(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • पांडुरंग शास्त्रीं आठवलेंचा एक विचार

    स्वाध्याय परिवार… मॅगसेसे, टेम्पल्टन, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पद्मविभूषण पुरस्कार. असंख्य कार्यकर्त्यांचं पाठबळ.
    पांडुरंग शास्त्री आठवले ह्यांच्याबद्दल लिहावं तितकं कमीच आहे !!
    त्यांच्या नंतर आजही असंख्य राबते हात देशभर काम करत आहेत.
    त्यांचे विचार हा संपूर्ण भारतवर्षाला जोडणारा एक धागा आहे.
    पांडुरंग शास्त्री ह्यांच्या विचारात काय बळ आहे? त्यांचे विचार कोणती किमया करू शकतात ?
    विनय नावाच्या एका तरुणाचा हा किस्सा आहे. तो मला पहिल्यांदा भेटला तेव्हा गप्पा मारता मारता म्हणाला,
    ” दादा, मी बोटीवर पोर्टर म्हणून काम करतो. बोट जगभर फिरते. त्यामुळे अनेक महिन्यांनी घरी येतो.

  • शासकीय दरोडा!

    प्रकाशन दिनांक :- 19/10/2003
    ब्रिटिशांच्या जोखडातून हिंदुस्थानला मुक्त करण्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली. आज आपण स्वतंत्र आणि सार्वभौम देशात मुक्तपणे श्वास घेत आहोत ते या लोकांच्या बलिदानामुळेच. स्वातंत्र्यवीरांच्या समरगाथा आम्हाला नेहमीच स्फूर्तिदायक वाटत आल्या आहेत.

  • नव्या कुरणांची निर्मिती

    साखर. मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक. मधूमेहाचे रोगी सोडले तर उर्वरीत मनुष्यजातीतील एकाचाही एकही दिवस बिनासाखरेचा जात असेल, असे वाटत नाही. मानवाचे संपूर्ण जीवन व्यापणार्‍या या साखरेला महाराष्ट्रात तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशातील सर्वाधिक पुढारलेले राज्य म्हणून मिरविणार्‍या या राज्याचे राजकारण साखरेभोवती फिरत असते, असे म्हटले तर ते अजिबात वावगे ठरणार नाही. राज्याच्या पश्चिम भागाने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर प्रचंड विकास साधून घेतला आहे आणि देशातील एक संपन्न भाग म्हणून नावारूपाला आला आहे. पश्चिम महाराष्ट्राने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर घेतलेली प्रगतीची झेप बघून मराठवाडा व विदर्भ या तुलनेत अविकसित भागातही, सहकारी साखर कारखाने उभे राहिलेत.

  • नसती उठाठेव!

    'सामर्थ्य आहे चळवळीचे' ही समर्थांची उक्ती सर्वज्ञात आहे. निश्चितच चळवळीत सामर्थ्य असते. अशाच एका चळवळीच्या सामर्थ्यातून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

  • अमिताभचे वडील

    प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन रोज सकाळी फिरायला जात असत. त्यांच्या रस्त्यात एक मोठा दगड पडलेला होता. हा दगड अनेकांच्या पायात येत होता. पण तो खूप मोठा आणि जड असल्यामुळे कोणीच हलवू शकत नसे. पण हरिवंशराय ह्यांनी तो स्वतःला जमेल तसा रोज थोडा थोडा हलवला आणि एक दिवस रस्त्याच्या कडेला नेला. वास्तविक त्यांचा मुलगा मेगास्टार होता. त्याला सांगून हा दगड हलवता आला असता. पण स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवायचे हा हरिवंशराय ह्यांचा स्वभाव होता. त्यांच्या ह्याच कृतीचा त्यांच्या मुलावर प्रभाव पडला आणि तोही अथक प्रयत्न करून भारतातील सर्वात मोठा अभिनेता बनला. आपण ज्या अमिताभचा करिष्मा अनेक वर्षे पाहत आहोत, त्याच्या मागे हरिवंशराय ह्यांचीच प्रेरणा आहे. अमिताभ ह्याने अनेक मुलाखती, कार्यक्रमामधून तसं व्यक्तही केलं आहे.
    म्हणून अमिताभ आणि हरिवंशराय ह्यांच्यातील नाते आजच्या फादर्स डे निमित्ताने जरूर पाहायला हवे.

  • धावता कृष्ण आणि स्तब्ध बुद्ध

    भारताने जगाला दोन मोठ्या देणग्या दिल्या. एक आहे बुद्ध आणि दुसरा कृष्ण.
    बुद्ध आत्मिक, अंतर्गत स्तरावर आहे तर कृष्ण बाहेरच्या स्तरावर आहे. बुद्ध एक उदाहरण देत असत. मनःशांती कशी असावी याबद्दल त्यांनी म्हटलं होतं की मन हे रथाच्या चाकाच्या मधल्या दांड्यासारखं असावं. चाकाचा परीघ जोरजोरात फिरतो, धावत राहतो पण मधला दांडा फक्त स्वतःभोवती फिरतो. शांत असतो.

  • देशभक्तीचे बदलते आयाम!

    प्रकाशन दिनांक :- 28/09/2003
    देशाला स्वातंत्र्य मिळून अर्धशतकाचा कालावधी उलटून गेला. स्वातंत्र्याचा उपभोग घेणारी तिसरी पिढी जन्माला आली. शेकडो वर्षांच्या संघर्षाचे एक पर्व संपले, परंतु त्याचा अर्थ संघर्ष संपला असा करता येणार नाही.

  • पकडा पंढरीचा चोर

    आषाढी आली. वारकरी पंढरपूरला निघाले. पण हा पंढरीचा चोर फक्त पंढरीत राहत नाही, सगळीकडे फिरत असतो. बस त्याला पकडणारी नजर हवी. आजपर्यंत ह्या पंढरीच्या चोराला कोणी, कसे पकडले सांगत आहेत निरेन आपटे.

  • सावधान, श्रीकृष्ण जिवंत आहे.

    कृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!

  • कबीर आणि risk

    मुंगेरीलाल स्विमिंग शिकायला स्विमिंग पुलवर आला. खोल पाणी पाहून घाबरला.
    पण कोचने धीर दिला, म्हणाला, ” मी तुला पोहायला शिकवेन. घाबरू नकोस. पाण्यात उडी मार!”
    जीव मुठीत धरून मुंगेरीलालने पाण्यात उडी मारली आणि व्हायचे तेच झाले. मुंगेरीलालने पाण्यात गटांगळ्या खायला सुरुवात केली. नकातोंडात पाणी गेले. जोरात ठसका लागला. कोचने त्याला काठावर आणले.
    मग मुंगेरीलालने एक प्रतिज्ञा केली,
    ” जोवर मला स्विमिंग येत नाही तोवर मी पाण्यात उतरणार नाही!!”
    आज मुंगेरीलाल ८० वर्षांचा आहे. अजूनही त्याला स्विमिंग येत नाही.
    आपली अवस्थाही अशीच होते. पाण्यात उतरायची हिंमत होत नाही आणि कोणत्याच लाटेवर स्वार होता येत नाही, कोणतही यश मिळत नाही.