ऑलिम्पिकचे जनक बॅरन कुबर्टिन यांनी २३ जून १८९४ साली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली. त्या दिवसाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो.
आज जगभरात २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो.
हवामानाबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सार्यांबनाच हवामानाचे महत्त्व समजावे, हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, याविषयी जाणीव आणि जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने २३ मार्च हा दिवस जागतिक हवामानदिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या चाळीस वर्षांच्या तुलनेत मागच्या दशकात हवामानात झालेले बदल सर्वांच्याच चिंतेचा विषय बनलेले आहेत. हवामान बदलाच्या परिणामांमुळे आज भारतातीलच नव्हे, तर जगभरातील शेतीक्षेत्र ग्रासले आहे. भविष्यातही हवामान बदलाचे परिणाम कमी-जास्त प्रमाणात प्रभाव दाखवतच राहतील. त्यामुळे आपण संभाव्य परिस्थितीचा वेध घेऊन आपत्कालीन उपाययोजनांसाठी तयार राहणे आवश्यक आहे. विसाव्या शतकात मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. पण या प्रगतीसोबतच हवामानातील बदल आणि वातावरणातील कमी होणारा संरक्षक ओझोन थर यांचे भीषण संकटही त्यातूनच उभे राहिले. जीवसृष्टीवरील दुष्परिणामाच्या रूपाने आपण ते अनुभवतो आहोत. हवामानातील बदल हा जागतिक तापमानवाढीमुळे होणारा सर्वाधिक चिंताजनक परिणाम आहे. अनेक देशांमध्ये, विशेषत: युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात हवामानातील बदल स्पष्टपणे जाणवत आहेत.
२०१० ते २०१३ या काळात अत्याधिक हवामानबदलाच्या अनेक घडामोडी घडून आल्या. या घडामोडींनुसार, २०१० ते २०११ हे वर्ष गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. २०१० ते २०१३ ही अत्याधिक हिमवादळे आणि थंडीची वर्षे ठरली. २०१० ते २०१३ हा अत्याधिक पावसाचे व वादळांचा कालखंड ठरला. त्याचबरोबर भारतात दिवस आणि रात्रीच्या तापमानातही वाढ झाली. मान्सून लहरी बनला. जागतिक हवामानातील या बदलांची आपण वेळीच दखल घेतली नाही आणि त्यासंबंधात योग्य ते खबरदारीचे उपाय योजले नाहीत तर आगामी काळात पृथ्वीवरील जीवसृष्टीसमोर कोणते भयावह संकट ओढवेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. रामचंद्र साबळे / इंटरनेट
साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. २१ डिसेंबर हा आता जागतिक साडी दिवस म्हणून साजरा केला जातो.
व्यक्ती, संघटना आणि वेगवेगळ्या देशांनी शांततेच्या दृष्टीने योग्य पावले उचलावीत, या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघाने २१ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून घोषित केला गेला.
बोट ही एक कंपनी आहे जी हेडफोन्स, वायरलेस स्पीकर आणि इयरफोन्समध्ये डील करते जे समकालीन डिझाइनमध्ये जास्तीत जास्त वैशिष्ट्ये देतात. त्याचप्रमाणे अमन आता सोनी टीव्ही वरील शार्क टँक या कार्यक्रमामुळे तरुणाईत लोकप्रिय झाला आहे.
सिलसिला चित्रपटाच्या प्रदर्शनास आज यशस्वी ४० वर्षे पूर्ण होत आहेत.
१४ ऑगस्ट १९८१ रोजी हा चित्रपट प्रक्षेपित झाला. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर ऑपेरा हाऊस होते, तेथे या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटाचे लेखन यश चोप्रा, प्रीती बेदी, सागर सरहादी आणि रोमेश शर्मा यांचे आहे.
या चित्रपटाचे कथानक संजीवकुमार, शशी कपूर, अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच सुषमा सेठ, कुलभूषण खरबंदा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात हरिवंशराय बच्चन यांच्या 'रंग बरसे ' या काव्याचे गीत रुपांतर आहे. या चित्रपटाची गीते जावेद अख्तर, हसन कमाल आणि राजेंद्र कृष्ण यांची असून संगीत शिव हरी यांचे आहे. या चित्रपटातील देखा एक ख्वाब मै ये सिलसिले हुये, ये कहा आ गये हम, लडकी है या शोला, सर से सर के, नीला आसमा खो गया, जब तुम तोडो पिया, खुद जो वादा किया ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.
या चित्रपटाचे छायाचित्रण के. जी. यांचे आहे. या चित्रपटासाठी सुरुवातीला स्मिता पाटील आणि परवीन बाबी यांची निवड करण्यात येणार होती. इतकेच नव्हे तर रेखाने साकारलेल्या 'चांदनी ' या व्यक्तिरेखेसाठी अगोदर आपणास ऑफर होती, असे पद्मिनी कोल्हापूरेने एका मुलाखतीत म्हटले होते. पण जया बच्चन आणि रेखा एकाच चित्रपटात एकत्र आल्याने या चित्रपटाची घोषणेपासूनच दणदणीत पूर्वप्रसिध्दी झाली.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या.
प्रथमपासून संघ राजकीय नाही असेच सतत सांगत राहिला. अश्या प्रकारे संघाने स्वतःची एक ‘विशिष्ठ प्रतिमा’, ‘खास चारित्र’ निर्माण केले आहे.
पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक ई-कचऱ्याची निर्मिती महाराष्ट्रात सर्वाधिक होते. दर वर्षी राज्यात सुमारे ५० हजार टना हून अधिक ई-कचरा तयार होतो.
शेगावच्या श्री गजानन महाराजांना दत्तगुरु आणि श्री गणेशाचे अवतार मानले जाते. त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचे अवतारही मानले जातात. गजाजन महाराजांच्या जन्माविषयी तशी कोणालाच खरी माहिती नाही. त्यांचा जन्म कधी झाला असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे समाधानकारक उत्तर मिळणार आहे. कारण त्यांचा जन्म हा न उलगडलेलं कोडं आहे. पण असं म्हणतात की इंग्रजी दिनदर्शिके प्रमाणे २३ फेब्रुवारी १८७८ मध्ये ज्यांना शेगावात पहिल्यांदा पाहिले गेले होते. हिंदू पंचांगानुसार, या माघ महिन्यातील कृष्ण पक्ष सप्तमी होती. त्यामुळे तिथी प्रमाणे आज त्यांचा प्रगट दिन आहे. त्यामुळे आज तिथी नुसार आलेल्या प्रगट दिनाला आज शेगावात मोठा प्रगटोत्सव दिन साजरा केला जातो. या दिवशी श्री गजानन महाराजांची पालखी मिरवणूक काढली जाते आणि त्यांच्या पादुकांच्या पूजन केले जाते.
असे म्हणतात की ज्या दिवशी ते दिसले तेव्हा ते १८ वर्षांचे होते. त्या वेळी ते शेगावातील देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती.
महाराजांना झुणका भाकरी सोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या , पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडार्याबसाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.
शेगावचे संत गजानन महाराज हे नेहमी मधून-मधून ‘गण गणगणात बोते’असा मंत्र म्हणत असत. एका शिष्याने महाराजांना त्याचा अर्थ विचारला. गजानन महाराज म्हणाले,‘पहिला ‘गण’ म्हणजे जीव किंवा जीवात्मा, दुसरा ‘गण’ शब्द म्हणजे शिव किंवा शिवात्मा आणि तिसरा शब्द ‘गणात’ म्हणजे ‘हृदयात ‘बोते’ म्हणजे पहा, बघा. ‘गण गण गणात बोते’, याचा अर्थ ‘हे जीवा, स्वतःच्या हृदयात शिवाला, परमेश्वराला बघ असा होतो.
महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले. त्यांनी गोविंदपंत टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये. गजानन महाराजांची शिकवण आजही अनेक लोक आत्मसात करतात.
Copyright © 2025 | Marathisrushti