(User Level: User is not logged in.)

सामान्यज्ञान

Sort By:

  • गंधर्व नाटक मंडळी’चा स्थापना दिन

    चित्रपटांच्या उदयाच्या कालखंडातही संगीत नाटकांचा प्रेक्षक कायम ठेवून सर्वोत्तम सादरीकरणाचे व्रत त्यांनी अखंड जोपासले. त्यामुळे, गंधर्व नाटक मंडळीचा दबदबा राज्यासह इतर भागांतही पसरला होता. नेपथ्य, सजावट, वेशभूषा, रंगभूषा, पात्रयोजना, साथीदार आणि त्यांची वाद्ये अशा संगीत नाटकासाठी पूरक स्वतंत्र विभागांच्या रचनेस गंधर्व नाटक मंडळीपासूनच सुरुवात झाली.

  • जागतिक वसुंधरा दिवस

    आपल्या पिलांना मोकळा श्वानस घेत बागडण्यासाठी ‘स्पेस’ आणि उडण्यास ‘आकाश’ देण्यासाठी सुजाण प्रयत्न केवळ आपल्याच हातात आहेत. तंत्रज्ञानाचा वापर ‘ग्राउंड टु स्मार्ट अर्थ’ असा करीत सुंदर, सुव्यवस्थापित आणि सुसज्ज वसुंधरेचे ‘खरेखुरे स्वप्न’ पाहण्याची संधी भावी पिढीला केवळ आपणच उपलब्ध करून देऊ शकतो. मला काय करायचे, यापेक्षा ‘मी काय करू शकतो’ ही आपली भूमिकाच खरंतर आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, अशी ‘सेल्फ आयडेंटिटी’ (स्वतःची ओळख) निर्माण करते.

  • राष्ट्रीय नौका दिवस

    गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकत.

  • गोडाचा वरचष्मा

    कोणत्याही यंत्राला आपलं काम पार पाडण्यासाठी ऊर्जेची गरज लागते. विजेवर चालणार्‍या यंत्राना वीज ती ऊर्जा पुरवते. पेट्रोलवर चालणार्‍या यंत्रांना पेट्रोलच्या ज्वलनापासून ती मिळते. आपलं शरीर हे एक अतिशय गुंतागुंतीचं तरीही अत्यंत कार्यक्षम असं यंत्रच आहे असं म्हटलं जातं.

  • आंतरराष्ट्रीय बायोडीझेल दिवस

    बायो डीझेल म्हणजे अपारंपारिकरित्या मिळवलेले इंधन.

    कुठल्याही वनस्पतीजन्य तेलाचे ट्रांसईस्टरिफिकेशन या रासायनिक प्रक्रियेद्वारे मोनो अल्कलीमध्ये रुपांतर केले तर मिळणारा पदार्थ म्हणजे बायो डिझेल. बायो डिझेलचे इंधन गुणधर्म हे पेट्रोलियम डीझेलसारखे असतात. मात्र यात गंधकाचे प्रमाण नगण्य असते. म्हणून सल्फर अथवा गंधकाचे हवेतले प्रदूषण होत नाही. यासाठी लागणारे तेल हे वनस्पतीजन्य (तेल बिया) असल्याने हा नैसर्गिक व अपारंपारिक असा उर्जास्त्रोत आहे.

    अमेरिकेत मका तसेच सोयाबीनचे तेल यासाठी वापरले जाते. तर पाम तेलाचा वापर युरोप खंडातील देश आणि भरपूर उपलब्धी मुळे मलेशियामध्येकरतात. भारतात खाद्यतेल बिया बायो डिझेलसाठी वापरल्या जात नाहीत त्या ऐवजी करंजी नामक झाडापासून मिळणाऱ्या बियांचा वापर केला जातो. मर्सिडीज ह्या प्रतिष्ठीत मोटारींच्या उत्पादकांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या बायो डिझेलच्या प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे.

    बायो डिझेलच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या करंजीच्या लागवडी संदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन व्हावे, म्हणून ही कंपनी एनजीओच्या माध्यमातून उपक्रम राबवते आहे. सुरुवातीला महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. पडीक जमिनीमध्ये करंजीची लागवड करता येते, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून उत्पन्न मिळवता येईल. डेम्लर क्रायस्लर इंडिया या कंपनीने आतापर्यंत काही बायोडिझेलचे प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.

    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • सातवा राष्ट्रीय हॅन्डलूम दिवस

    केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार २०१५ साली ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन’ साजरा करण्याचे घोषित करण्यात आला होते.

    हातमाग उद्योगाला अच्छे दिन

    खूप वर्षापूर्वी म्हणजे भारतात इंग्रज लोक येण्यापूर्वी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. त्यांच्यात आपापसातील व्यवहार हे फारच वेगळ्या पद्धतीची होती. कामाच्या मोबदल्यात धान्य द्यायची पद्धत खरोखरच लोकांना सर्व काही मिळवून देत होती. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीला काम मिळत होते आणि त्याच्या मोबदल्यात खाण्यास लागणारे अन्नधान्य मिळत होते. शेतात उत्पादित झालेले धान्य त्याच गावात फिरत राहत होते. पैसा नावाची वस्तू त्यांना माहीतच नव्हते, त्यामुळे जो तो आपापली कामे अगदी चोख आणि व्यवस्थितपणे करीत असत. यांच्यासाठी गावात बारा बलुतेदार ही पद्धत आस्तित्वात आली होती. ज्यामुळे प्रत्येकाचे काम अगदी सहजपणे कुठलीही समस्या निर्माण न होता पूर्ण होत असे.

    ज्याचे काम त्यानी करावे जसे की वारकांनी केस कापावी, वरटी लोकानी कपडे धूवावी,चांभारानी चपला शिवाव्यात,गुरवानी मंदिरांची देखभाल करावी, कुणब्यानी शेती करावी, साळयानी कपडे विणावी आणि रंगारी लोकानी त्यास रंग लावावी ही पद्धत लोकाना स्वावलंबी जीवन जगवायला शिकवायचे. मात्र इंग्रजानी भारतात व्यापार करण्यासाठी म्हणून आले आणि हळूहळू पाय पसरवीत संपूर्ण देशावर आपले वर्चस्व निर्माण केले. कपड्यांचा बाबतीत भारत हा स्वयंपूर्ण व संपन्न देश होता कारण येथील लोक फारच सुंदर कलाकूसर करून कपडे तयार करीत असत. आजही खादीचा कापड भारतात प्रसिद्ध आहे. त्या कापडाची वैशिष्ट्य म्हणजे हे कापड जाडजूड, टिकाऊ आणि अनेक वर्षे ते कापड फाटले तरी फाटत नव्हते.

    उन्हाळ्याच्या दिवसात तर या कापडाला जास्तीची मागणी असते . भारताचा खरा कपडा म्हणजे खादीचा कपडा. हा कपडा खेड्यातील पद्मशाली समाजातील लोक हातमागावर विणून तयार करीत असत. आज ही ह्या समाजातील बरीच मंडळी हा उद्योग करतात. देशात आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात भिवंडी, सोलापूर, जालना, नांदेड, चंद्रपूर सारख्या ठिकाणी हा समाज फार मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. या समाजाचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे कपडे विणणे ; परंतु इंग्रजांनी भारतात येऊन ज्याप्रमाणे इतर व्यवसायावर घाला घातला तसेच या हातमाग उद्योगांवर सुध्दा घाला घातला गेला.

    इंग्रजांनी भारतात येऊन जाडजुड कपड्यांच्या जागी मऊ तलम व वजनाने हलकी वाटणारी टेरीकॉट कापड तयार करण्याची यंत्रणा आणली आणि या खादी उद्योगाला घरघर सुरू झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ७ ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशीचा तीव्र लढा सुरू करण्यात आला होता. बाबू गेनू नावाच्या क्रांतीकारकाने परदेशी कापडाच्या गाडीसमोर आपले बलिदान देऊन स्वदेशीचा लढा सर्वदूर पोहोचविला होता. याच दिवशी भारतात जागोजागी परदेशी कापडाची होळी करण्यात आली होती .

    यावरून विदेशी कपड्याने भारतात किती मोठे साम्राज्य निर्माण केले होते, याची जाणीव होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तरी या खादी कपड्यांच्या उद्योगाला चालना मिळेल अशी छोटी आशा होती. मात्र झाले उलटेच. खादी उद्योगाला स्वातंत्र्यानंतर सुध्दा घरघर लागली. ज्या समाजातील लोकांचा हा मुख्य व्यवसाय होता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. या लोकांना पोट भरण्यासाठी इतर कामाच्या शोधात भटकत रहावे लागू लागले यातूनच हा समाज जो पूर्वी एका ठिकाणी स्थिर होता तो संपूर्ण देशात पसरलेला दिसून येतो. तरी ही त्या॑नी मूळ व्यवसाय सोडलेली नाही. आज ही या समाजातील ४३ लाख हून अधिक लोक खास करून हातमागाचा व्यवसाय करतात.

    ग्रामीण भागातील महिला आणि दारिद्रय रेषेखालील जीवन जगणारी कुटूंबातील महिलांसाठी हाच व्यवसाय उदरनिर्वाहचे एक साधन आहे. या खादी व्यवसायास चालना मिळावी, प्रोत्साहन मिळावे, या राष्ट्रीय हॅण्डलूम दिवसा मुळे सरकारच्या या निर्णयाने भविष्यात खादी हातमाग उद्योगाला अच्छे दिन येतील असा विश्वास करण्यास काही हरकत नाही. आपण सर्व भारतीय नागरिकांनी देखील या उद्योगास चालना मिळावी म्हणून वर्षातून एक तरी खादीच्या कापडाचा पोशाख वापरावे, असे वाटते.

    - नागोराव सा. येवतीकर

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • एका कपड्याचा रंग दुसऱ्या कापडाला लागला तर तो सहज जात का नाही?

    सहसा आपण धुवायचे कपडे साबणाच्या पाण्यात भिजवतो, त्यामुळे असे रंगीत कपडे व इतर पांढरे किंवा अन्य एकत्र भिजवल्यास ह्या रंगीत कापडाचा रंग काहीवेळा दुसऱ्या कपड्याला लागतो. साबणाच्या पाण्यात ही प्रक्रिया अधिक जलद होते.

  • टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राची १८३ वर्षे

    स्वातंत्र्यपूर्व काळात हे वृत्तपत्र ‘बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ म्हणून सुरू झाले आणि १८६१ मध्ये याचे नामकरण ‘टाइम्स ऑफ इंडिया’ असे करण्यात आले.

  • नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ चा वर्धापनदिन

    (एनआयओ) अर्थात राष्ट्रीय सागरशास्त्र/समुद्र विज्ञान संस्था चे मुख्यालय डोना पॉला, गोवा येथे समुद्र किना-यापासून जवळ वसलेली असून , केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद ( सीएसआयआर) च्या अंतर्गत असलेल्या ३७ प्रयोशाळांपैकी एक आहे .

  • ५ मे १९९२ – भारतात पहिली ‘लेडीज स्पेशल’ ट्रेन धावली

    केवळ महिला प्रवाशांसाठी राखीव असलेल्या पहिली लेडीज स्पेशल लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर ५ मे १९९२ रोजी विरारहून सकाळी पहिली लेडीज स्पेशल लोकल सुटली. तेव्हापासून  गेली २८ वर्षं ही लेडीज स्पेशल रोज धावतेय.