इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
रसिकहो तुम्ही कधी अक्षरश: प्रेमात पडला आहात का? अक्षरश: हा शब्द कंसात बर का. सदर असेल तर गदिमांच्या या गीतात तुम्हाला ते प्रेमाचे क्षण पुन्हा एकदा वेचता येतील, अनुभवता येतील. ज्या चित्रपटात गदिमांनी स्वतः नायकाची भूमिका केली होती, त्या सौभाग्य चित्रपटातलं हे गीत. गदिमांच्या नायिका होत्या बेबी शकुंतला आणि सुलोचना. आणि संगीत अर्थातच सुधीर फडके यांचं.


आपल्या वेगळ्या शैलीने, लेखनातील सातत्याने केल्या जाणार्या प्रयोगांमुळे, कथानकातील वैविध्यामुळे, रंगनाथ पठारे ही नाममुद्रा मराठी साहित्य विश्वात स्थिरावली आहे. जगण्याचा प्रचंड मोठा कॅनव्हास निवडून, पठारे गेली चार दशकं सातत्याने लिहित आहेत.
सहज प्रश्नाला मिळालेल्या ऊत्तराने तगमगलेल्या गदिमांनीही मग त्यांना ‘कविकुळाला’ साजेल् असे ऊत्तर दिले.
चमत्कार फक्त पुराणकाळातच घडत होते असं आपण् मानतो.पण गीतरामायणाच्या सुवर्णमहोत्सवात माझ्या साक्षीनं घडलेला तो प्रसंग म्हणजे केवळ चमत्कारच!
त्या फुलांच्या गंधकोषी हे गाणे पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीत व स्वरबद्ध केलेले एक अविस्मरणीय गाणं आहे. ह्या गीताचे गीतकार सूर्यकांत खांडेकर हे आहेत.
लौकिक अर्थाने भारताचा पहिला मुकचित्रपट म्हणून ज्याची ख्याती आहे असा राजा हरिश्चंद्र ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित झाला अन् भारतात रुपेरी तसंच मनोरंजन उद्योगाचा उदय झाला, जो आजतागायत सुरु आहे आणि राहील.
घरच्या घरी चॉकलेट कसे बनवतात याचे प्रात्यक्षिक या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे.
https://www.youtube.com/watch?v=g2fMBQrWN8g
पक्के 'काँग्रेसवाले' असणारे गदिमा 'कोणे एके काळी' गणवेश घालून चक्क संघाच्या शाखेत का जात होते?
https://www.youtube.com/watch?v=nRr7B_Ms-lA
श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( पिठापूर ) | Shree datta sthan mahatmya darshan ( PITHAPUR )
पिठापुरम हे भारतातील आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात स्थित दत्त क्षेत्र आहे. पीठापुरमला दक्षिणा कासी (किंवा दक्षिण काशी) म्हणूनही ओळखले जाते. पिठापुरम पूर्वी पेठापुरम किंवा पेथीकपुरम म्हणून ओळखलं जात असे. या जागेला १८ शक्तीपीठांपैकी १० वे शक्तीपीठ मानलं जातं. सतीदेवीच्या प्रेताचे काही भाग पडण्याविषयी पौराणिक कथांमध्ये म्हटले आहे की, जेव्हा भगवान शिवने सतीचे शव घेतले आणि भटकले त्यावेळी सतीच्या शवाचे श्रीहरिंनी सुदर्शन चक्राने विभाजन केल्यावर पाठीचा एक भाग पिठापुरला पडल्यामुळे त्या ठिकाणास 'फुर हुत्तिका शक्ती पीठ' उत्पन्न झाले. भगवान दत्तात्रेय येथे स्वयंभू होते. याचा अर्थ असा की मंदिरात उपस्थित असलेल्या मूर्ती कोणाच कोरलेल्या नाहीत. त्याऐवजी ते स्वत:हून प्रकट झाले आहेत. इतर दत्त क्षेत्रांप्रमाणे मूर्तीची पूजा येथे केली जाते. श्रीपाद वल्लभ चरिताने हे सिद्ध केले आहे की इ.स. १३५० पासून अप्पाला राजा शर्मा (श्रीपादांचे वडील) यांनी दत्ताची पूजा केली होती.पुढे दत्त महाराजांचे मंदिर उभारले गेले आणि खाली एक औदुंबर वृक्ष लावला गेला ज्याच्या खाली आपण परमेश्वराच्या पायाचे ठसे म्हणजेच पादुका पाहू शकतो. येथे श्रीपादांची मूर्तीही ठेवली आहे.
स्थानिकांचा असा विश्वास आहे की जर कोणी या दत्त मंदिरात गेले आणि त्यांनी आपली इच्छा पूर्ण होण्याची आकांक्षा बाळगली तर त्यांची नक्कीच इच्छापूर्ती होते. इच्छापूर्तीसाठी त्यांनी नारळ बाळगला पाहिजे आणि पूजा केल्यावर नारळ परमेश्वराच्या मूर्तीच्या मागे ठेवल्यावर ३ महिन्यांतच इच्छा पूर्ण होतात असा तेथील सगळ्यांचा विश्वास आहे.
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका
गदिमांच्या गीतांचं भाग्य असं कि त्यांच्या एकेका गीताला चारचार पाचपाच चाली वेगवेगळ्या संगीतकारांनी लावल्या. पण त्यातली नेमकी कोणती चाल लोकप्रिय झाली?
Copyright © 2025 | Marathisrushti