पुण्याजवळील मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत हे धरण फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे १,००,००० लोक विस्थापित झाले. नदीकाठचे तीन मजली वाडे पूर्णपणे बुडाले होते. आजही अशा इमारती पूररेषेच्या आठवणी सांभाळून आहेत. भांबावलेल्या अनेकांनी गणरायाचे पूजन करून पुन्हा प्रपंच उभारले.
१९८३ ची विश्वचषक स्पर्धा सुरुवातीपासून नाटयमय ठरली. काही धक्कादायक निकाल या स्पर्धेत नोंदले गेले. भारत, झिंम्बावे या तुलनेने दुबळया संघांनी साखळी फेरीत वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया या बलाढय संघांवर विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय मुंबईतून पुण्यात हलवण्यात आल्यावर मुंबईतही तशी एक मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणारी संस्था असावी, असा ठराव १९३४ सालच्या साहित्य संमेलनात करण्यात आला. त्याच्या फलस्वरूप २१ जुलै, १९३५ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना करण्यात आली. संस्थेचे पहिले कार्यालय संस्थापक डॉ अ.ना.भालेराव यांच्या गिरगावातील नारायण – सदन या निवासस्थानी सुरु झाले.
संयुक्त राष्ट्र महासभाने २००२ साली संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय पर्वतीय वर्ष म्हणून घोषित केले आणि ११ डिसेंबर २००३ पासुन ‘इंटरनॅशनल माउंटन डे हा साजरा करण्यात येतो. दरवर्षी तो एका खास थीमसह साजरा केला जातो.
पुण्यातील नाना पेठ परिसरातील ऐतिहासिक सिटी चर्चने आज २२७ वर्षे पूर्ण केली आहेत. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील क्वार्टरगेट जवळील ऑर्नेलाज हायस्कूल शेजारी हे भव्य कॅथोलिक चर्च उभे आहे. "इमॅक्युलेट कन्सेप्शन ऑफ मदर मेरी" चर्च असेही याला संबोधले जाते. विशेष म्हणजे या सिटी चर्चच्या सभोवताली मोठी मुस्लिम वस्ती असून चर्चच्या कम्पाऊंड व भिंत व बाजूच्या मशिदीची भिंत एकच आहे. धार्मिक सलोख्याचे हे विलोभनीय उदाहरण मानावे लागेल.
पुण्यातील सिटी चर्चचा इतिहास :
पुण्यातील सिटी चर्चसाठी सवाई माधवराव पेशवे यांनी सुमारे चार एकर जागा दिली होती. अटकेपार झेंडे लावणाऱ्या पराक्रमी श्रीमंत पेशव्यांच्या फौजेत डॉम मॅन्यूल डि नोव्हो हा पोर्तुगीज लष्करी अधिकारी सेवेत होता. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोवा आणि उत्तर कर्नाटक येथून श्रीमंत पेशव्यांच्या फौजांसाठी सैन्यभरती करीत असत. त्यामुळे पेशव्यांच्या फौजांमध्ये अनेक पोर्तुगीज व ख्रिस्ती सैन्य असायचे. पोर्तुगीज अधिकारी डॉम मॅन्यूल डि नोव्हो हा साऱ्या सैन्याच्या गरजांकडे लक्ष देत असे.
सैन्यातील ख्रिश्चनांची गरज त्यांनी श्रीमंत पेशव्यांच्या कानावर घातली आणि श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या मागणीस तत्काळ मान्यता देऊन सध्याच्या नाना पेठेत चार एकर जागा कॅथोलिक चर्च बांधण्यासाठी दिली. तसेच आपले कारभारी नाना फडणवीस यांना सांगून आर्थिक मदत दिली. तेथे ८ डिसेंबर १७९३ मध्ये सध्याच्या चर्चची पायाभरणी होऊन प्राथमिक शेड बांधली गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बांधकाम होत प्राथमिक चर्चची वास्तू आकारास आली.
पेशव्यांनी दिलेल्या जागेवर पायाभरणी करून बांधलेल्या शेडमध्ये २५ डिसेंबर १७९२ मध्ये उल्हासात ख्रिसमस साजरा करण्यात आला. चर्चची उभारणी करण्यासाठी उपस्थित ख्रिश्चन बांधवांनी वर्गणी काढून निधी उभारला. तेव्हा सुध्दा त्यात श्रीमंत माधवराव पेशव्यांनी देखील त्यात सढळ हाताने वैयक्तिक आर्थीक मदत केली. सुमारे वर्षभरात सन १७९३ मध्ये चर्चची बांधणी पूर्ण झाली. त्यानंतर दरवर्षी ८ डिसेंबर रोजी स्थापना दिन आणि २५ डिसेंबरला ख्रिसमस येथे साजरा होतो व त्यात श्रीमंत पेशव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. या चर्चचा विस्तार ब्रिटिश सत्तेच्या कालावधीत होऊन १८५२ मध्ये दगडी इमारत झाली म्हणजे तब्बल १०० वर्षांनी आजचे चर्च आकारास आले.
गेल्या २२७ वर्षांत येथे रोज प्रार्थना व विविध धार्मिक सामाजिक उपक्रमाची परंपरा चालू आहे. सर्व जाती धर्मांमध्ये येथे सलोखा निर्माण करण्यातही या सिटी चर्चचा सदैव पुढाकार राहिला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
https://youtu.be/CZTyUzFmkXQ
१ मार्च १९२२ रोजी स्थापन झालेली रत्नागिरी शहरातील फाटक हायस्कूल ही रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण देणारी एक नाविन्यपूर्ण संस्था आहे. दि न्यू एज्युकेशन सोसायटी ही संस्था १९४० मध्ये स्थापन केली गेली असली तरी ही शाळा १९२२ पासून अस्तित्वात आहे.
आइसक्रीम.. नुसतं नाव उच्चारलं तरी आपण गारेगार होऊन जातो. आइसक्रीम पार्लर असो, हॉटेल असो, घरच्याघरी तयार आइसक्रीम असो किंवा रस्त्यावरून घंटावाली गाडी घेऊन फिरणारा आइसफ्रुटवाला असो, आइसक्रीम या नावातच आपल्याला पार विरघळवून टाकायची ताकद आहे. खाऊचा इतिहास माणसांच्या संस्कृतीइतकाच जुना आहे. या इतिहासाच्या पानापानावर आपल्याला अशी वळणं आढळतात जिथे जन्माला आलेला नवा पदार्थ म्हणजे त्या प्रदेशाची ओळख ठरावा.
आर्थिक वर्ष २०१६-१७ चा अंतिम दिवस म्हणजे ३१ मार्च. एप्रिल महिन्यांपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होते.या आर्थिक वर्षाला निरोप देण्याआधी प्राप्तिकराच्या बाबतीत काही आवश्यीक कामे आपण ३१ मार्चआधी न विसरता करून घ्यायला हवीत, प्रचलित प्राप्तिकर कायद्यानुसार करदाता आपले मागील दोन आर्थिक वर्षांचे प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकतो. याचा सोप्या भाषेत अर्थ असा, की जर आपले आर्थिक वर्ष २०१४-१५ चे विवरणपत्र काही कारणास्तव दाखल करायचे राहून गेले असल्यास ३१ मार्च २०१७ ही अंतिम तारीख आहे, हे विसरता कामा नये.
आर्थिक वर्ष २०१४-१५ च्या प्राप्तिकर विवरणपत्राबाबत.
सामान्यपणे आर्थिक वर्ष संपले, की ३१ जुलै ही त्या संपलेल्या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र दाखल करावयाची देय तारीख असते. परंतु, बऱ्याच करदात्यांकडून देय तारखेपर्यंत असे विवरणपत्र दाखल होत नाही. अशाच प्रकारे जर आपले आर्थिक वर्ष २०१५-१६ चे विवरणपत्र अजूनही सादर केले गेले नसल्यास ते ३१ मार्च २०१७ च्या आधी दाखल करावे, खरे तर ३१ मार्च २०१७ नंतरही आपण आर्थिक वर्ष २०१५-१६ चे विवरणपत्र दाखल करू शकता. परंतु, ३१ मार्च २०१७ नंतर आपणास पाच हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. या दोन्ही आर्थिक वर्षांच्या विवरणपत्राबाबत तुम्ही देय तारखेनंतर विवरणपत्र दाखल करत असल्यामुळे आपल्याला दुरुस्तीपत्र दाखल करता येणार नाही.
अॅडव्हान्स टॅक्स बद्दल.
खरे तर आगाऊ कर हा सुद्धा टप्याटप्याने भरला गेला पाहिजे. परंतु तो भरला नसल्यास आताही वेळ गेलेली नाही, कारण ३१ मार्च २०१७ पर्यंत आर्थिक वर्ष १६-१७ साठी भरला गेलेला प्राप्तिकर हा आगाऊ करच असतो. थोडक्याणत सांगायचे तर ज्यांचा देयकर १० हजार रुपयांपेक्षा जास्त येत आहे, त्यांनाच आगाऊ कराच्या तरतुदी लागू आहेत. तसेच असे ज्येष्ठ नागरिक (वय ६० वर्षे किंवा जास्त) ज्यांना उद्योगधंदा अथवा व्यवसायातून काहीही उत्पन्न नसल्यास, त्यांनाही आगाऊ कर भरणे सक्तीचे नाही. अशांनी येणारा देय प्राप्तिकर आपले विवरणपत्र दाखल करण्याआधी भरला तरी चालू शकेल. नव्या नियमानुसार, जे व्यापारी एकूण उलाढालीच्या किमान आठ टक्के निव्वळ नफा दाखवून प्राप्तिकर कलम 44 ए.डी अंतर्गत विवरणपत्र दाखल करतात, अशांना देखील आता मार्च महिन्यातील आगाऊ कराचा हप्ता भरणे जरुरीचे केले आहे. आगाऊ कर न भरल्यास अथवा कमी भरल्यास व्याजरुपी ओझे करदात्याला सोसावे लागू शकते.
पगार सोडून इतर करपात्र उत्पन्न असल्यास (व्यवसाय, भाडे, मुदत ठेवींवरील व्याज, भांडवली नफा आदी) आणि असे उत्पन्न आपल्या कंपनीने घोषित केले नसल्यास त्यावर बसणाऱ्या कराची गणना करून आगाऊ कर भरला गेला पाहिजे. बॅंक आपळ्या व्याजातून करकपात करत असते, पण अशा करदात्यांनी लक्षात घ्यावे, की बॅंक ठेवींच्या व्याजातून केवळ १० टक्के दराने करकपात केली जाते. परंतु, जर तुमचे वार्षिक एकूण निव्वळ करपात्र उत्पन्न पाच लाख अथवा दहा लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही अनुक्रमे २० टक्के आणि ३० टक्के कर दरात येतो. तेव्हा केवळ १० टक्के करकपात पुरेशी नाही, हे लक्षात ठेवा.
प्राप्तिकर बचतीसाठीच्या गुंतवणुकीसारखी इतरही काही कामे आहेत, जी आपण ३१ मार्च २०१७ पूर्वी आवर्जून पूर्ण करायला हवीत.
एनपीएस
एनपीएस टियर १ अकाउंट होल्डर्ससाठी महत्वाचं आहे की, त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये प्रत्येक आर्थिक वर्षात १००० रुपये डिपॉझिट करावे. ज एनपीएस टियर १ अकाउंट होल्डर्सने असे केले नाही तर त्यांचं अकाउंट ३१ मार्चपूर्वी फ्रिज होईल.
पीपीएफ अकाउंट
पीपीएफ अकाउंटमध्ये पेनल्टीपासून वाचण्यासाठी तुम्हाचं वार्षिक योगदान कमीत कमी ५०० रुपये असायला हवं. जर तुम्ही असं करु शकला नाहीत तर तुम्हाला ५० रुपयांची पेनल्टी द्यावी लागेल. पीपीएफ अकाउंटमध्ये ५०० रुपये डिपॉझिट करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.वर फक्त महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केलेला आहे, जेणेकरून नंतर करदात्याला त्रास होणार नाही, हाच त्यामागचा उद्देश!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
५ जून १६७४ व ६ जून १६७४: या दोनही दिवशी राज्याभिषेकाचे मुख्य विधी संपन्न करण्यात आले. अनेक नद्यांचे व समुद्राचे जल रायगडावर मागविले गेले होते. या दिवशी अनेक होमहवन करण्यात आले, यजमानांची औदुंबर शाखांचे असं करवून घेतले होते आणि मग होमहवन संपन्न झाल्यावर शिवरायांनी स्नान केले आणि अभिषेक शाळेत दाखल झाले आणि तेथील सिंहासनावर आरूढ झाले. मग ब्राह्मणांनी मंत्रांच्या घोषात शिवरायांवर अभिषेक केले. या अभिषेकावेळी शिवरायांचा हात धरून ब्राह्मणांनी ‘महते क्षत्राय महते अधित्यात महते जानराज्यायेष व भरता राजा सोमोअस्माकं ब्राह्मणानांच राजा’ अशी घोषणा केल्याचा उल्लेख देखील सापडतो. (मराठ्यांचा इतिहास, रा.वि. ओतूरकर)
भारतातील अनेक शहरांमध्ये सहसा पादचाऱ्यांची सोय आणि सुरक्षितता ह्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. पुण्यामध्ये मात्र स्ट्रीट डिझाईन गाईडलाइन्स, पादचारी धोरण, नॉन मोटर राईड वाहतूक समिती अशा अनेक घटकांमुळे हे चित्र पालटण्यास काही अंशी सुरुवात झाली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti