ललित साहित्य, कवितासंग्रह, वैचारिक लेखनाची पुस्तके येथे वाचा.

ज्या वयात पालक मुलांना बालनाट्य दाखवतात म्हणजे आठ ते चौदा या वयात लेखकाच्या वडिलांनी त्यांना दुसऱ्या महायुद्धावरील अनेक चित्रपट दाखवले. त्यामुळे या संस्कारक्षम वयात लेखकाच्या मनात दुसऱ्या महायुद्धाबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झाले. पुढे ते आकर्षण वाढवण्याचे काम विजय देवधर यांच्या दुसऱ्या महायुद्धावरील गुप्तहेर कथांनी केले.
त्यामुळेच श्री वाळिंबे यांना दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेरांवर लेखमालिका लिहावीशी वाटली.
ही लेखमालिका मराठीसृष्टीवर प्रथम प्रकाशित झाली आणि त्यातूनच पुढे या इ-पुस्तकाची संकल्पना आली.


श्री सतीश परांजपे हे मध्य प्रदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन ह्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाले. त्यांचे विविध वैचारिक विषयांवर लेख मराठीसृष्टी.कॉम या संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहेत. त्यांचे लेखन अत्यंत वाचकप्रिय आहे हे त्यांच्या लेखनाला मिळणार्या प्रतिसादावरुनच लक्षात येते.
त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या १४ निवडक लेखांचा हा संग्रह.





सुप्रसिद्ध गायक श्री अनिरुद्ध जोशी यांच्या सांगीतिक प्रवासाच्या १००० व्या प्रयोगाच्या टप्प्यापर्यंतची कहाणी

जागतिकीकरणाबद्दल चिंतन करणारे काही मुद्दे मांडले आहेत या पुस्तकात, लेखक श्री सुभाष नाईक यांनी.


आपल्या Corporate जीवनात आलेले अनेक अनुभव रेखाटले आहेत श्री विश्वास दात्ये यांनी. हे छोटे छोटे लेख व्यवस्थापनाचा अभ्यास करणाऱ्यांना पथदर्शी आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti