ललित साहित्य, कवितासंग्रह, वैचारिक लेखनाची पुस्तके येथे वाचा.
अनघा प्रकाशन 2019 या वर्षीचा हा दिवाळी अंक. नामांकितांच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित असलेल्या या अंकाचा विषयच ‘रम्य ते बालपण‘ हा आहे.

या पुस्तकातील प्रत्येक कथेत सतत मानवी मन डोकावताना दिसेल. कधी तिचे तर कधी त्याचे.
प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी तो किंवा ती येते किवा येत असते. तेव्हा मानवी मन काय आणि कसा विचार करते हे खरे तर शब्दात मांडता येत नाही, तेच मी प्रत्येक वेळी कमीतकमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामधील कथा अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाचल्या आहेत, त्यातील काही एकत्र या पुस्तकात देत आहे.
आणखी एक…. हे वाचल्यानंतर अनेकांचा…. म्हणजे स्त्री पुरुषाचा पहिला प्रश्न असतो तो, तुम्ही इतके आमच्या मनातले कसे ओळखता, तुमची अफेअर्स किती झाली आणि जी एफ किती.
मी काहीच उत्तर देत नाही ….
कशाला द्यायचे..
आय. सी. ८१४ विमानाचं अपहरण झालं, तेव्हा ‘एन्टेबी’सारखी कारवाई केली जाईल, असं अनेकांना वाटत होतं. गुप्तचरांच्या आघाडीवर तशी तयारी होती, पण माशी कुठे शिंकली ?
अमृतसरच्या राजा सांसी विमानतळावर कमांडोजचं पथक पोहोचलं, पण दरम्यान ‘इंडियन एअरलाइन्सच्या विमानानं लाहोरच्या दिशेनं उड्डाण केलं होतं.
त्या कारवाईत विघ्न आणणारे कोण होते ? तो खोटा फोन कोणाचा होता ?
या आणि अशा बऱ्याच खळबळजनक माहितीवर आधारित काल्पनिक आणि वास्तव यांचा हा सुरेख ‘कल्पास्तव’.
अरविंद व्यं. गोखले यांची थरारक कादंबरी




Copyright © 2025 | Marathisrushti