(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • विमर्श कथा : ५

    खेळण्यातला लाकडी ट्रक घेऊन धावत येणाऱ्या सावलीला बघून बाबा थांबला . डोक्यावरचे मक्याच्या कणसांचे पोते खाली ठेवले आणि घाम पुसत उभा राहिला . सावलीने त्या पोत्यातली तीन कणसे ट्रकमध्ये ठेवली आणि दोरीने बांधलेला ट्रक घेऊन ती निघाली . बाबा तिथेच थांबलेला बघून तिने कमरेवर हात ठेवले आणि ठसक्यात म्हणाली , ” दमतोस ना म्हणून म्हणते एकट्याने काम करू नको , आता मी करते मदत . तू ये हळूहळू. “

  • अजब न्याय नियतीचा – भाग ७

    आरूने तिचे शेड्युल पाहून १२ ते १५ फेब्रुवारी या तारखा गांवी जाण्यासाठी नक्की केल्या. जाण्यापूर्वी तिला तिच्या पूर्ण ऑर्केस्ट्रामधील इतर मित्रमंडळींना प्रॅक्टिस संबंधी महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या. चार-पाच दिवसांसाठी ट्रीपला जात असल्यामुळे घरातील इतर गोष्टींची व्यवस्था लावायला हवी होती. गांवी लागणाऱ्या वस्तूंचे शॉपिंग करायचे होते.

  • तो ची एक पाठिराखा

    (लेखक – विवेक माधव, आम्ही साहित्यिक ग्रुप) बबन्या. एक सर्वसाधारण हमाल. रोज हमाली करून जे मिळेल त्यात समाधानाने गुजराण करणारा एक सामान्य माणूस. आज तो एका कारखान्या बाहेर उभा होता. तो कारखाना होता मुर्त्यांचा. आज गणेश चतुर्थी. कितीतरी लोक आपण निवडलेले गणपती आज त्या कारखान्यातुन आपल्या घरी नेत होते. त्यांना गणपतीची मुर्ती उचलून देताना तो मदत करत होता. कोणी काही बिदागी दिली तर……

  • राजकन्या आणि सिंह

    ओ हेन्रीच्या ह्या कथेची नायिका राजकन्या जोसेफा निर्भय, चतुर शिकारी आहे. गीव्हन्स तिच्यावर छाप पाडण्यासाठी खोटं बोलतोय, हे तिला लगेच लक्षांत आलं. त्याला वाटत असतं की तो सिंह आपला पाळीव प्राणी होता, असं सांगून तो तिला फसवतोय.

  • एक परीस स्पर्श – भाग २

    त्या पूजेच्या होमातील अंगारा दिला होता गुरुजींनी तीन महिने नित्य नियमाने लावायला. विजयनेही तो नित्य नियमाने लावला. पण विजयच्या मनात काही लग्नाचा विचार येत नव्हता कारण विजय कोणाच्यातरी प्रेमात पडलेला होता !

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल (प्रकरण १)

    एकदोन वेळा बिपीन घरी आला होता, पण आई बरोबर संवाद नवता, आणि दोघांची मनाची तार जुळलीच नव्हती, संगीता मात्र त्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडलेली होती. संगीताच्या लग्नाच्या निर्णयाने आई पार ढासळून गेली, आपल्या परीने समजावण्याचे प्रयत्न केले. प्रचंड झंजावातात दोघी एकमेकीं पासून दूर फेकल्या गेल्या होत्या.

  • या चिमण्यांनो परत फिरा रे

    एखाद्या देशाला उद्ध्वस्त करायचं असेल तर त्या देशाच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड गोंधळ , गुंता करून ठेवा . देश केव्हा उद्ध्वस्त होईल हे कुणाला कळणारही नाही . हे कुणी म्हटलं होतं कुणास ठाऊक , पण ते सत्य होतं . अगदी पूर्वनियोजित कारस्थान असावं तसंच चाललं होतं . विद्यार्थी केंद्रीभूत शिक्षणव्यवस्था , बक्कळ पैसा देणारी इंडस्ट्री केव्हा झाली , हे धुरीणांच्या लक्षात सुद्धा आले नाही . त्या व्यवस्थेत विद्यार्थ्यांचे स्थान केवळ कच्चा माल या स्वरूपाचे झाले आणि त्यांचे पालक कच्च्या मालाचे वाहक झाले .

    त्यात विद्यार्थी कुठं होता ?
    त्याच्या मनाचा , बुद्धीच्या स्तराचा आणि शारीरिक क्षमतेचा विचार कुठं होता ?
    त्याच्या अंगभूत गुणांचा विचार कुणी , कधी केला होता ?
    शारीरिक विकासासाठी मोकळी मैदाने लागतात , त्याचा विचार कुठं होता ?
    चार भिंतींची शाळा आणि एकत्रित शालेय सहजीवन खूप काही शिकवत असते , याचा विचार कुठं होता ?

  • चतुर्भुज गोमु (गोमुच्या गोष्टी – क्रमांक २०)

    गोमुच्या आणि परीच्या प्रेमप्रकरणाची सुरूवात मी तुम्हांला सांगितली.
    पण माणूस योजतो तसंच सर्व तडीस गेलं तर आयुष्य किती सोपं होईल. कांहीजणांच म्हणणं असतं की आयुष्य आपणच कठीण करत असतो. आपला दृष्टीकोन सकारात्मक असला की अर्धा भरलेला ग्लास दिसतो आपल्याला. अर्धा रिकामा आहे हे जाणवत नाही वगैरे, वगैरे. पण ज्याच्यावर प्रसंग येतो, त्यालाच त्याची गंभीरता कळते. इतरांना “त्यात काय एवढं !” असंच वाटतं.

  • तोंडचं पाणी

    पळत पळत तो मॅनेजरकडे गेला. पाणी कसं येणार ? सर्व इमारती पूर्ण झाल्यावरच पाणी मिळेल. तोपर्यंत काय ? तोपर्यंत टँकरनं पाणी पुरवठा. रात्री दहा-बारा टँकर आले. इमारतींच्या टाकीत पाणी टाकून गेले. ते पाणी दोन तासात संपलं. रात्रीपर्यंत ठणाणा. रात्री पाणी आलं. लोकांनी ते आपल्या टाक्यांत साठवल. दोन तासात पाणी संपलं.

  • रविवार बंद

    मजबूत शरीरयष्टी, पिळदार मिशा आणि बऱ्यापैकी उंच असलेले रुबाबदार दूध काका त्यांची अगदी स्वच्छ, चकचकीत आणि नजरेत भरेल अशी खास पितळ्याची किटली सायकलला अडकवून दररोज पहाटे घरोघरी दूध घेऊन जायचे. अगदी नित्यनेमाने. इतर कुठल्याही दुधाचा दर्जा या दूध काकांकडच्या दुधाच्या जवळपास सुद्धा नव्हता. भरपूर साय यायची, तूप उत्तम व्हायचं. अगदी मन लावून दुधाचा व्यवसाय करायचे काका. पण इतक्या सगळ्या जमेच्या बाजू असताना त्यांच्या ग्राहकांची कायम एक तक्रार मात्र होती. ती अशी की दूध काका आपल्या या व्ययसायाइतकंच महत्व त्यांच्या परिवाराला द्यायचे. म्हणजे लोकांना त्यांच्या घरच्यांशी काही देणं घेणं नव्हतं; पण आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा म्हणून काका “दर रविवारी चक्क सुट्टी घ्यायचे” ही खरी अडचण होती. काही दुकानांत ती पाटी असते ना… “रविवार बंद”. अगदी तस्स !!