( ही कविता प्राणवायुला समर्पित !)
इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू ।
जरा उसासून थांबू ,शोधू कलेवरांचे तंबू ।।
लाडेकोडे वाढवलेली इथेच तोडू झाडे ।
प्राणवायुचे नरडे दाबून इथेच घालू राडे ।।
इथे ओरपू पाणी आणिक तिथेच टाकू विष्ठा ।
जगण्यासाठी हवी कशाला विकून टाकू निष्ठा ।।
एक विषाणू श्वास संपवी मनीमानसी कैक ।
भयसूचक त्या घंटा नीचा आता तरी त्या ऐक ।।
मरणानंतर सरणासाठी उरली नाहीत झाडे ।
नरकयातना दिल्या तयांना कशी पेटतील हाडे ?
-- डॉ .श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
ही कविता नावासह सर्वत्र पाठवायलाच हवी !
( ही कविता प्राणवायुला समर्पित !)
इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू ।
जरा उसासून थांबू ,शोधू कलेवरांचे तंबू ।।
लाडेकोडे वाढवलेली इथेच तोडू झाडे ।
प्राणवायुचे नरडे दाबून इथेच घालू राडे ।।
इथे ओरपू पाणी आणिक तिथेच टाकू विष्ठा ।
जगण्यासाठी हवी कशाला विकून टाकू निष्ठा ।।
एक विषाणू श्वास संपवी मनीमानसी कैक ।
भयसूचक त्या घंटा नीचा आता तरी त्या ऐक ।।
मरणानंतर सरणासाठी उरली नाहीत झाडे ।
नरकयातना दिल्या तयांना कशी पेटतील हाडे ?
— डॉ .श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
ही कविता नावासह सर्वत्र पाठवायलाच हवी !