आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेंव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको.
तेलात आंम्हास पोहावयाचे नाही, तेंव्हा तवंगाचा तलाव नको.
श्रीखंड असेल तर वाटी चमचा हवाच, उगाच श्रीखंड बचकन पानात वाढू नये...
आम्ही बोटाने चाटत श्रीखंड खात नाही...श्रीखंडाशी अशी प्रतारणा आम्हास मान्य नाही...
आळुच्या भाजीतील शेंगदाने आख्खे असावे, उगाच तुकडे तुकडे टाकू नये... तसेच खोबरे देखील पाउण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको.
मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ,साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आल, कोथिंबीर योग्य प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते 5 ते 6 मी.मी. पेक्षा जास्त लांबीचे नको.
वरणाची डाळ एक-पात्रीच हवी, नाहीतर चव बदलते.
पापड-कुरडई मरतुकडे नको....त्याच्यातला कुरकुरीतपणा निघुन गेल्यास आमची कुरकुर सुरु होईल...
गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे.
ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी ...तिखट नको...
त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारख तिखट त्यात उधळू नये...
आता पान वाढावयाच्या सूचना -
पाट मांडून त्यासमोर छान रांगोळी घालावी..
पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे...
पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग शून्य अंश पकडून मिठ वाढावे आणि त्याच्या उणे पाच अंशावर लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे वाढावे...
आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेंव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको.
तेलात आंम्हास पोहावयाचे नाही, तेंव्हा तवंगाचा तलाव नको.
श्रीखंड असेल तर वाटी चमचा हवाच, उगाच श्रीखंड बचकन पानात वाढू नये…
आम्ही बोटाने चाटत श्रीखंड खात नाही…श्रीखंडाशी अशी प्रतारणा आम्हास मान्य नाही…
आळुच्या भाजीतील शेंगदाने आख्खे असावे, उगाच तुकडे तुकडे टाकू नये… तसेच खोबरे देखील पाउण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको.
मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ,साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आल, कोथिंबीर योग्य प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते 5 ते 6 मी.मी. पेक्षा जास्त लांबीचे नको.
वरणाची डाळ एक-पात्रीच हवी, नाहीतर चव बदलते.
पापड-कुरडई मरतुकडे नको….त्याच्यातला कुरकुरीतपणा निघुन गेल्यास आमची कुरकुर सुरु होईल…
गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे.
ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी …तिखट नको…
त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारख तिखट त्यात उधळू नये…
आता पान वाढावयाच्या सूचना –
पाट मांडून त्यासमोर छान रांगोळी घालावी..
पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे…
पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग शून्य अंश पकडून मिठ वाढावे आणि त्याच्या उणे पाच अंशावर लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे वाढावे…