No Picture
कथा

बांधणी भाषेची आणि दडलेले अंतरंग

Category:

 

मराठी भाषा,भाषेचे उच्चार, लहेजा, त्यामधून डोकावणारं आणि ऐकणाऱ्याला जाणवणारं वेगळेपण, भाषेचे वळसे, वेलांट्या, वळणं आणि त्यामधून बाहेर येणारं पोटातलं या सगळ्याची एक गंमत असते नाही ?

No Picture
कथा

उणा आनंद…….

Category:

 

टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात रंगमंचावरून मानसच्या नावाची घोषणा झाली,
“आणि आपल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे, पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत……….”
संपूर्ण सभागृह त्याच्या रंगमंचाकडे येण्याची प्रतीक्षा करत होतं. उत्तेजनार्थ क्रमांकापासून तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या घोषणेपर्यंत तो ही टाळ्यांनी विजेत्या स्पर्धकांचं कौतुक करत होता, आणि मनातून निराशही होत होता. प्रचंड रहदारीमधून बसचा दीड पावणेदोन तासाचा प्रवास करून आला होता तो बक्षीस समारंभाला. ही स्पर्धा त्याच्यासाठी फार महत्त्वाची होती. गेली तीन वर्ष , पहिल्या तीन क्रमांकात येण्यापासून या स्पर्धेने मानसला हुलकावणी दिली होती. आजवर अनेक काव्यस्पर्धांवर त्याने आपल्या काव्यरचनेची मोहोर उमटवून यश प्राप्त केलं होतं. आजही घरून निघताना, मानसने प्रत्येकाची चाचपणी करून पाहिली, आपल्यासोबत येण्यासाठी. काही ना काही कारण सांगून, प्रत्येकानेच नकार दिला होता. आणि तसंही आजवर त्याला मिळालेल्या प्रत्येक पारितोषकासोबत तो एकटाच घरी आला होता. सवय झाली होती, तरीही प्रत्येक वेळी घरच्या कुणी सोबत यावं, असं मनोमन वाटायचं त्याला. उत्तर माहीत असूनही तो प्रत्येकाला विचारायचा, आणि अखेर एकटा चालता पडायचा. आजही तो एकटाच उपस्थित होता त्या भरलेल्या सभागृहात.
No Picture
कथा

गोष्ट त्या दोघांची

Category:

 

गिरिजाआत्या अणि तिचे यजमान रत्नाकर. आम्ही त्यांना काकाच म्हणायचो. दोघांचा संसार तसा वाढलेल्या वयावरच सुरू झाला. रत्नाकर आपल्या लग्नाचं वय उलटुन गेलेल्या बहिणीसाठी थांबून राहिले होते आणि गिरीजाआत्याचं लग्न जुळत नव्हतं म्हणून ती बिनलग्नाची राहिली होती. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी हे प्रपोजल दोघांच्याही समोर आलं होतं. परंतू प्रत्येक गोष्ट घडण्याची नियतीने एक वेळ निश्चित केलेली असते. आपल्या बहिणीसाठी रत्नाकरनी त्यावेळी या लग्नाला नकार दिला. अखेर बहिणही अविवाहित राहूनच स्वर्गवासी झाली. परंतू गिरीजाआत्या आणि रत्नाकरकरकाकांचं लग्न मात्र ती हयात असतानाच झालं. यालाच म्हणतात नियतीचा खेळ.

No Picture
कथा

ते त्रिकोणी कुटुंब (एक सत्यकथा)

Category:

 

नियती मात्र या कुटुंबावर पहिला आघात करण्याला सिद्ध झाली होती. २००६ साली ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चंदू आजोबा आश्चर्यकारकपणे वाचले. अगदी नेमकं सांगायचं तर त्या पहिल्या वर्गाच्या डब्यात ते एकटेच वाचले होते. स्फोटामुळे कानाना प्रचंड दडे बसले होते , रक्त येत होतं , आजूबाजूची अंगावर शहारे आणणारी परिस्थिती पाहून मनावर प्रचंड आघात झाला होता.