एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
ऐन दिवाळीत मराठ्यांनी कल्याण व भिवंडी आदिलशाहीतून स्वतंत्र केले. महाराजांनी कल्याण शहराबाहेर, खाडीशेजारी दुर्गाडीचा किल्ला बांधला. याच दुर्गाडीच्या संरक्षणात स्वराज्याचे पहिले आरमार सजू लागले. कोळी, भंडारी, आगरी, दाल्दी, सारख्या दर्यावर्दी जमातींनी या नूतन आरमाराची धुरा सांभाळली.
आश्चर्य वाटेल, परंतु पुणे शहर एकेकाळी भारताचे नेतृत्व करीत होते. दिल्लीचा बादशाह कोण होणार, हे पुणे शहर ठरवीत होते. या शहराला प्राचीन आणि मध्ययुगीन असा मोठा वारसा आहे.
पुणे शहराची स्थानिक स्वराज्य संस्था पुण्याची नगरपालिका १ जुन १८५७ रोजी स्थापन झाली, तर पुणे महानगरपालिका १५ फेब्रुवारी १९५० रोजी स्थापन झाली. या सुमारे शतकभराच्या कालखंडात पुण्याच्या नागरी जीवनाला आधुनिक वळण प्राप्त होत गेले. वरं जनहितं ध्येयम् असे या महापालिकेचे बोधवाक्य आहे.
विसाव्या शतकात पुणे आधुनिक शहर म्हणून ओळखले जावू लागले. ते एक औद्योगिक केंद्र बनले. केवळ पेनिसिलीन कारखान्यासाठी ओळखली जाणारी पिंपरी आणि मोरया गोसावी देवस्थानासाठी ओळखले जाणारे चिंचवड यांची जोडनगरी आज आधुनिक उद्योगनगरी म्हणून गजबजली आहे. पुण्यातल्या अनेक जुन्या वाड्यांची जागा नव्या ओनरशिपने घेतली आहे. एकेकाळी हे शहर म्हणजे पेन्शनरांचे शहर होते. लोकांच्या स्थलांतराला वेग आला आहे. ‘सदाशिव-शनिवार-नारायण’ यांच्या कोथरूड-पौड रोड कडील ‘स्थलांतरच निर्देश उदाहरणादाखल पुरेसा आहे. टांगा आणि सायकलींचे शहर आता स्कूटर व मोटारीचे शहर बनले आहे.. पुण्यातील रस्ते, पूल व उड्डाणपुलांची संख्या वाढत आहे. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातले एक अग्रगण्य केंद्र म्हणून पुणे ओळखले जाऊ लागले आहे. कलानगरी क्रीडानगरीची जोड मिळाली आहे. परप्रांतीय व परदेशी विद्यार्थी असोत, रोजगार शोधणारे तरुण असोत व सुखाचा विसावा शोधणारे जागोजागचे पेन्शनर असोत, सर्वाना हि पुण्यनगरी आकर्षित करत आहे. तिचे रंगरूप झपाट्याने पालटत आहे; पण बदल कितीही झाले तरी ‘पुणे शहर अमोलिक, रचना अशी दुसरी नाही’, हे शाहीर राम जोशींचे उदगार सदेव खरे ठरतील, यात शंका नाही!
पुणे शहराची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय. ए. एस्. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. महानगरपालिका मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बनते. नगरसेवकांचे नेतृत्व महापौर या पदावरील व्यक्तीकडे असते. महापौर हे केवळ नाममात्र पद असून या पदाकडे अधिकार कमी असतात. पुणे महापालिकेचे क्षेत्र हे ४८ प्रभागात विभागले गेले असून प्रत्येक विभागाचे कामकाज साहाय्यक आयुक्त पहात असतात. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार महापालिकेच्या नगरसभेवर निवडून येण्यासाठी उभे करतात.
हरवलेले पुणे हे डॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. या पुस्तकात पुण्यातील सुमारे ५५ ऐतिहासिक ठिकाणांचे वर्णन आहे.हे पुस्तक उन्मेष प्रकाशनने प्रकाशित केले आहे.
या पुस्तकात पुण्यातील ऐतिहासिक कालातील लकडी पूल, पर्वती,सारसबाग,हिराबाग,कोथरुडबाग इत्यादी नानासाहेब पेशव्यांनी निर्मिलेल्या गोष्टींचे वर्णन केले आहे.पुण्यातील स्वारगेट,हुजूरपागा, रामोशी गेट इत्यादी ठिकाणांची नावे कशी पडली याचेही वर्णन या पुस्तकात केले आहे.पुण्यातील मंदिरांची सन १८१० साली केलेली यादी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मृत्यूनंतर जसे अवयवदान केले जाते तसेच जिवंतपणी यकृतदान, किडनीदान, गर्भाशयाचे दान केले जाऊ शकते.
२९ डिसेंबर १९६५ मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला. भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. १९७४ साली वि. स. खांडेकर, १९८७ साली वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि २००३ साली विंदा करंदीकर व २०१४ साली ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे या मराठी लेखकांचा ज्ञानपीठ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
आपण भारतात १ जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करतो.
सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या मागण्यांसाठी डॉक्टरांची सततची होणारी आंदोलने, उपोषणे आणि या घटनांचे सर्वसामान्यांवर होणारे दुष्परिणाम तसंच इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातही बोकाळलेला भ्रष्टाचार. तत्सम असंख्य गोष्टींमुळे एकूणच वैद्यकीय व्यवस्थेबद्दलचं सर्वसामान्यांचं मत काहीसं कलुषित झालेलं दिसतं. असं असताना आज हा दिवस नव्याने डॉक्टर-रुग्ण या नात्यातील विश्वासार्हता दृढ करण्याच्या उद्देशाने साजरा केला गेल्यास भविष्यात आंदोलनाप्रसंगी सर्वसामान्यांना वेठीस न धरण्याचे आशादायी चित्र आपण रंगवू शकतो. मुळात, समाजात चांगल्या-वाईट प्रवृत्ती समाजाच्या सर्वच स्तरावर आहेत. डॉक्टरही माणूस आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आपल्या कर्तव्याप्रती दक्ष असणा-या, दिनरात्रीची तमा न बाळगता सेवेसाठी तत्पर असणा-या आणि संशोधनातून वैद्यकीय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणा-या तसंच कित्येकांना नवं जीवनदान देणा-या अनेक डॉक्टरांची उदाहरणं आजही आपल्या आसपास दिसतात. त्यामुळे डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. आज हा दिवस त्या चांगल्या गोष्टींची आठवण करण्याचा.. आपल्या डॉक्टरांनी आतापर्यंत आपल्या जीवनात सुदृढ आरोग्यासाठी केलेल्या मदतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आतापर्यंत आपल्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेत आलेल्या आपल्या डॉक्टरांना आजच्या जागतिक डॉक्टर दिनानिमित्त त्यांच्याही उत्तम स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन आकाशवाणी माध्यम मनोरंजन आणि प्रबोधन या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी काम करीत आहे.
मैने प्यार किया या चित्रपटाला प्रदर्शीत होऊन तब्बल २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. २९ डिसेंबर १९८९ रोजी हा चित्रपट प्रदर्शीत झाला. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. सलमान खानच्या अभिनय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे 'मैने प्यार किया'. रॉयल मराठी कुटुंबात वाढलेल्या भाग्यश्रीनेही याच चित्रपटाने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाने त्याकाळी यशाचे अनेक रेकॉर्ड तोडले. यातील कलाकार सलमान खान आणि भाग्यश्री यांना या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटादरम्यान प्रथमच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आलेले सूरज बडजात्या यांचे नुकतेच लग्न झाले होते. त्यावेळी सेटवर सर्वात अगोदर येणारे आणि सर्वात शेवटी जाणारे ते एकमेव व्यक्ती होते. त्यांच्या या सवयीमुळे सलमान आणि भाग्यश्री त्यांना पत्नीसोबत वेळ घालवण्याचा सल्ला देत असत. पण कामाला पूर्णपणे वाहून घेतलेले सूरज यांचा सेटवरील दिनक्रम चुकत नसे. सलमान आणि भाग्यश्री सेटवर धमाल मस्ती करण्याचा एक क्षणही सोडत नसत.
मूळचे वाशीम येथील आणि आता मुंबईत वास्तरव्या स असलेले मराठमोळे लेखक एस.एम.आहाळे यांच्या् लेखनीतून 'मैंने प्यार किया' साकारला आहे. आहाळे यांना बाल्याेवस्थेकपासूनच नाटकाची आवड होती. त्यायतून ते नट होण्यापसाठी मुंबईला गेले. मात्र,तिथे अभिनेत्याचऐवजी स्क्री प्टण राइटर म्हचणून त्यांयनी लौकिक मिळवला. त्यांोनी 'हम आपके है कोन','एक रिश्ताब','प्यायर दिवाना होता है','दिल ने फिर याद किया',यासह इतर अनेक चित्रपटांचे लेखन केलेले आहे. या शिवाय 'एक से बढकर एक' या लोकप्रिय मालिकेसह इतर अनेक हिंदी मालिका लिहिल्याात.
मैंने प्यार किया’मधील रिमा लागू यांनी साकारलेली आई आजही अनेकांच्या लक्षात आहे. मातृत्व आणि पत्नी धर्म यांमध्ये अडकलेली आई रिमा यांनी चांगलीच साकारली होती. आजही टीव्हीवर हा सिनेमा लागला की, रिमोट आपसूक बाजूला ठेवून सिनेमा पाहिला जातो. या सिनेमामुळे रिमा यांच्या करिअरला नवीन उभारी मिळाली.
सलमान खाननेही नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यातही सलमान आणि रिमा यांच्या वयात फारसे अंतर नव्हते. रिमा या सलमानपेक्षा फक्त आठ ते नऊ वर्षांनीच मोठ्या होत्या. या सिनेमावेळी त्यांचे वय ३० ते ३५ वर्षांच्या आसपास होते. अशात सलमानची आई साकारणं तसं आव्हानच होतं. पण सुरज बडजात्या यांनी या सिनेमात बॉलिवूडपटात दाखवतात तशी टिपिकल केस पांढरे असलेली, खंगलेली आई न दाखवता रिमा लागू यांच्या लूकवर काम केले आणि देशाला नवीन आईची ओळख करून दिली. पण मेकअपच सगळं काही करतो असे नाही ना.. रिमा लागू यांनी त्यांच्या अभिनयाने ही व्यक्तिरेखा अशापद्धतीने साकारली की आजही ‘मैंने प्यार किया’ म्हटलं की रिमा यांची ती व्यक्तिरेखा डोळ्यांसमोरून जात नाही.
अभिनेत्री भाग्यश्री हिचा ‘मैंने प्यार किया’ हा पहिलाच डेब्यू सिनेमा या चित्रपटात भाग्यश्रीने साकारलेली साधी-सरळ सुमन लोकांना मनापासून भावली. ‘मैंने प्यार किया’नंतर भाग्यश्रीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास लोक उत्सूक होते. पण पहिल्याच चित्रपटानंतर भाग्यश्री बॉलिवूडमधून दिसेनासी झाली. खरे तर ‘मैंने प्यार किया’ नंतर भाग्यश्रीकडे खूप मोठ मोठ्या आॅफर्स आल्यात पण भाग्यश्रीने त्या सगळ्या धुडकावून लावल्यात. का? तर याच ‘का’चे उत्तर भाग्यश्रीने दिले आहे. एका मुलाखतीत भाग्यश्रीने ‘का’वर मौन तोडले. ‘मैंने प्यार किया’ भाग्यश्री अचानक बॉलिवूडमधून गायब झाली, याचे कारण आहे, तिचे प्रेम. होय, बालपणीचा मित्र हिमालय दासानी याच्या प्रेमामुळे भाग्यश्रीने चित्रपटांच्या आॅफर्स नाकारल्या. तिने सांगितले की, ‘मी आणि हिमालय लहानपणापासूनचे मित्र.
आमच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. पण माझ्या घरच्यांना आमचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळे हिमालय शिक्षणासाठी अमेरिकेत गेला, त्यावेळी आम्ही ब्रेकअप केले. तो अमेरिकेत असताना मी ‘मैंने प्यार किया’ साईन केला. अर्थात हा चित्रपट साईन करण्याआधी मी हिमालयच्या आई-वडिलांची परवानगी घेतली होती. कारण आज नसलो तरी उद्या मी व हिमालय सोबत असू, याची मला खात्री होती. हिमालयच्या घरच्यांना आमचे नाते मनापासून मान्य होते. अमेरिकेतील शिक्षण संपवून हिमालय भारतात परत आला. माझे कुटुंबीय तरीही त्याला स्विकारायला तयार नव्हते. एकदिवस मी हिमालयला फोन केला आणि हे नाते पुढे न्यायचे का? असा प्रश्न त्याला विचारला. मी घर सोडलेय, माझ्यावर प्रेम असेल तर मला घ्यायला ये, असे मी त्याला म्हटले. यानंतर पुढच्या पंधरा मिनिटात हिमालय माझ्या घराबाहेर होता. आम्ही मंदिरात लग्न केले. हिमालयचे कुटुंब, सलमान आणि सूरत बडजात्या असे मित्र आमच्या लग्नात हजर होते. तोपर्यंत ‘मैने प्यार किया’ सुपरहिट झाला होता. मला खूप आॅफर आल्यात. पण हिमालयच्या प्रेमात मी आकंठ बुडाले होते. शिवाय लग्नानंतर लगेच अभिमन्यूचाही जन्म झाला.
याच कारणामुळे मी सगळ्या आॅफर्स नाकारत गेले. अर्थात मला त्याचा अजिबात पश्चाताप नाही.’ १९९१ मध्ये आलेल्या‘ मैंने प्यार किया’साठी भाग्यश्रीला बेस्ट डेब्यूचा अवार्ड मिळाला होता. यानंतर तिने तामिळ, तेलगू, भोजपूरी अशा काही चित्रपटांत काम केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मैने प्यार किया चित्रपट.
https://youtu.be/l62WNDstEpc
२४ फेब्रुवारी १९४४ रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क व नमक कायदा लागू केल्यामुळे सेंट्रल एक्साइज (केंद्रीय कस्टम आणि उत्पादन शुल्क) (Central Board of Excise and Custom – CBEC) दिवस २४ फेब्रुवारीला साजरा केला जातो.
जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे.
रुग्ण सेवेसाठी परिचारिका ही अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे .रूग्णसेवा हीच इश्वर सेवा मानून कितीही अडचणी, समस्या आल्या तरी त्याची पर्वा न करता रूग्णांची सेवा, त्यांची सुश्रूषा करणे हेच आमचे अद्य कर्तव्य असल्याची भावना अनेक परिचारिकांची असते. १२ मे रोजी जगप्रसिद्ध परिचारिका फ्लोरेन्स नाइंटिगेल यांची जयंती असते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन याच दिवशी साजरा होतो.
मॉडर्न नर्सिगची सुरुवात आणि जडणघडण इस्पितळांच्या चौकटीतच झाली आहे. नव्या जमान्यात समाजाला आरोग्य सेवा प्रदान करताना आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता जाणवू लागली आहे. लोकांच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता आणि वैयक्तिक देखभाल याचा विचार केला तर नर्सिग हा सर्वात मोठा समूह आहे. रुग्णाने लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन चांगल्या आरोग्याच्या दिशेने वाटचाल करावी, हा सुश्रुषेचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. जगभरातील परिचारिका रुग्णांची देखभाल करताना याच उद्देशाने रुग्णांची दैनंदिन सुश्रुषा करत असतात.
रुग्ण, परिवार आणि समाजाला दैनंदिन जीवनात आनंद लाभावा, त्यांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांना रुग्णस्थितीतून बाहेर पडता यावे, यासाठी सृजनात्मक आणि नव नव्या उपायांचा परिचारिका प्रयोग करत असतात. अशा बदलांना मूर्त स्वरुप देताना परिचारिका आघाडीवर आहेत. विविध क्षेत्रातील रुग्णांची सेवा करताना परिचारिकेला ज्ञान, कौशल्य आणि सेवाभावी वृत्तीची जोड अनिवार्य आहे. बेसिक बी.एस्सी. नर्सिग कार्यक्रमांतर्गत अनेक संस्था परिचारिकांना ज्ञान, कौशल्य, सेवावृत्तीचे प्रशिक्षण दिले जात आहे. नर्सिग हा सेवाभावी तसेच आरोग्य आणि लोकांच्या आरोग्यप्रती स्वत:चे योगदान देणारा व्यवसाय आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti