(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • अजब न्याय नियतीचा – भाग ८

    ठरल्याप्रमाणे आठ दिवसांनंतर नीलच्या गाडीतून चारू, आरू आणि नील गांवी जायला निघाले. मुंबईपासून गावापर्यंचे अंतर ४५० ते ५०० किलोमीटर तरी होते. पण गाडीत छानशी गाणी ऐकत, गप्पा मारत, अधुन मधून रस्त्यात निसर्गरम्य परिसरांत थांबून तिथले फोटो काढत, रमत गमत संध्याकाळ्च्या सुमारास ते गांवी पोहोचले.

  • वेबसिरीज : एक रेसिपी 

    वैधानिक इशारा : या रेसिपीमुळं कुणाचं मनःस्वास्थ्य बिघडलं , घरात भांडणं होऊ लागली , लहान पिढी आणि तारुण्यातली पिढी वाया जाऊ लागली , संस्कृती नष्ट होऊ लागली , शिक्षणावर कुणी पाणी सोडलं , समाजात अनाचार , अत्याचार होऊ लागला , सगळ्या प्रकारचं प्रदूषण होऊ लागलं तर त्याला लेखक जबाबदार नाही !

  • जाम’ची मजा

    भाषा हा विषय फार मजेदार आहे. एकाच शब्दाचा अर्थ, तीन वेगवेगळ्या भाषेत कसा बदलत जातो ते पहा. त्याचंच एक उदाहरण बघूयात. शब्द आहे ‘जाम’.

  • ये ना पूछो किधर ये ना पूछो कहाॅं..

    कल्पनाला चित्रपटात काम करण्याची महत्त्वाकांक्षा होतीच.. तशी संधी तिला, बलराज साहनी यांच्यामुळे मिळाली. ती मुंबईत आली..

  • शेजार’ ….. (कथा)

    आयताकृती फडके वाडा … आयताच्या एका बाजूला झाकलेली विहीर , पंप रूम आणि चाफ्याचं मोठं झाड .. उरलेल्या तीनही बाजूंना एक मजली चाळीसदृश घरं … अगदी बाजूबाजूला लागून … दोन्ही कोपऱ्यात लाकडी जीना …. मध्यभागी सगळं अंगण … अंगणात काही उगाच वाढलेली तर काही मुद्दाम लावलेली झाडं ….

  • अजब न्याय नियतीचा – भाग १९

    आरू काही क्षण नीलकडे पाहात राहिली, मग हलकेच तिने तिचे डोके त्याचा खांद्यावर ठेवले  म्हणाली,  “नील किती करतोस ना तू माझ्यासाठी.  माझ्या दीचा प्रॉब्लेम तो तुझा प्रॉब्लेम असल्यासारखा तू झपाटून ती चांगली व्हावी म्हणून किती प्रयन्त करतो आहेस. देव करो आणि तुझ्या प्रयत्नांना यश येवो.”

  • पैलं …जे आसन ते

    मरेंगे लेकिन किसीको मानलेली बहीण नहीं करेंगे! जे मजसंग हुलालतं ते पैली बार हुलालतं का हुलालता? कुणामुळं हुलालतं ? अन आकिरला झालं त झालं काय ? तेच समदं लिव्हलं हाय

  • लग्नाची बेडी – Part 1

    “कसले? अरे लग्नाचे आणि कसले? तू तिकडे लांब एकटा, परदेशात, आता शिक्षणही पुरे झाले, चांगला जॉब आहे, घर आहे. चांगला सेटल झाला आहेस मग आता लग्नाचे कधी मनावर घेणार आहेस? अरे सगळ्या गोष्टी कशा वेळच्या वेळी झाल्या म्हणजे बरं. आम्हाला इकडे खूप काळजी वाटते, बरं. चटकन येता पण येत नाही. आता एकाला दुसरा जोडीदार हवाच, शिवाय परका मुलूख म्हणून म्हणते. आपलं माणूस हवं.खाण्यापिण्याचेही खूप हाल होत असतील.”

  • बालकुमार -कथा – मोन्या

    आपल्याला मित्र असणे कित्ती छान असते नाही का ? मित्राबरोबर खूप गप्पा मारता येतात,खेळता येते आणि खेळता खेळता भांडता सुद्धा येते, मित्रशिवाय आपल्याला करमत नसते हे तितकेच खरे.

  • मधल्या मधे

    आम्हीच माघार घेतली पाहिजे बरोबर आहे घर त्यांच राज्यही त्यांचेच आम्ही आश्रीत तेंव्हा बोलायचे नाही गप्प गुमान बंद करा आणि बसा शांत. आता नानांची पण काही चूक नाही. आर्थिक परिस्थिती मुळे सिनेमा नाटक सहली काहीही जमले नाही व्यवसाय. कामाचा व्याप मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसा व वेळ गेला. आत्ता कुठे सगळे स्थिरस्थावर झाले आहे.