C-गजानन वामनाचार्य
आडनावाची गरज का ?


Category:
लेखसंग्रहकुलनाम, आडनाव, सरनेम, फॅमिली नेम, लास्ट नेम वगैरे शब्दांनी परिचित असलेले कुटुंबाचे नाव हे जगभर आवश्यक समजले जाते आणि बव्हंशी प्रत्येक कुटुंबाला असतेच असते. व्यक्तीची आणि कुटुंबाची ओळख म्हणून कायदेशीर दस्तअैवजात किंवा कागदपत्रात नोंदी करण्यासाठी आडनाव ही अेक आवश्यक बाब आहे.
काही गोमंतकीय आडनावं
Category:
लेखसंग्रहमडगाव (गोवा) येथून, ‘गोमन्त कालिका’ नावाचं मासिक प्रसिध्द होतं. त्यात दैवज्ञ ब्राम्हण समाजाची खूप माहिती प्रसिध्द होत असते. जगन्नाथ अुर्फ नाना शंकरशेट आणि नाथमाधव (द्वारकानाथ माधव पितळे, १८८२ ते १९२८ .. केवळ ४६ वर्षे) या दोन व्यक्ती, दैवज्ञ ब्राम्हण समाजातल्या सुप्रसिध्द व्यक्ती समजल्या जातात. या मासिकात मला, खूप मराठी ‘कर’ भावी आडनावं आढळली. तसेच मुलांमुलींचीही, नादमधूर नावं आढळली. दैवज्ञ म्हणजे दैव-ज्ञ … दैव .. नशीब जाणणारे असा अर्थ होतो.
मराठी आडनाव – अणे
Category:
लेखसंग्रहलोकनायक बापूजी अणे यांचे मूळचे आडनाव अन्नमवार असे होते. वार सोडून, त्यांच्या पूर्वजांनी अणे हे मराठीशी जुळणारे आडनाव धारण केले.
मराठी आडनाव कोशाची सुरूवात
Category:
लेखसंग्रहमराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याची मला आवड निर्माण झाली. या छंदाला, माझ्या आडनावावरूनच, १९६३ च्या मे महिन्यापासून सुरूवात झाली.
स्थलांतरीत कुटुंबांची आडनावं
Category:
लेखसंग्रहमराठी साम्राज्याच्या अुत्तरेकडील विस्तारामुळं बडोदा, ग्वाल्हेर, अिंदूर, देवास वगैरे संस्थानात हजारो मराठी कुटुंबं स्थयिक झाली आहेत. घरात त्याचं मराठीपण टिकून आहे. पानिपतच्या दारूण पराभवाला 14 जानेवारी 2010 रोजी 250 वर्षे पूर्ण झाली. अेखाद्या घटनेला दारूण अपयश आलं तर त्या घटनेचं पानिपत झालं असा वाक्प्रचारही रूढ झाला आहे.
अपत्यपिढी आणि आनुवंशिकता


Category:
लेखसंग्रहकोणत्याही व्यक्तीत येणारे शारीरिक आणि मानसिक गुणावगुण हे मातापित्यांच्या अनेक पिढ्यांकडून येतात हे आपल्या पूर्वजांच्या बरोबर लक्षात आले होते. हा निष्कर्ष त्यांनी अनुभव आणि निरीक्षणावरून काढला. विज्ञानीयदृष्ट्या आता अगदी निर्विवादपणे सिद्ध झाले आहे की, आनुवंशिक गुणधर्म हे अपत्यपिढ्यांमध्ये, गुणसूत्रांमुळे म्हणजे क्रोमोसोम्समुळे येतात.
पुरूषसत्ताक समाजाची लक्षणे
Category:
लेखसंग्रहगेल्या कित्येक शतकापासून प्रत्येक घराण्याच्या अनेक पिढ्यात पुरूषांचीच मक्तेदारी चालू आहे. अपत्याच्या नावासमोर वडिलांचेच नांव लावले पाहिजे आणि वडिलांचेच आडनाव लावले पाहिजे असा दंडक आहे. पित्याचेच गोत्र मुलाला प्राप्त होते.
आडनावाबद्दलचा अभिमान, जिव्हाळा आणि प्रथा

Category:
लेखसंग्रहआपले आडनाव कसेही असले तरी आपण ते जन्मभर मोठ्या अभिमानाने आपल्या नावासमोर लावतो. आपला समाज पुरूषसत्ताक आहे म्हणून मुलाच्या किवा मुलीच्या नावासमोर वडिलांचे किवा पतीचे नांव आणि वडिलांचे किवा पतीचेच आडनाव लावण्याची प्रथा आहे.