परवा बाजारात एका दुकानात लसूण सोलायचं उपकरण पाहून, मला धक्काच बसला! कारण ते उपकरण म्हणजे, लसणाच्या पाकळ्या आत सरकवता येतील एवढ्या व्यासाची फक्त एक रबरी ट्यूब होती.
पहिला चेंडू टाकणारे होते इंग्लंडचे आल्फ्रेड शॉ. त्यांच्यासमोर होते ऑस्ट्रेलियन फलंदाज चार्ल्स बॅनरमन. त्यांनी त्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कसोटी क्रिकेटमधली पहिली धाव घेतली. त्यांनीच दुसऱ्या दिवशी पहिले शतक पूर्ण करताना १६५ धावा केल्या. या सामन्याला कसोटी दर्जा नंतर बहाल करण्यात आला. सुरुवातीला या सामन्याचे स्वरूप ऑल इंग्लंड वि. कम्बाइन्ड न्यू साउथ वेल्स अँड व्हिक्टोरिया इलेव्हन असे होते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक रंगकर्मीला एक ना एक दिवस आपण शिवाजी मंदिरच्या मंचावर स्वत:ला जोखून बघावे असे वाटत असते, यातच या वास्तूची महत्ता दडली आहे. १९६५ साली जेव्हा मुंबईत बंदिस्त नाटय़गृह ही दुर्मीळ चीज होती त्या काळी शिवाजी मंदिर बांधले गेले. अर्थात त्याआधीही ते खुले नाटय़गृह म्हणून अस्तित्वात होतेच. परंतु शिवाजी मंदिरचा बंदिस्त रंगमंच उपलब्ध झाला आणि १२ महिने १३ काळ मराठी नाटकांना कायमस्वरूपी रंगमंच मिळाला.
जानेवारी १९७१ ते ५ जानेवारी १९७१ या दरम्यान ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या दोन संघांदरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या चार दिवसांचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. प्रेक्षकांचे पैसे वसूल होण्याच्या दृष्टीने मर्यादित षटकांचा सामना खेळवण्याची एक कल्पना एका भन्नाट डोक्यातून निघाली. तिला मूर्त स्वरूप येऊन ५ जानेवारी १९७१ रोजी प्रत्येकी ४० षटकांचा एक सामना वरील दोन्ही संघांदरम्यान खेळला गेला.
१९७५ साली आलेल्या व्हेन कॉन्मिगो (Ven Conmigo) या मेक्सिकन दूरचित्रवाणी मालिकेच्या धर्तीवर हमलोग या मालिकेची निर्मिती केली. या मालिकेची कल्पना तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री वसंत साठे यांना १९८२ मध्ये मेक्सिकन दौऱ्याच्या वेळी मिळाली. भारतात आल्यावर मंत्री वसंत साठे यांनी याच्यावर काम करण्यास सुरुवात केली. व ‘हमलोग’ या मालिकेचे निर्मिती झाली.
२६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीरचे तत्कालीन महाराज हरी सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाच्या करारनाम्यावर सही केली खरी पण त्याआधीच पाक पुरस्कृत टोळीवाले श्रीनगरच्या दिशेने कूच करून येत होते आणि ते उरी पर्यंत पोचले देखील होते.
पाकिस्तानी सैन्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच “ऑपरेशन गुलमर्ग” या नावाने कारवाई चालू केली होती.
मल्लखांब या खेळाचा उदय दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. पेशव्यांच्या दरबारातल्या बाळंभट दादा देवधर यांनी कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मल्लखांबाची मुहूर्तमेढ रोवली होती.
कर्करोगाची त्यांची ओळख रंगाद्वारे पामेला महिलेने जगाला दिली असे म्हणावयास हरकत नाही.
चित्रपटांमध्ये तसंच टीव्हीवरच्या मालिकांमध्ये आपण नेहमी पाहतो, गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी ओळख परेड चाललेली असते. गुन्हेगाराला ज्यानं पाहिलं आहे अशा प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला बोलावलेलं असतं. तो अतिशय घाबरून गेलेला असतो. त्यानं गुन्हेगाराला पाहिलं आहे हे त्याला माहिती असतं, पण गुन्हेगाराला त्याची कल्पना नसते.
राष्ट्रीय सुरक्षा परिषद भारतात ४ मार्च १९६६ रोजी स्थापन करण्यात आली, म्हणून हा दिवस ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘नॅशनल सेफ्टी कौन्सिल’ ही एक स्वायत्त संस्था आहे, जी निस्वार्थ भावनेने कार्य करते.
Copyright © 2025 | Marathisrushti