एकोणिसाव्या शतकातील मुंबईच्या सामाजिक जीवनात समरस झालेले एक प्रमुख व्यक्तिमत्व. व्यवसायाने डॉक्टर. त्यांच्या प्रयत्नामुळे मुंबईत ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना. लोकांमध्ये स्वत्वाची भावना जागवण्याचे कार्य तळमळीने केले.
महाराष्ट्रातील एक प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक व कुशल धन्वंतरी. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. त्यांच्या वडिलांना दाजी म्हणत व मित्र परिवारात ते भाऊ या नावाने परिचित होते. त्यामुळे पुढे भाऊ दाजी हे नाव रुढ झाले. त्यांचा जन्म आजोळी गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला. वडील पार्से (गोवा) येथे शेती तसेच कारकुनीचे काम करीत. व्यवसायानिमित्त लाड कुटूंब मुंबईला गेले (१८३२). तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करुन विकत असत. भाऊ दाजींचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले. पुढे एलिफन्स्टन विद्यालयात व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. खाजगीरीत्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियूक्ती झाली. (१८४३). या सुमारास त्यांचा पार्वतीबाई या मुलीबरोबर विवाह झाला. त्यांना विठ्ठल व द्वारकानाथ हे दोन मुलगे होते. द्वारकानाथ तारुण्यातच निधन पावला. वडिलांनी संन्यास घेऊन एलेफंटा (घरापूरी) येथे वास्तव्य केले.
भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषंात एक निबंध लिहिला. निबंध स्पर्धेत त्यांना ६०० रुपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली. डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथात यातील मजकूर उदधृत केला आहे.
(१८२४-१८७४)
एकोणिसाव्या शतकातील मुंबईच्या सामाजिक जीवनात समरस झालेले एक प्रमुख व्यक्तिमत्व. व्यवसायाने डॉक्टर. त्यांच्या प्रयत्नामुळे मुंबईत ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना. लोकांमध्ये स्वत्वाची भावना जागवण्याचे कार्य तळमळीने केले.
महाराष्ट्रातील एक प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक व कुशल धन्वंतरी. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. त्यांच्या वडिलांना दाजी म्हणत व मित्र परिवारात ते भाऊ या नावाने परिचित होते. त्यामुळे पुढे भाऊ दाजी हे नाव रुढ झाले. त्यांचा जन्म आजोळी गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला. वडील पार्से (गोवा) येथे शेती तसेच कारकुनीचे काम करीत. व्यवसायानिमित्त लाड कुटूंब मुंबईला गेले (१८३२). तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करुन विकत असत. भाऊ दाजींचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले. पुढे एलिफन्स्टन विद्यालयात व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. खाजगीरीत्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियूक्ती झाली. (१८४३). या सुमारास त्यांचा पार्वतीबाई या मुलीबरोबर विवाह झाला. त्यांना विठ्ठल व द्वारकानाथ हे दोन मुलगे होते. द्वारकानाथ तारुण्यातच निधन पावला. वडिलांनी संन्यास घेऊन एलेफंटा (घरापूरी) येथे वास्तव्य केले.
भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषंात एक निबंध लिहिला. निबंध स्पर्धेत त्यांना ६०० रुपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली. डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथात यातील मजकूर उदधृत केला आहे.