(User Level: User is not logged in.)

सामान्यज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भूजल साठे का व कसे?

    वर्षातले ४० ते ४५ दिवस पाऊस पडतो. ते पाणी बाकीच्या ३२५ दिवसांत काटकसरीने सर्व प्रकारच्या कामासाठी वापरावे लागते, म्हणून जलसाठे करणे भाग पडते.

  • भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)

    भारतीय आयुर्विमा महामंडळ १ सप्टेंबर १९५६ रोजी आयुर्विम्याचा सर्वदूर अधिक व्यापक प्रसार करण्याच्या हेतूने विशेष करून देशाच्या ग्रामीण भागातील सर्व विमा योग्य व्यक्तींपर्यंत पोचण्यासाठी, त्यांना पुरेसे आर्थिक संरक्षण योग्य किमतीत पुरवण्यासाठी निर्माण करण्यात आले.

  • गोलमाल ‘चित्रपटाला ४३ वर्षे पूर्ण झाली

    मुंबईत ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटातील अमोल पालेकर यांची रामप्रसाद आणि लक्ष्मीप्रसाद दशरथप्रसाद शर्मा अशी दोन रुपे घेतलेली भूमिका आणि त्यांचा आपले कार्यालयीन बॉस भवानी शंकर ( उत्पल दत्त) यांच्याशी झालेला गंमतीदार संघर्ष या सूत्राभोवती हा खुसखुशीत मार्मिक मिस्कील मनोरंजक चित्रपट रंगला.

  • ओळख मूलांकाची – मूलांक ५

    अंकशास्त्रानुसार, तुम्ही ज्या जन्मतारखेला जन्म घेता त्या जन्मतारखेचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. अंकशास्त्रात १ ते ९ अंक आहेत आणि या प्रत्येक अंकाचा स्वामी एक विशिष्ट ग्रह आहे. अंकशास्त्रात (Numerology) ५ हा अंक खूप खास मानला जातो.

  • मैने प्यार किया या चित्रपटाला प्रदर्शीत होऊन तब्बल २९ वर्षे पूर्ण

    मैने प्यार किया या चित्रपटाला प्रदर्शीत होऊन तब्बल २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. २९ डिसेंबर १९८९ रोजी हा चित्रपट प्रदर्शीत झाला. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. सलमान खानच्या अभिनय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे 'मैने प्यार किया'. रॉयल मराठी कुटुंबात वाढलेल्या भाग्यश्रीनेही याच चित्रपटाने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाने त्याकाळी यशाचे अनेक रेकॉर्ड तोडले. यातील कलाकार सलमान खान आणि भाग्यश्री यांना या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटादरम्यान प्रथमच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आलेले सूरज बडजात्या यांचे नुकतेच लग्न झाले होते. त्यावेळी सेटवर सर्वात अगोदर येणारे आणि सर्वात शेवटी जाणारे ते एकमेव व्यक्ती होते. त्यांच्या या सवयीमुळे सलमान आणि भाग्यश्री त्यांना पत्नीसोबत वेळ घालवण्याचा सल्ला देत असत. पण कामाला पूर्णपणे वाहून घेतलेले सूरज यांचा सेटवरील दिनक्रम चुकत नसे. सलमान आणि भाग्यश्री सेटवर धमाल मस्ती करण्याचा एक क्षणही सोडत नसत.

    मूळचे वाशीम येथील आणि आता मुंबईत वास्तरव्या स असलेले मराठमोळे लेखक एस.एम.आहाळे यांच्या् लेखनीतून 'मैंने प्यार किया' साकारला आहे. आहाळे यांना बाल्याेवस्थेकपासूनच नाटकाची आवड होती. त्यायतून ते नट होण्यापसाठी मुंबईला गेले. मात्र,तिथे अभिनेत्याचऐवजी स्क्री प्टण राइटर म्हचणून त्यांयनी लौकिक मिळवला. त्यांोनी 'हम आपके है कोन','एक रिश्ताब','प्यायर दिवाना होता है','दिल ने फिर याद किया',यासह इतर अनेक चित्रपटांचे लेखन केलेले आहे. या शिवाय 'एक से बढकर एक' या लोकप्रिय मालिकेसह इतर अनेक हिंदी मालिका लिहिल्याात.
    मैंने प्यार किया’मधील रिमा लागू यांनी साकारलेली आई आजही अनेकांच्या लक्षात आहे. मातृत्व आणि पत्नी धर्म यांमध्ये अडकलेली आई रिमा यांनी चांगलीच साकारली होती. आजही टीव्हीवर हा सिनेमा लागला की, रिमोट आपसूक बाजूला ठेवून सिनेमा पाहिला जातो. या सिनेमामुळे रिमा यांच्या करिअरला नवीन उभारी मिळाली.

    सलमान खाननेही नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यातही सलमान आणि रिमा यांच्या वयात फारसे अंतर नव्हते. रिमा या सलमानपेक्षा फक्त आठ ते नऊ वर्षांनीच मोठ्या होत्या. या सिनेमावेळी त्यांचे वय ३० ते ३५ वर्षांच्या आसपास होते. अशात सलमानची आई साकारणं तसं आव्हानच होतं. पण सुरज बडजात्या यांनी या सिनेमात बॉलिवूडपटात दाखवतात तशी टिपिकल केस पांढरे असलेली, खंगलेली आई न दाखवता रिमा लागू यांच्या लूकवर काम केले आणि देशाला नवीन आईची ओळख करून दिली. पण मेकअपच सगळं काही करतो असे नाही ना.. रिमा लागू यांनी त्यांच्या अभिनयाने ही व्यक्तिरेखा अशापद्धतीने साकारली की आजही ‘मैंने प्यार किया’ म्हटलं की रिमा यांची ती व्यक्तिरेखा डोळ्यांसमोरून जात नाही.
    अभिनेत्री भाग्यश्री हिचा ‘मैंने प्यार किया’ हा पहिलाच डेब्यू सिनेमा या चित्रपटात भाग्यश्रीने साकारलेली साधी-सरळ सुमन लोकांना मनापासून भावली. ‘मैंने प्यार किया’नंतर भाग्यश्रीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास लोक उत्सूक होते. पण पहिल्याच चित्रपटानंतर भाग्यश्री बॉलिवूडमधून दिसेनासी झाली. खरे तर ‘मैंने प्यार किया’ नंतर भाग्यश्रीकडे खूप मोठ मोठ्या आॅफर्स आल्यात पण भाग्यश्रीने त्या सगळ्या धुडकावून लावल्यात. का? तर याच ‘का’चे उत्तर भाग्यश्रीने दिले आहे. एका मुलाखतीत भाग्यश्रीने ‘का’वर मौन तोडले. ‘मैंने प्यार किया’ भाग्यश्री अचानक बॉलिवूडमधून गायब झाली, याचे कारण आहे, तिचे प्रेम. होय, बालपणीचा मित्र हिमालय दासानी याच्या प्रेमामुळे भाग्यश्रीने चित्रपटांच्या आॅफर्स नाकारल्या. तिने सांगितले की, ‘मी आणि हिमालय लहानपणापासूनचे मित्र.

    आमच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. पण माझ्या घरच्यांना आमचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळे हिमालय शिक्षणासाठी अमेरिकेत गेला, त्यावेळी आम्ही ब्रेकअप केले. तो अमेरिकेत असताना मी ‘मैंने प्यार किया’ साईन केला. अर्थात हा चित्रपट साईन करण्याआधी मी हिमालयच्या आई-वडिलांची परवानगी घेतली होती. कारण आज नसलो तरी उद्या मी व हिमालय सोबत असू, याची मला खात्री होती. हिमालयच्या घरच्यांना आमचे नाते मनापासून मान्य होते. अमेरिकेतील शिक्षण संपवून हिमालय भारतात परत आला. माझे कुटुंबीय तरीही त्याला स्विकारायला तयार नव्हते. एकदिवस मी हिमालयला फोन केला आणि हे नाते पुढे न्यायचे का? असा प्रश्न त्याला विचारला. मी घर सोडलेय, माझ्यावर प्रेम असेल तर मला घ्यायला ये, असे मी त्याला म्हटले. यानंतर पुढच्या पंधरा मिनिटात हिमालय माझ्या घराबाहेर होता. आम्ही मंदिरात लग्न केले. हिमालयचे कुटुंब, सलमान आणि सूरत बडजात्या असे मित्र आमच्या लग्नात हजर होते. तोपर्यंत ‘मैने प्यार किया’ सुपरहिट झाला होता. मला खूप आॅफर आल्यात. पण हिमालयच्या प्रेमात मी आकंठ बुडाले होते. शिवाय लग्नानंतर लगेच अभिमन्यूचाही जन्म झाला.

    याच कारणामुळे मी सगळ्या आॅफर्स नाकारत गेले. अर्थात मला त्याचा अजिबात पश्चाताप नाही.’ १९९१ मध्ये आलेल्या‘ मैंने प्यार किया’साठी भाग्यश्रीला बेस्ट डेब्यूचा अवार्ड मिळाला होता. यानंतर तिने तामिळ, तेलगू, भोजपूरी अशा काही चित्रपटांत काम केले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मैने प्यार किया चित्रपट.
    https://youtu.be/l62WNDstEpc

  • जून महिन्यांतील तिसरा रविवार

    गेल्या काही वर्षांमध्ये विविध डेज साजरा करण्याचा ट्रेंड चांगलाच रुजू झाला आहे. त्यातीलच एक दिवस म्हणजे ‘फादर्स डे’. आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या वडिलांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

  • अमेरिकेचा नॅशनल आइसक्रीम दिवस

    आइसक्रीम.. नुसतं नाव उच्चारलं तरी आपण गारेगार होऊन जातो. आइसक्रीम पार्लर असो, हॉटेल असो, घरच्याघरी तयार आइसक्रीम असो किंवा रस्त्यावरून घंटावाली गाडी घेऊन फिरणारा आइसफ्रुटवाला असो, आइसक्रीम या नावातच आपल्याला पार विरघळवून टाकायची ताकद आहे. खाऊचा इतिहास माणसांच्या संस्कृतीइतकाच जुना आहे. या इतिहासाच्या पानापानावर आपल्याला अशी वळणं आढळतात जिथे जन्माला आलेला नवा पदार्थ म्हणजे त्या प्रदेशाची ओळख ठरावा.

  • कट्यार काळजात घुसली चित्रपट प्रदर्शित झाला

    चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कट्यार काळजात घुसली या चित्रपटाची ४६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या “इंडियन पॅनोरमा” विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली होती.

  • जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन. (‘प्रेस फ्रिडम डे’)

    दरवर्षी ३ मे हा दिवस प्रेस स्वातंत्र्य दिन किंवा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन (‘प्रेस फ्रिडम डे’) म्हणून साजरा केला जातो.

  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा अर्थात एस टी चा वाढदिवस

    १९४८ साली, गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या पुढाकाराने, मुंबई राज्य सरकार अंतर्गत ‘मुंबई राज्य वाहतूक सेवा’ सुरु करण्यात आली. त्या कंपनीची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. ड्राइव्हर आणि मार्गदर्शकांना खाकी गणवेश व टोपी असा पोषाख होता. त्याकाळी, शेवरले, फोर्ट, बेडफोर्ड, सेडान, स्टडेबेकर, मॉरिस कमर्शिअल, अल्बिओन, लेलँड, कोमर आणि फियाट या दहा कंपन्यांच्या बसगाड्या वापरात होत्या.