नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
दूरदेशीच्या मुसाफिरा तू दूर जरी जाशी विसरु नको या मातृभूमिला विसरु नको तव काशीइथेच आहे पंढरपूर तव इथेच आहे स्थान इथेच विसरी तव पत्रास्तव तुझीच माता भान ।।
येता इकडे परतुनि जेव्हा श्रमुनि थकल्या गात्री कुशीत घेऊनी तुलाच राजा अंगाई गातीदमल्या तुझीया चरणी लावी गाऊनी मंजुळ गीत हस्तस्पर्श हा ह्रदय खरोखर असली वेडी प्रीत ।।
आज अशी तु उडुनी पाखरा पंख तुझे पसरले काळ चालला त्यास पकडण्या झेपावित चालेपरंतु तुझिया नेत्रा येईल जळ जेव्हा डवरून टाक अश्रू हे झोळी माझ्या जा तर उडून फिरुन
-- जयंत वैद्य

आज मी तिला, साधारण तीस एक वर्षांनी भेटणार आहे . आज मात्र मी माझी बाजू मांडणार आहे . त्या काळी प्रेम करणं महापातक . घरच्यांच्या नाराजीवर आम्हाला आमचा ‘सुखी ‘ संसार थाटायचा नव्हता . तिनें तिच्या घरच्याना राजी केले . मीच कमी पडलो ! आम्ही शेवटचं भेटलो तेव्हा ‘जमेलसे वाटत नाही ‘ असे सांगितले तेव्हा जाम अपसेट होऊन डोळे पुसत निघून गेली . माझी बाजू ऐकून न घेताच ती गेली होती . मी काय करायचे ठरवले हे तिला सांगणार होतो ! त्यांनतर दिसली नाही ! ती आज भेटतेय ! तीस वर्षांनी !

या जगात कोणतीही घटना विनाकारण घडत नाही. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला एक अर्थ असतो. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला भविष्यात घडणाऱ्या एकातरी घटनेचा संदर्भ असतोच.असे विजयला वाटते. इतकेच नव्हे तर विजयचा पाय दुखणे हे ही विनाकारण नसावे त्यामागेही नियतीची काहीतरी योजना नक्कीच असावी. विजय पाय धरून जरी घरी बसला असला तरी त्याचे डोके कधीच गप्प बसत नाही त्या डोक्यात सतत काही ना काही सुरू असतेच.
सदुसष्ट वर्षांच्या या जीवन प्रवासात प्रसंगी पुण्यातील फुटपाथवर झोपलेला हा माणूस अमेरिकेत जाऊ शकतो हे कुणाला सांगितलं तर, खरं वाटेल का? जर माणसाच्या अंगी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम करण्याची तयारी, दृढ आत्मविश्वास आणि जिवलग मित्रांचा सहवास असेल तर सर्व काही शक्य आहे.

अयोध्या नगरीचा अवघा आसमंत रंगीत दीप आणि दीपमालांनी प्रकाशमान झाला होता. आकाशातील द्वितीयेचा चंद्र आज जरा जास्तच तेजस्वी जाणवत होता. शरयूच्या तीरावरून येणाऱ्या सुखद गारव्यामुळं वातावरण प्रसन्न वाटत होतं. सर्वत्र उभारलेल्या राहुट्यातून , मंदिरांच्या प्रांगणातून , शरयू नदीच्या किनाऱ्यावरून केवळ आणि केवळ राम धून ऐकू येत होती.

स्टीलच्या, हिंडालियमच्या भांड्यांची चलती असली तरी या जमान्यात पितळी भांडीसुद्धा वापरली जातात. साहजिकच कल्हई करणे आले. दारी येणारा कल्हईवाला तात्काळ सेवा देणारा असतो.

त्या वेळेला आम्हाला क्लॉक रेडिओ डिझाईन करायचा अनुभव नव्हता. हा रेडीओ बाजारात [मार्केटमध्ये] लवकर आणता यावा म्हणून आम्ही आमच्याच कंपनीने परदेशात असाच एक क्लॉक रेडीओ डिझाईन करून त्याचे उत्पादन पण सुरु केले होते, त्याची मदत घ्यायची ठरवली. त्यांनी त्या रेडीओ मध्ये electric supply frequency ची मदत घेऊन त्यातलं घड्याळ चालवलं होत, तिकडे इलेक्ट्रिक सप्लायची कंपनसंख्या [electric supply frequency] खूपच स्थिर असल्यामुळे हे शक्य झालं होते.
तीस वर्षांत तिने सात भाषेतील एकूण ३०० चित्रपट केले. यामध्ये तिचे सर्वाधिक चित्रपट हे जितेंद्र सोबत आहेत. त्यानंतर अमिताभ बच्चन व श्रीदेवीचे. राजेश खन्ना सोबतही तिने काही चित्रपटांतून दर्शन दिले.

“सर सर आप ना गलत कर रहे हो, आपको मॅडम के सामने ऐसे ऐसे जल्दी आके घुटनो पे बैठना है और फिर मॅडम शरमाती हुई आकें आप के गले मे हाथ डाल लेंगी, उसी time आपको खडा होना है, and सर listen to the beats.”
Copyright © 2025 | Marathisrushti