(User Level: User is not logged in.)

अध्यात्मिक-धार्मिक

Sort By:

  • निरंजन – भाग ५३ – शिकवण

    एका गुरुकुलातील हि कथा… जिथे शिष्यांना ध्यान, ज्ञान आणि दैनंदिन जीवनातल्या गोष्टींना अनुसरून विद्या मिळत होती. नेहमीप्रमाणे गुरु, शिष्यांबरोबर ज्ञानचर्चा करण्यापूर्वी काही काळ ध्यान धारण करीत असत.

  • निरंजन – भाग ४७ – आपल्या प्रत्येक देण्यामध्ये येणं हे आहेच

    काय परिणाम होईल हे माहिती नसताना देखील, जेव्हा जयदीपने विश्वासाने स्वतःजवळ जे पण आले ते देण्याची तयारी ठेवली तेव्हाच त्याने त्या मोबद्ल्यात कितीतरी जास्त पटीने सुख मिळवले. जेव्हा आपण आपली मनस्थिती बदलतो तेव्हाच आपण आपल्या परिस्थितीत बदल घडवु शकतो.

  • निरंजन – भाग ५० – शुभ असावा लोभ…

    लोभसपणा म्हणजे मोह होऊन जडलेले आकर्षण. कधी ते आकर्षण एखाद्या व्यक्तीवर होते तर कधी ते आकर्षण एखाद्या वस्तूचे असते. लोभ हा प्रत्येकाकडे आहे, पण तो इतरांच्या वस्तूवर कधीही नसावा, यावर रचलेली एक सुंदर बोधकथा…

  • निरंजन – भाग १

    एकाग्रतेने मनाची स्थिरता वाढते आणि स्थिरता वाढल्यामुळे मन एकचित्त होउन हाती घेतलेल्या कार्यामध्ये आपले आपसुकच चिंतन वाढते आणि जेव्हा चिंतन वाढते तेव्हा नैसर्गिकरित्या आपाल्याला खुप सार्‍या वेगवेगळ्या कल्पना आपोआपच सुचतात. ज्यामुळे कामाची गती वाढते, त्या कामामध्ये कोणतीही अडचण येत नाही. आणि हाती घेतलेले काम खुप सुंदर पद्धतीने पार पाडले जाते.

    ही जी एकाग्रता आहे ती प्रत्ये़कामध्ये आहे, फक्त फरक हा इतकाच कि, आपण ती योग्य मार्गावर उपयोगात आणत नाही. एकाग्रतेने केलेले प्रत्येक कार्य हे खुप सुंदर पद्धतीने पार पाडले जाते. कित्येकदा आपण एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करतो परिणामी त्यातले एकही कार्य सुरळीत पार पाडले जात नाही आणि निकाल मात्र शुन्य तर इथे आहे आपल्यामधल्या एकाग्रतेचा अभाव..... कारण जेव्हा आपण एकाच वेळी खुप सार्‍या जबाबदार्‍या स्वत:वर घेतो तेव्हा आपण त्यात तितक्याच क्रियेंमध्ये वाटले जातो. आणि तितक्याच विचारांनी कार्यरत राहतो. अशा वेळी जर आपले लक्ष एखाद्या वेगळ्याच विचारांनी भरले गेले किंवा आपले लक्ष भटकले गेले तर मात्र आपण आपल्या क्रियेमध्ये परिपुर्ण एकाग्रता साधु शकत नाही. त्यामुळे आपण आपले संपुर्ण चित्त एका ठिकाणी लावु शकत नाही. परिणामी कार्य विस्कळीत होते.

    "चित्त थार्‍यावर नाहिये" असं आपण आपल्या नेहमीच्या दैन्ंदिन चर्चेत अनेकदा ऐकतो, कधी-कधी काम अपुर्ण राहिल्यावर तर कधी एखाद्याला दिलेली जबाबदारी त्याने विस्कळीतपणे पार पाडल्यावर. "चित्त थार्‍यावर नसणे" म्हणजेच "कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित नसणे", एकाग्रता नसणे...

    अनेकदा आपण अनुभवलं असेलच की कित्येकजण खुप घाई करुन काम करतात फक्त लवकर काम आटोपण्यासाठी, पण तसे होत नाही कारण घाई करुन आपण एकाग्रता साधु शकत नाही. याउलट आपण ते काम कितीतरी पटीने वाढवुन ठेवतो. कारण घाईघाई ने अचुकता साधता येत नाही, जितका वेग महत्वाचा आहे त्याहुनही कितीतरी पटींनी महत्वाची आहे ती आपण केलेल्या कार्यामधली अचुकता.... आणि ही अचुकता साधता येते ती फक्त एकाग्रतेने.....अजुन एक विषय म्हणजे सध्याच्या काळातील लोकांचे विचार हे जितके गतीमय झाले आहेत तितकाच तो अस्थिर ही झाला आहे आणि त्यामुळेच मनाची चंचलता खुपच वाढली आहे. याच चंचलतेचा परिणाम आज नातेसंबधांवर सुदधा दिसुन येत आहे. कारण सतत प्रत्येकाची आवड निवड ही त्यांच्या बदलत्या विचारांप्रमाणे बदलत चालली आहे. इतकेच नाही तर आपण स्वतः ही स्वतःपासुन दुरावले गेले आहोत. कधीकधी कित्येकदा आपण इतरांची विनाकारण चर्चा करत बसतो काहिही कारण नसताना. तर कधी कधी इतरांशी तुलना करुन स्वतःहुन स्वतःचे विचार वाढवुन घेतो. आज जी एकाग्रता आपण इतरांच्या चर्चेमध्ये साधुन बसलो आहोत. तिच जर आपण आपल्या स्वतःवर साधली, स्वतःच्या श्वासांवर साधली तर नक्कीच चित्त केंद्रित होईल, लक्ष्य साधता येईल, विचार कमी होतील, वाईट स्वभाव बदलेल, वाईट सवयी बदलतील, जीवनाचे ध्येय कळेल, जीवनाचे व्यवस्थापन कळेल, वेळेचे महत्व कळेल. कार्य अर्थपुर्ण होतील. खुप काही सुंदर बदल घडतील. म्ह्णजेच कुठेतरी आपल्याकडे एकाग्रता ही जाग्रुत आहे पण ती कुठे उपयोगात आणली पाहीजे याचं वळण मात्र खुपच चुकतय. याची दिशा चुकतेय.

    योग्य ती दिशा निवडण्यासाठीच आपल्याला योग्य अशा मार्गदर्शकांची जीवनामध्ये अत्यंत गरज असते. योग्य तो मार्ग आणि योग्य ती दिशा सुचवणारी व्यक्ती ही फक्त ध्यानगुरु असते. अर्थातच ही व्यक्ती संपुर्ण एकाग्र चित्त असणारी असते. एकाग्रतेवर विजय मिळवलेली असते. संपुर्ण स्थिर असते. अशी संपुर्ण स्थिर, एकाग्र चित्त असणारी व्यक्तीच चंचलतेला अंकुश लावु शकते कारण स्थिरतेमध्येच क्षमता आहे अस्थिरतेवर मात करण्याची जशी प्रकाशामध्ये क्षमता आहे अंधकाराला दुर करणाची..............अशी मार्गदर्शक व्यक्ती म्हणजेच ध्यानगुरु, एकाग्रतेवर ध्यान असणारे गुरु...

    गुरु द्रोणाचार्यांच्या नजरेत अर्जुन हे श्रेष्ठ धनुर्धारी होते हे फक्त अर्जुनांच्या एकाग्रतेमुळेच. आपल्या शिष्यांच्या धनुर्विद्येचे परिक्षण करताना त्यांनी एकाग्रता पाहिली ती फक्त अर्जुनाकडे. कारण अर्जुनाने एकाग्रतेने लक्ष्य साधले होते. तसेच एकलव्य ही श्रेष्ठ धनुर्धर होते ज्यांनी न पाहता फक्त ध्वनीवर एकाग्रता ध्यान साधले होते. त्यांनी भुंकणार्‍या श्वानाचा आवाज त्याला इजा न होउ देता भुंकणे बंद केले होते. यावरुन आपल्याला स्पष्ट झालेच असेल कि एकाग्रता हि किती महत्वाची आहे. जर आपण नेहमी २० ते २५ मिनिटे एकाग्रता ध्यान केले तर जीवनामध्ये अकल्पनीय असे बदल नक्कीच घडुन येतील. जीवनामध्ये असे बदल घडवुन आणण्यासाठी एकाग्रता ध्यान खुप महत्वाचे आहे.

    - स्वाती पवार

  • निरंजन – भाग ३ – स्मरण भक्ती

    स्मरण म्हणजे आठवण…एखादया गोष्टीचे चिन्तन…..बालपणापासुन खुप अश्या आठवणी आपण मनात जपलेल्या असतात. लहानाचे मोठे होई पर्यंत लहान सहान गोष्टी समोर येतात आणि खुप सार्‍या गोष्टी स्मरण करुन देतात.

  • निरंजन – भाग २७ – माता चंद्रघण्टा

    नवदुर्गेचा तिसरा अवतार हा माता चंद्रघण्टा…. चंद्रघण्टा मातेच्या मस्तकावर चंद्र सुशोभित आहे आणि मातेच्या हाती नाद करण्यासाठी घण्टावादय आहे. माता चंद्रघण्टा या साक्षात ध्वनिमुर्ती आहेत.

  • निरंजन – भाग ५५ – परीक्षा

    जीवनामध्ये प्रत्येक वेळी यश प्राप्त केल्यानंतर एका ठराविक पायरीवर आपल्या ज्ञानाची परीक्षा होते. आपण ज्ञान कितपत योग्य पद्धतीने आत्मसात केले, याची नियतीनुसार टप्प्याटप्प्याने पडताळणी होते. अशीच एक परीक्षा गुरुंनी आपल्या तीन शिष्यांची घेतली….

  • निरंजन – भाग ३५ – चैतन्य

    चैतन्य व्यक्तीमध्ये जगण्यासाठी वेगवेगळी निमित्त निर्माण करतं. चैतन्यच जीवनामध्ये नवी उमेद निर्माण करतं. ही उमेद आपल्याला पुन्हा-पुन्हा नव्याने जीवन जगायला शिकवते.

  • निरंजन – भाग ३८ – “सा विद्या या विमुक्तये”

    रोग, दुःख, क्रोध, पाप, बेरोजगारी, अभाव, दारिद्र्य, अज्ञान आणि गैरवर्तन यांसारख्या काळोखातुन म्हणजेच अनेक बंधनातून मुक्त करते, प्रकाशाची दिशा दर्शवते, तीच खरी विद्या…विद्या ही मानवाच्या प्रवृत्तीमध्ये बदल घडवते. मानवाला उच्च दर्जाची वर्तणूक शिकवते.

  • निरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्

    कधी कधी जे कार्य बोलुन साधता येत नाही, ते फक्त मौन धारण करूनच साधता येते कारण जेव्हा आपण मौन बाळगतो त्या वेळेला आपल्या अंतर्मनातली उर्जा अधिकाधिक कार्यरत होते. आपली इच्छाशक्ती जास्त कार्य करते. आपली परिपूर्ण एकाग्रता एखाद्या कार्यामध्ये कितीतरी पटीने एकवटली जाते.