे शिक्षक यांच्यात खूप तफावत दिसून येते. अहो म्हणजे पूर्वीचे शिक्षक मजा घेत शिकवत. आताच्या शिक्षकांना प्रचंड तणावाखाली वावरायला लागतं. त्यामागची कारणंही तशीच आहेत म्हणा. पूर्वी पालकच शिक्षकांना पूर्ण मुभा देत असत की , तुम्हाला वाटेल ते करा ठोका , मारा पण आमच्या मडक्याला घडवा , पण आता जरा जरी शिक्षक ओरडले तरी किंवा फटकावलं तर लगेच पालक असे व्यक्त होतात की जणूकाही शिक्षकांनी जीव घ्यायचाच बाकी ठेवला आहे.
७ डिसेंबर १९४४ रोजी शिकागोमध्ये आंतरराष्ट्रीय नागरी हवाई परिषद झाली होती. त्यानंतर १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने या दिवशी आंतरराष्ट्रीय नागरी हवाई दिवस साजरा करण्याची घोषणा केली. हवाई सेवांमध्ये सुधारणा, संरक्षण, मार्गांची निश्चिती, परिवहन आदी व्यवस्थेत आणखी सुधारणा करणे, हा या दिवसाचा उद्देश होता. त्यामुळे जगभरातील विमानतळांवरील कर्मचारी, व्यवस्थापन आणि हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) साठीदेखील हा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवशी आणखी एक महत्त्वाची घटना घडली होती. क्वांटस एअरलाइन्सच्या विमानातील वैमानिक आणि क्रू सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ४४९ प्रवाशांचे प्राण वाचवले होते.
आंतरराष्ट्रीय नागरी हवाई दिवसाच्या निमित्ताने जगातील सर्वात उंच चार एटीसी टॉवर्स आशियात (थायलंड, मलेशिया, जपान, चीन) असून तीन अमेरिकेत आहेत.
रॉयल डच ही सर्वात पहिली एअरलाइन असून १९१९ मध्ये तिची सुरुवात झाली होती. १७ मे १९२० रोजी या एअरलाइनच्या पहिल्या विमानाने अॅम्स्टर्डमहून लंडनच्या दिशेने प्रयाण केले होते. त्यानंतर क्वांटस (१९२०) एअरलाइन सुरू झाली.
बोइंग ७४७-४०० एसच्या कॉकपिट विंडो फ्रेमचा खर्च एका लक्झरी कारच्या खर्चाएवढा आहे. त्याची वायरिंग २८० किमी लांबीची असते.
अलास्का एअरलाइनने सर्वप्रथम १९९९ मध्ये ऑनलाइन चेक इन सेवा सुरू केली.
विमानाचा वैमानिक आणि सहवैमानिकाला वेगवेगळे भोजन दिले जाते. विषबाधा झाल्यास यापैकी एक जण तरी विमान सांभाळू शकेल, हे यामागील कारण.
चीनमधील काम्दो-बांग्दा येथील धावपट्टी जगात सर्वात लांब (५.५ किमी) असून ती तिबेट क्षेत्रात येते. त्यानंतर रशिया व फ्रान्सचा क्रमांक लागतो.
- १ जानेवारी १९१४ रोजी अमेरिकेत पहिल्या व्यावसायिक प्रवासी विमानाचे उड्डाण फ्लोरिडा बेपासून टेंपा येथील सेंट पीटर्सबर्गकडे झाले होते.
२०१५ मध्ये जगातील सहाव्या सर्वात व्यग्र विमानतळाचा मान लंडनमधील हिथ्रो विमानतळाला मिळाला. त्यापूर्वी टोकियो, शिकागो, दुबई, बीजिंग आणि अटलांटाचा क्रमांक लागला.
लंडनहून पॅरिसकडे जाणाऱ्या विमानात १९१९ मध्ये सर्वप्रथम नाष्ट्यासाठी रोख घेतली गेली.
एअर पोर्ट हा शब्द पूर्वी १७८० मध्ये जहाज व्हेंटिलेशनसाठी तयार केलेल्या जागेसाठी किंवा छिद्रासाठी वापरला जात असे. १९०२ मध्ये हा शब्द सर्वप्रथम विमानांसंदर्भात वापरला गेला.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन आणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे.
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी ही भारतातील सर्वांत जुनी व मोठी विमा कंपनी आहे. सर दोराबजी टाटा यांनी २३ जुलै १९१९ रोजी या कंपनीची स्थापना केली.z
कुस्तीची वा मल्लयुध्दाची पूर्वपीठिका फार प्राचीन आहे. भरतात वैदिक वाङ्मयात तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथातील मल्लविद्येचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किशकिंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुध्द होऊन सुग्रीवने वालीचा पाडाव केला. महाभारतातील वर्णनुसार कृष्ण, बलीराम व भीम हे मल्लविद्येत प्रविण होते, हे त्यांनी केलेल्या महायुध्दांतील पराक्रमावरून दिसून येते.
रूट बिअर म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी आजचा मुहूर्तच योग्य आहे कारण , आजच्या दिवशीच परदेशात National Root Beer Float Day साजरा केला जातो. हा दिवस ऑगस्ट महिन्यात पहिल्या गुरुवारी साजरा केला जातो.
अशुद्ध, अस्वच्छ हातांनी अन्नपदार्थ हाताळल्यामुळे, खाल्ल्यामुळे अनेक जीवाणू आपल्या पोटात जात असतात आणि त्यातून विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळत असते.
Copyright © 2025 | Marathisrushti