वॉटर हीटर (सोलर)
लेखसंग्रह

वॉटर हीटर (सोलर)

Category:

 

भारत हा उष्णकटिबंधातील देश असल्याने आपल्याकडे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर बाकीचे दिवस सूर्यप्रकाश असतो. सहस्ररश्मी सूर्याची फुकट मिळणारी ऊर्जा वापरणे हा खरेतर इंधन टंचाईवरचा एक पर्याय आहे. पाणी तापवण्यासाठी आपण घरातील किमान २५ टक्के ऊर्जा खर्च करीत असतो ती वाचवता आली तर विजेचा किंवा गॅसचा वापर टाळल्याने प्रदूषण होणार नाही. सोलर वॉटर हीटर हा असाच एक पर्याय आहे. सोलर वॉटर हीटर तयार करताना जी कार्बनची निर्मिती झालेली असते ती या हीटरच्या वापराने ४-५ वर्षांत भरून निघते

डीएनए कॉम्प्युटर
लेखसंग्रह

डीएनए कॉम्प्युटर

Category:

 

डीएनए आणि कॉम्प्युटर (संगणक) यांचा काय संबंध असे कुणालाही वाटेल यात शंका नाही पण सजीवांच्या शरीरात माहिती साठवणाऱ्या डीएनएचा वापर संगणकासारखा करता येतो हे आता संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. आपल्या नेहमीच्या संगणकात मायक्रोप्रोसेसर ही चिप असते, तर डीएनए कॉम्प्युटर या नॅनोकॉम्प्युटरमध्ये ही जागा डीएनए सांभाळत आहे.

प्रदूषणमापक यंत्र
लेखसंग्रह

प्रदूषणमापक यंत्र

Category:

 

हवा प्रदूषण हे अनेक रोगांना कारण ठरणारे आहे. जागतिक ‘आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी २४ लाख लोक त्यामुळे मरतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात रसायने, सूक्ष्मकण, जैविक घटक हवेत मिसळतात. प्रदूषकांची हवेतील पातळी मोजून ती हवा श्वसनास योग्य की अयोग्य ते ठरवले जाते.

No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

पारवा

Category:

 

पारवा म्हणजे कबूतर. घराच्या कौलारावर अथवा वळचणीला काहीही हालचाल न करता तासन्तास शांतपणे बसून राहिलेले कबूतर अनेकांनी पाहिले असेल. एखाद्या योग्याप्रमाणे जणू काही ध्यान लावल्यासारखे ते स्थितप्रज्ञ बसलेले असते. कबुतराचा आवाजदेखील घुमल्यासारखा धीरगंभीर असतो. अशा स्थितप्रज्ञ पारव्याचे चित्र बालकवी कसे रेखाटतात पहा

No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

देवा, ह्याही देशात पाऊस पाड

Category:

 

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ ही प्रतिज्ञा आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो, परंतु आज या देशाचे खरेखुरे चित्र कसे आहे? वास्तवरूप कसे आहे, हे डोळसपणे पाहू लागलो तर आपल्याला वेगळेच दर्शन घडते. आपल्या देशात अनेकदा जातीय दंगली माजतात, एकमेकांच्या धर्माचा अपमान करून सामान्य जनतेला चिथावणी दिली जाते. अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्टाचार अशा गोष्टींना उत्तेजन दिले जाते. पुढारी लोक खोटे मुखवटे धारण करून समाजसेवेचा आभास निर्माण करतात. प्रत्यक्षात मात्र स्वत:चे आणि नातेवाइकांचे हित करून घेतात. स्वतःच्या अधिकारपदाचा वापर करून घेऊन जवळच्या लोकांना मोठमोठी पदे, नोकऱ्या मिळवून देताना इतर बुद्धिमान, आणि वशिलेबाजीचा वापर न करणाऱ्या तरुण वर्गावर अन्याय करतात. अशा परिस्थितीमुळे देशाची विभागणी सरळसरळ दोन वर्गांत होते. एक अत्यंत धनिक वर्ग, जो गरिबांचे शोषण करून स्वतः श्रीमंत होत राहतो आणि दुसरा अत्यंत गरीब, अन्याय निमूटपणे सहन करणारा शोषित वर्ग. अशा प्रकारे शोषक आणि शोषित अशी विभागणी या देशात शतकानुशतके चालत आली आहे. एका बाजूला वैभव मिरवणाऱ्या उत्तुंग इमारती आणि दुसऱ्या बाजूला दारिद्र्याने खचलेली झोपडपट्टी असे दृश्य भारतातील प्रत्येक शहरात दिसते.

No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

आई

Category:

 

आईची महती अनेक थोर कवींनी वर्णन केली आहे. ‘प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई’ – माधव जूलियन, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ -यशवंत, ‘निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी – भा. रा. तांबे किंवा ‘अंतरले पाय तुझे हाय हाय माते ।’ – केशवसुत. आई आपल्या मुलाची मायेने काळजी घेते. त्याला घास भरवते. लहानाचा मोठा करते. आजारपणात सेवा करते. आईमुळेच घराला घरपण येते. मुलाला घडवण्यात, त्याच्यावर चांगले संस्कार करण्यात आईचा वाटा फार मोठा असतो. चार-पाच दिवस जरी आई घरापासून दूर बाहेरगावी गेली तर घर सुने सुने होऊन जाते. आईच नसलेले घर तर अगदी पोरके होऊन जाते. इतके आईचे स्थान महत्त्वाचे आहे.

No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

आम्ही कोण?

Category:

 

केशवसुतांनी कवितेतून कवित्वाची नवी जाणीव प्रकट केली हे त्यांचे वैशिष्ट्य. ‘आम्ही कोण? ‘ या कवितेत कवितेबद्दलचा विचार मांडला आहे, पण त्याशिवाय त्यांच्या इतरही अनेक कवितांमधून त्यांनी कवितेचे महत्त्व ठासून सांगितले आहे. ‘अशी असावी कविता म्हणून’, ‘रांगोळी घालताना पाहून’, ‘जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे’, ‘जिने मला वेडे केले तिच्यावरी ही फिर्याद’ किंवा ‘दुर्मुखलेला’ या कवितांमधून त्यांनी कवितेच्या निर्मितिप्रक्रियेविषयी व एकूणच कवितेचे मोठेपण दाखवून दिले आहे.

No Picture
कथा

स्मरणगाथा : १०

Category:

 

सिंहावलोकन करताना आणि जपून ठेवलेली स्मृतिचिन्हे बघताना मनात कृतज्ञता दाटून येते . अर्ज करून , कागदपत्रे सादर करून आणि अनेकदा पैसे भरून पुरस्कार मिळवण्याचा आत्ताचा हा काळ . पण मला जेव्हा पुरस्कार लाभत होते तेव्हा यातील काहीही मी केले नव्हते , हा विचार माझ्या मनाला सुखावून जातो . कारण तेव्हा अनेक संस्था , व्यक्ती , वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे किंवा त्यांच्या व्यवस्थेतून माहिती मिळवून पुरस्कार देत असत .हा अनुभव अनेकांना त्याकाळात आला असेल .

मला वाटते की लेखन करणाऱ्याला , काम करणाऱ्या सेवाभावी वृत्तीला , सामाजिक कार्यात अखंड गुंतून पडलेल्या व्यक्तीला किंवा जगावेगळं काहीतरी करणाऱ्याला ऐन उमेदीत पुरस्कार लाभला तर उर्वरित आयुष्यात ती व्यक्ती किंवा संस्था अधिक कार्यप्रवण होऊ शकतात .

सतत लेखन करत राहण्याची उर्मी आणि प्रेरणा मला या पुरस्कारांनी दिली , असे म्हटले तर वावगे ठरू नये .

आपण काहीतरी चांगले काम करत असतो आणि कुणी ना कुणी त्याची दखल घेत असतो , हे मी अनुभवलं आहे .

No Picture
कथा

स्मरणगाथा : ९

Category:

 

ही कहाणी आहे , काही रिपोर्टर्सची , स्टुडिओमधील अनाऊन्सर्सची , ओबी व्हॅनच्या चालकांची , न्यूज कोऑर्डीनर्सची, ग्राफिक डिझाईनर्सची , टीआरपी साठी हपापलेल्यांची , न्यूज मधली एक्सायटिंग व्हॅल्यू शोधण्यासाठी मेंदूचा भुसा करायला लावणाऱ्यांची .

ही कादंबरी लिहिताना खरंतर खूप अस्वस्थ व्हायला झालं होतं . कितीही विधायक दृष्टी ठेवली तरीही प्रत्यक्षात वेगळं घडतं याची टोचणी वारंवार होत होती .
पण जे चाललं आहे ते वाचकांपर्यंत पोहोचविणे मला महत्वाचे वाटत होते .
सलग तीन महिने ही कादंबरी मी लिहीत होतो .
आणि संवेदनशील वाचकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर समाधान वाटले .
मेनका दीपावली अंकात ती प्रसिद्ध झाली आणि नेहमीप्रमाणे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला .

पण त्याचा आनंद मानायचा , की हे भयंकर विश्व अजूनही त्याच पद्धतीने चालत आहे , याचे वैषम्य वाटून घ्यायचे , या संभ्रमात मी आहे .