इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
रामजोशी गदिमांनी लिहिलेला पहिलाच चित्रपट! चित्रणाला ऊपस्थित राहण्यासाठी त्यांना शांतारामबापूंनी अनुमती दिली. आणि मग सुरू झालं ‘खरं’ शिक्षण!!
हिंदीवाल्यांच्या चित्रकथेच्या ‘जाणकारी’ बद्दल ‘अपवाद’ वगळता गदिमांचं फारसं चांगलं मत नव्हतं. त्यामुळे ते शक्यतो त्यांना झटकून टाकत असत. पण कधीकधी अशा गमती घडत कि गदिमांनासुद्धा ‘माघार’ घ्यावी लागे…
भारतीय स्वातंत्र्ययुद्धात 1857चा उठाव, हे क्रांतीचं पहिलं पर्व मानण्यात येतं. बॅरकपूर छावणीत मंगल पांडे यांनी ब्रिटिशांविरुद्धातल्या युद्धाची आरोळी ठोकली. सार्जंट ह्यूसन आणि लेफ्टनंट बॉ यांना यमसदनाला पाठवून सुरू झालेल्या या युद्धामुळे 3 मे 1857 रोजी दिल्ली ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त झाली. दुर्देवाने हा विजय केवळ 133 दिवसांचा ठरला.
गिरीनार क्षेत्र हे भारतातील एक प्राचीन दत्तक्षेत्र आहे. हे भारतातील गुजरात राज्यातील सौराष्ट्र भागातील जूनागड शहरात आहे. गिरीनार डोंगर हे भगवान दत्तात्रेयांचं प्रसिद्ध सिद्ध क्षेत्र आहे.
ते मला फार लागट बोलले. म्हणाले “तुझी झोपडपट्टीसमोर बसूनबिडी प्यायची सुद्धा लायकी नाही”. मग मी ठरवलं इथून पुढे यांच्याकडून एक पैसासुद्धा घ्यायचा नाही
महात्मा गांधी भारताला लढाया, हिंसाचार,आक्रमण, युद्धांचा फार मोठा इतिहास आहे. पण याच देशात शस्त्राविना स्वातंत्र्ययुद्ध लढलं जाऊ शकतं आणि जिंकताही येतं, हे दाखवून दिलं महात्मा गांधींनी. म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अहिंसक क्रांतीचे जनक असलेल्या या राष्ट्रपित्याला वंदन करताना ऊर अभिमानानं भरून येतो.
https://www.youtube.com/watch?v=QpALI5OM9i4
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
कोरोना महामारीच्या काळात लस किती महत्वाची आहे हे सर्वशृत आहे. या कवितेत लस मिळविण्यासाठी एक सामान्य माणसाच्या मनात काय भावना आहेत याचं एक भावनिक चित्र उभे करण्यात आलेले आहे.
माडगूळकर कुटुंबाने अनेक जागा बदलल्या. मग ती कोल्हापूरची मेस्त्रींची बंगली असो, प्रभात रोडवरचं एकनाथ् धाम असो नाहीतर पंचवटी! त्या घरातली एक खोली नेहेमीच राखीव असायची ! उपाधेकाकांची खोली !!
Copyright © 2025 | Marathisrushti