अग्रलेखांचा दबदबा
लेखसंग्रह

अग्रलेखांचा दबदबा

Category:

 

२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या या गळचेपीला विरोध कसा करायचा यावर संपादक आणि वृत्तपत्र मालकांमध्ये सखोल विचारमंथन झाले. त्यातून वेगवेगळे पर्याय समोर आले. वृत्तपत्रातील सर्वात महत्त्वाचे पान मानले जाते ते म्हणजे संपादकीय पान. त्या पानावर संपादकीय व विविध विषयांवर मते मांडणारे लेख व स्तंभ प्रकाशित होतात. त्या पानातून संबंधित वृत्तपत्राची विचारसरणी आणि भूमिका स्पष्ट होत असते.

आणीबाणी लागू झाल्यावर या संपादकीय पानांतून वृत्तपत्रांचे खरे स्वरूप स्पष्ट होऊ लागले. काही वृत्तपत्रांनी माध्यमांची ही मुस्कटदाबी निमूटपणे मान्य केली.कारण त्यांना त्यांचे वृत्तपत्र चालवायचे होते, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे जीवन त्यावर अवलंबून होते. मात्र इंडियन एक्सप्रेस, स्टेट्समन, मराठवाडा यासारख्या काही मोजक्या दैनिकांनी अग्रलेखाची जागा कोरी सोडून बाणेदारपणा दाखविला. आमच्या विचारांवर तुम्ही बंधने घातली म्हणून आम्ही आमचे विचार ज्या जागेवर मांडतो ती जागाच कोरी सोडत आहोत अशी ती अव्यक्त निषेधाची भूमिका होती. त्याची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. हा एकच प्रसंग वृत्तपत्रांच्या आयुष्यात ‘अग्रेलखा’ चे महत्त्व किती आहे सांगण्यास पुरेसा ठरावा. या अनोख्या निषेधाची नोंद जगाने घेतली. अग्रलेखाची ती कोरी जागा, आणीबाणीच्या विरोधातील जनतेच्या मनातील आक्रोशाची अभिव्यक्ती ठरली.

No Picture
लेखसंग्रह

नवरंगी साड्या – संस्कृती की मार्केटिंग ?

Category:

 

नवरात्रीच्या नऊ रंगाचे कपडे नऊ दिवस घालायचे आणि फोटो काढून पाठवायचे. एक मजेचा भाग म्हणून छान वाटतं. पण ही काही परंपरा / धार्मिक रीत आहे का? अजिबात नाही. फेसबुक आणि सोशल मीडियाच्या काळाआधी म. टा. / लोकसत्तेच्या पुरवणी मधून नवरात्रीचे नऊ रंग छापून येऊ लागले. त्याबरोबर वेगवेगळ्या ऑफिसेस मधले ग्रुपफोटो छापायला लागले. प्रसिद्धी मिळाल्याने अजूनच हे प्रस्थ पसरत गेले.

मन सहाजिकच भूतकाळात गेले. आई आजी कडे होत्या का एवढ्या साड्या आणि त्या ठेवायला मोठे वॉर्डरोब. घरात एक दोन कपाटं, त्यातले १-२ कप्पे मिळायचे. त्यात ५-६ नेहेमीचे कपडे,२-४ ठेवणीतले. त्यात नऊ रंगाचे कपडे मिळणं केवळ अशक्य. नवरात्रीतला भोंडला, सोसायटी/गल्लीतला रोजच्या कपड्यातला गरबा, अष्टमीला देवीचे दर्शन ह्या कशालाच पैसे लागत नसतं पण आनंद, भक्तीभाव, उत्साह हमखास असे.

मोबाईल – एक खाजगीपण
लेखसंग्रह

मोबाईल – एक खाजगीपण

Category:

 

काल परवाचीच गोष्ट एकजण एका जुन्या मित्राशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत असताना तो म्हणाला मला अमुक तमुक अँप वर फोटो टाकता येत नाही. काहीतरी शोधण्यासाठी त्याने त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला , पण ते अँप मी ओपन करताच घाई घाई ने त्याने माझ्या हातून मोबाईल घेतला.

हे तुमच्याही बाबतीत किंवा घरात घडले असेल, अगदी नवरा बायको ह्यांच्या बाबतीत देखील.. माझ्या फोन ला हात का लावला वगैरे. मी तर माझा फोन कधीच लॉक करत नाही पासवर्ड ने.

साला आपली जिंदगी तो खुली किताब हैं.

बायको मात्र नेहमी ह्या न त्या कारणाने माझा फोन घेते, तिचा फोन मात्र लॉक असतो , मला तिने अनेक वेळेला तिचा पासवर्ड सांगितला पण तो मी विसरतो म्हणा लक्षात ठेवायची गरज भासत नाही.

No Picture
लेखसंग्रह

एक भारतीय नागरिक

Category:

 

मी, प्रिया उपासनी, एक भारतीय नागरिक. भारत एक विकसनशील देश आहे. भारतात सद्ध्या खूप बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. रोज आपण पुढे पुढे जात आहोत. दररोज आपण प्रगती करत आहोत. पण खरच आपण प्रगती करत आहोत का? आपला देश कृषिप्रधान देश आहे आणि त्यापासून आपण दूर जात आहोत असे चित्र दिसत आहे. प्रगती, विकास जरूर व्हावा पण प्रकृतीकडे, पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाले नाही पाहीजे. दुर्दैवाने आज परिस्थिती बरोबर विरुद्ध दिसत आहे.

सुपिक शेतजमिनी विकल्या जात आहेत. त्यावर मोठमोठ्या इमारती बांधण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याची, रस्त्यांची, विजेची व्यवस्था या संबधीत कोणताही विचार केला जात नाही. हे शहरी भागांपूरते मर्यादित नसून गावागावात सुद्धा हे चित्र दिसायला लागले आहे.

‘संकल्प’ आणि संकल्प सिद्धी ?
लेखसंग्रह

‘संकल्प’ आणि संकल्प सिद्धी ?

Category:

 

डिसेंबर महिना चालू झाला  की ‘संकल्पाचे’ वारे सुरू होतात . मी सुद्धा पंधराव्या वर्षापासून  काही ना काही संकल्प करायचा ठरवीत असे . पण अनेक वेळा  जानेवारी महिना संपण्यापूर्वीच  तो  मोडलेलाच असायचा.    संकल्प करणे  म्हणजे  काय? संकल्प म्हणजे ‘कृती’ नव्हे.  ती गोष्ट  प्रत्यक्षात आणता आली पाहिजे.

शाळेत असताना  खूप अभ्यास करून  खूप खूप गुण मिळवायचे  असा  माझा संकल्प असे . पण  गणपती ,नवरात्र , दिवाळी  आणि डिसेंबर मधल्या सहली , स्नेहसंमेलन , क्रीडा स्पर्धा  यात  मी  इतकी  गुंतली  जात असे की , मी केलेल्या संकल्पाचा मलाच विसर पडत असे .

महाविद्यालयात  गेल्यावर  इंग्रजी  माध्यम असणार , तेव्हा  आपल्याला इंग्रजीचे ज्ञान  असणं  आवश्यकच आहे . म्हणून मी इंग्रजी- मराठी शब्दकोशातून  पाच-सहा शब्द , त्यांचा उच्चार  आणि अर्थ जाणून  लक्षात ठेवत असे . हळू हळू  हा संकल्प सुद्धा  अर्धवटच सोडला  गेला .

आई पोळी भाजी करायला मुद्दाम सांगत असे . पण  रोज रोज  तेल – मोहरी – हिंग- हळद  घालून  तीच , तीच फोडणी  चार दिवस शिकल्यावर  मला अगदी कंटाळा आला . म्हणून स्वयंपाक घरातील कोणत्याही  संकल्पाचा विचार करायचाच नाही , असं मी त्याचवेळी ठरविलं.

थोडी मोठी झाल्यावर  ‘संकल्प’ म्हणताच , मला   १२ जून १९२९ रोजी जन्मलेल्या नेदरलँड्सच्या ‘ॲना  फ्रँकची’ आठवण यायची. ॲडॉल्फ हिटलर आणि नाझी पक्षाने जर्मनीवर नियंत्रण मिळवल्यानंतर, ज्यूंचा छळ चालू  केला, नाझी  सैनिकांच्या अत्याचारापासून स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ॲन फ्रँकच्या  वडिलांनी कुटुंबासह ६  जुलै १९४२ ला अ‍ॅम्स्टरडॅममध्ये एका बिल्डींगमधील सिक्रेट खोलीमध्ये लपून बसण्याचा निर्णय घेतला. राहत्या घरात लपून बसलेल्या फ्रॅंक कुटुंबाला भयानक जीवन जगावे लागले.

No Picture
लेखसंग्रह

दुसर्‍या महायुद्धातील ‘ही शर्यत रे अपुली’

Category:

 

‘ही शर्यत रे अपुली’, ससा आणि कासवाच्या शर्यतीवरील गीतातली ही ओळ आहे. शिक्षण, व्यवसाय, क्रीडा वगैरे क्षेत्रात स्पर्धा, शर्यत असते. लढाया जिंकत जिंकत अंतिमतः युद्धात बाजी मारणे हे युद्धाचे उद्दिष्ट असते. शर्यतीत प्रतिस्पर्ध्यावर मात करावी लागते. हिटलरला युरोप जिंकून साम्राज्य वाढवायचे होते. हिटलरचे प्रतिस्पर्धीं त्याला थोपवायचा प्रयत्न करीत होते. या मित्र पक्षांचा गट बनला होता. युद्धात न उतरलेला एक देश मित्रपक्षांचा सोबती होता.

जर्मनीत 1920 मधे नाझी पक्षाचा उदय होत होता. आर्य हे श्रेष्ठ आहेत, त्यांचेच वर्चस्व असायला हवे, अशी हिटलरची समजूत होती. ज्यूंचा नाश करण्याच्या नाझी पक्षाच्या निर्धारामुळे, जर्मनीतूनच काय इतर युरोपीय देशातूनही ज्यू परागंदा होऊ लागले. नामवंत ज्यू शास्त्रज्ञ, कलावंत, व्यावसायिक यांना असुरक्षित वाटू लागले. अमेरिका, पॅलेस्टाईन, ग्रेट ब्रिटन, मध्य व दक्षिण अमेरिका या देशात ते आश्रयास जाऊ लागले. हिटलर सत्तेत येताच राज्यातील सर्व आस्थापनांमधून ज्यूंची हकालपट्टी केली गेली. हिटलरने 1938 पर्यंत जर्मनीवरच लक्ष केंद्रित केलं होतं. दुसरे महायुद्ध 1939 मधे सुरू होण्यापूर्वी अनेक शास्त्रज्ञ अमेरिकेत पोचले होते. वर्नर हायसेनबर्ग सारखे काही शास्त्रज्ञ देशप्रेमापोटी जर्मनीत राहिले.

सिने मे जलन
लेखसंग्रह

सिने मे जलन

Category:

 

प्रत्येकाचा एक काळ असतो तसा तलतचा ही काळ होता, नव्हे आजही आहे. वार्धक्यामुळे व्यक्तिमत्त्वाला घरघर लागते पण प्रसिद्धीला कधीच घरघर लागत नाही. पुस्तके कपाटात बंद असली तरीही त्यांचा इतिहास कधीच बंद होत नाही. तरल अनुभव काय असतो हे तलत कडून शिकावं.

टेलिफोनवर गाणं म्हणणं ही कल्पना आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. गाणं म्हणजे नायक नायिकेंचा धुसमुसळेपणा पाहण्याच्या सवयीला छेद देणारं हे गाणं तरलतेचा रेशमी अनुभव देतं.आपल्या मनातील दर्द सांगत असताना किती संयमीत पद्धतीने तलत यांनी ते गाणं म्हटलं आहे.

No Picture
लेखसंग्रह

दिसण्यावर जाऊ नका असण्यावर जा

Category:

 

ओठाकडे लक्ष द्यायला मला अभ्यासातून ना वेळ मिळाला न मिळणार आहे मला आयआयटी करायचे आहे, त्यांना जे वाटते ते त्यांनी लिहिले मला त्यांच्या बोलण्याची काहीच वाटत नाही ते तितके महत्त्वाचे नाही सुद्धा. 55 लाख विद्यार्थ्यांमधून यु.पी.बोर्डातून प्रथम येणारी प्राची निगम वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली. अस्तित्वाचा स्विकार करतांना वैगुण्यावर व वैगुण्यासह सत्वता:वर प्रेम करता आलं की लोकांना अस्तित्वाच्या चांगल्या अंगाची दखल घ्यावीच लागते. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरिक सौंदर्य शेवटी मनुष्याला घडवतं.मनुष्य हा परिपूर्ण कधीच नसतो. प्रत्येकामध्ये गुण आणि वैगुण्य असतातच. आपल्यातलं एखादं वैगुण्य विसरून स्वतः स्वतःवर प्रेम करत ध्येयाकडे वाटचाल केली की यश आपलच असतं. धडधाकट लोकच इतिहास घडवितात असं नव्हें, तर अंध, अपंग,लुळेपांगळे, वाळीत टाकलेले यांनी सुद्धा इतिहास घडविला आहे, प्रेरणेची पायवाट निर्माण केली आहे. शेक्सपियरने म्हटल्याप्रमाणे नावात काय आहे तसंच दिसण्यात काय आहे हे प्राची ने दाखवून दिले आहे. ब्रेन अंध असूनही त्याने ब्रेल लीपी तयार करून अंधासाठी प्रेरणेची पायवाट निर्माण केली. समाज माध्यमातील स्वैराचारा मुळे आज कुणालाही टारगेट केले जात आहे.

No Picture
साहित्य - ललित

तुला शिकवीन चांगलाच धडा

Category:

 

त्यांनी कार सिग्नलवर थांबवली आणि ते सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहू लागले. एका मागे एक गाड्या यंत्रवत उभ्या रहात गेल्या. नेहमीच हो काही क्षणांची प्रतीक्षा सतीश कुमार यांच्यासाठी विचित्र प्रकारची असते. अश्याच कुठेतरी बसलेल्या व्यक्तीशीच याची तुलना होऊ शकते. अशा व्यक्तीच्या मनात न कुठले विचार असतात… न समोर बघण्यासारखे एखादे दृश्य असते. ती व्यक्ती अचल, स्थिर असते. आपल्यातच मग्न असते. जगात काय घडते आहे याची त्या व्यक्तीला कल्पनाच नसते. जे काही घडते आहे त्याच्याशी तिला काही घेणे देणे नसते. सिग्नलवर देखील लाल, हिरवा दिवा बघण्याशिवाय त्या व्यक्तीच्या मनात इतर कोणताही विचार नसतो. कोणतीही कविता, कोणतेही गीत नसते. फक्त इतकेच लक्ष असते की, दिवा हिरवा होईल तेंव्हा एक्सीलेटर वरचा पाय दाबून कारला गती द्यायची आहे.

नऊ वाजले होते आणि सतीश कुमार यांना भूक लागली होती. ते घाईने घरी पोहोचण्यासाठी बेचैन होते. पण शहरातील ही गर्दी पंधरा मिनिटाचा रस्ता एक तासाचा करते.