इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
दिनांक 6 डिसेंबर ….
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन… महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण यात्रेचं जे एकमात्र चित्रीकरण आज जगात उपलब्ध आहे, ते करण्यासाठी एका अवलियाने आपले घर, छापखाना गहाण टाकून हा अमूल्य साठा जतन केला, हे कोणाला माहीत आहे? त्या अवलियाचे नाव आहे…नामदेव व्हटकर.
विद्याताईंच्या (गदिमांच्या पत्नी) काळजातली आठवण जाणून घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.
अनंत लक्ष्मण कान्हेरे आणि वांची अय्यर कर्झन वायलीच्या वधाचे सूत्रधार होते स्वातंत्र्यवीर सावरकर! सावरकरांमागे रीतसर सरकारी ससेमिरा चालू झाला. सावरकरांच्या मोठ्या बंधूना क्षुल्लक कारणास्तव काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आल्यानं क्रांतिकारक चिडीला आले. त्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांचा काटा काढण्याचं ठरवलं. कामगिरी पत्करली एका कोवळ्या मुलानं- अनंत लक्ष्मण कान्हेरे यानं.
ते मला फार लागट बोलले. म्हणाले “तुझी झोपडपट्टीसमोर बसूनबिडी प्यायची सुद्धा लायकी नाही”. मग मी ठरवलं इथून पुढे यांच्याकडून एक पैसासुद्धा घ्यायचा नाही
रसिकहो क्षणभर कल्पना करा की साहिब बीबी और गुलाम हा चित्रपट समजा मराठीत निर्माण झाला असता तर, मीना कुमारी ने आपल्या अभिनयाने अजरामर केलेलं ‘न जाओ सैंयाँ छुड़ा के बैंया’ हे गीत मराठीत कस आलं असतं. हे गीत ऐकत असताना मला नेहमी आठवतं ते पारिजात संगितीकेतल गदिमांनी लिहिलेले गीत… जळते मी, हा जळे दिवा. एका चुकीची दुरुस्ती. पारिजात संगितीकेतल हे गीत रुक्मिणी च्या तोंडी नाही तर सत्यभामेच्या तोंडी आहे. चुकीबद्दल क्षमस्व.
भारतीय संगीताच्या तालावर Perfection चा एक नमुना. लय आणि तालाकडे बघा. भारतीय नसूनही किती सुंदर परफॉर्म केलंय दोघांनी !
https://youtu.be/kFgEoB5-75Y
भारतीय संगीताच्या तालावर Perfection चा एक नमुना. लय आणि तालाकडे बघा. भारतीय नसूनही किती सुंदर परफॉर्म केलंय दोघांनी !
कोरोना महामारीच्या काळात लस किती महत्वाची आहे हे सर्वशृत आहे. या कवितेत लस मिळविण्यासाठी एक सामान्य माणसाच्या मनात काय भावना आहेत याचं एक भावनिक चित्र उभे करण्यात आलेले आहे.
कोजागरी, जागरण आणि रात्र असा या वेळचा व्हीलॉगचा विषय आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti