नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

लहान मुलांमधे उपजतच कुतूहल आणि जिज्ञासा असते. जसजशी मुले मोठी होऊ लागतात तसतशी त्यांची जिज्ञासाही वाढते.आणि त्यातूनच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी ही मुले प्रेरित होत असतात.
“डबल सीट’ म्हणजे एकाच दुचाकीवरील दोघांचा प्रवास.. माझ्या लहानपणी मी वडिलांच्या सायकलच्या दांडीवर असलेल्या छोट्या लाकडी सीटवर बसून फिरायला जात असे.

गिरिजाआत्या अणि तिचे यजमान रत्नाकर. आम्ही त्यांना काकाच म्हणायचो. दोघांचा संसार तसा वाढलेल्या वयावरच सुरू झाला. रत्नाकर आपल्या लग्नाचं वय उलटुन गेलेल्या बहिणीसाठी थांबून राहिले होते आणि गिरीजाआत्याचं लग्न जुळत नव्हतं म्हणून ती बिनलग्नाची राहिली होती. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी हे प्रपोजल दोघांच्याही समोर आलं होतं. परंतू प्रत्येक गोष्ट घडण्याची नियतीने एक वेळ निश्चित केलेली असते. आपल्या बहिणीसाठी रत्नाकरनी त्यावेळी या लग्नाला नकार दिला. अखेर बहिणही अविवाहित राहूनच स्वर्गवासी झाली. परंतू गिरीजाआत्या आणि रत्नाकरकरकाकांचं लग्न मात्र ती हयात असतानाच झालं. यालाच म्हणतात नियतीचा खेळ.

याबाबतीत मात्र विजय पूर्वीही बदनाम होता आणि आज ही कितीही सुंदर आणि गोड आवाज असणाऱ्या तरुणीने त्याला फोन केला तरी तो तिच्याशी अधिकचा एक शब्दही बोलत नाही. पण एखादी समोरा – समोर भेटली आणि तिची बोलण्याची इच्छा असेल तर तो थांबतही नाही.

आपण आपले छंद, आवड प्रामाणिकपणे जपले की आपलेच आयुष्य हे समृद्ध, समाधानी होत रहाते. या प्रवासात जसे ज्येष्ठ, श्रेष्ठ प्रस्थापित साहित्यिक भेटले तसे नवोदित कवी, लेखक देखील माझ्या संपर्कात आले. माझी थोडीफार ओळख झाल्यामुळे मला व्याख्यानांसाठी, कार्यक्रमासाठी, पुस्तक प्रकाशनासाठी, निमंत्रणे येत राहिली. पुस्तके छापण्यासाठी तसेच प्रस्तावनेसाठी देखील अनेक पुस्तके माझ्याकडे आली, हे सर्व मी कुठलीही अपेक्षा न करता करत राहिलो.
काय रे केदार, असा का बसला आहेस डोक्याला हात लावून? बरं वाटत नाही का? आणि इतका उशीर?” प्रदीपने-केदारच्या मित्राने-विचारलं. केदार म्हणजे एक उमदा, सतत हसतमुख असणारा. वेळेच्या बाबतीत काटेकोर, कामात चोख.
सखाराम कृष्ण जोशी हे नाव व्यवहारापुरतं , प्रत्यक्षात बापुकाका जोशी हीच सर्वत्र ओळख . भिक्षुकी करताना आजच्या हिशोबात सांगायचं तर दहा पंधरा मैल चालायचं , घाटया, डोंगर चढायचे आणि मिळेल त्या रुपया दोन रुपये दक्षिणेवर समाधान मानून घरी परतायचं . यात आयुष्य सरलं. पण चेहऱ्यावरचा आनंद , स्वभावातला सरळपणा आणि वृत्तीतला प्रामाणिकपणा हरवला नाही शेवटपर्यंत .
आपल्या गाजलेल्या पंधरा वर्षांतील चित्रपटांतील गाणी ऐकली की, मन प्रसन्न होतं.. मन भूतकाळात जातं.. ते रमणीय दिवस आठवतात.. मरगळलेल्या मनाला पुन्हा उमेद मिळते… ही फक्त आपल्या अभिनयाची ‘जादू’ आहे.

भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो. कृषि-पराशर हा पराशरांनी लिहिलेला शेतीविषयक ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. प्राचीन भारतीय कृषीशास्त्राचा तो एक महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाच्या शैलीवरून तो ८ व्या शतकातील असावा असे मानले जाते.

आता तो पूर्वीसारखा तरुण राहिला नव्हता. त्याचे केसही पिकले होते आणि दाढी मिश्याही पिकल्या आहेत. पण विजय हल्ली रोज चकाचक दाढी करतो. आणि केसही काळे करतो कधी कधी ! खरं तर विजयला केस काळे करायला आवडत नाही पण याला कारणीभूत होती आपल्या देशातील सामाजिक परिस्थिती !
Copyright © 2025 | Marathisrushti