नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

आई लवकरच येणार आहे या आशेने ती खिडकीतून येणारी माणसे शोधत होती, गाडी सुरु झाली आणी आई आलेली नाही हे कळताच तिने जे भोकाड पसरले त्या आवाजाने त्याच्या मनावर साधा दयेचा रेघोटा सुद्धा उठला नाही, एसीच्या डब्यात फारच कमी प्रवासी होते, कारण या गाडी सारखी टुकार गाडी कोणतीच नसेल, आणी म्हणूनच त्याने ही गाडी पत्करली होती

नेहमीप्रमाणे समुद्रावर गेलो, संध्याकाळची वेळ होती सूर्य डुबत होता…. माझ्या दृष्टीने वातवरण सुन्न होते….

सुविख्यात वकील श्री. नारायण – (ऊर्फ नानू) प्रभु याला अशी सलगी मुळीच आवडली नाहीं. तो कामात गर्क होता. इतर वकीलांबरोबर कोर्टाच्या प्रतीक्षालयात (Common Room मध्ये) बसून आजच्या कामाचा आढावा घेत होता. त्याची पाठ दाराकडे होती म्हणून कोण हांक मारत होतं ते आधी समजलं नाहीं. त्याने पाठ वळवली आणि त्याला ओळख पटली. इतर वकीलही माना वळवून पाहूं लागले. ।।

अनघा दिवाळी 2021 मध्ये आर. के. सावे यांची प्रकाशित झालेली दिर्घ कथा.

रोज दिवाळी साजरी करणा-यांना दिवाळीत नवीन काय, असा प्रश्न पडतो. ती कशी साजरी करावी, याची त्यांना चिंता पडते. तर दिवाळीतही अंधारात राहणा-यांची संख्या कमी नाही. त्यांच्या उजेडाची काळजी कुणी करावी?

बिपीनच्या मनात पुढचे आराखडे पक्के होते, आपला प्रवास जितका गुप्त राहील तितके त्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे होते. यामुळेच त्याने विमान प्रवास टाळून ५० तासाचा गाडीचा कंटाळा येणारा प्रवास पत्करला होता.

आमच्या समोर ती नवीन नवरी म्हणून रहाण्यास आली असेल मी ८ ते १० वर्षाचा. त्यावेळी टी व्ही वगैरे काही नव्हते . आम्ही मुले-मुली खेळत असू.

विजय आणि यामिनी बाहेर फिरून रात्री उशिरा घरी येतात… घरातील बंद केलेले दिवे सुरु करतात आणि सोफ्यावर बसतात…

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक , बुलडोझर लावून उखडून टाकील , असा माणूस जन्माला यायचाय . हिंमत असेल तर हात लावून दाखवा त्यांच्या स्मारकाला.
“राष्ट्रीय स्मारकांचा विध्वंस करून , या देशाच्या परंपरेशी , संस्कृतीशी , ज्ञानाशी आणि मातीशी गद्दारी करणाऱ्या देशद्रोह्यांनो , तुमचा मेंदू सडलाय . स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्यासारखे असंख्य क्रांतिकारक या देशात होऊन गेले म्हणून तुम्ही जिवंत आहात . त्यांनी सुखासीन आयुष्याचा त्याग केला म्हणून तुम्ही आज सुखासीन आयुष्य जगत आहात . त्यांची चरित्रं वाचा . त्यांचा त्याग , त्यांनी सोसलेल्या यातना , ऐहिक सुखाकडे पाठ फिरवून अवघ्या देशाचा केलेला विचार , संघर्षमय आयुष्य हे सगळं माहितेय तुम्हाला ? हिंदुत्व , सामाजिक समरसतेसाठी केलेले प्रयत्न , हिंदुस्थानच्या सीमा आणि त्यांचे संरक्षण याबद्दल केलेला विचार , देशाच्या एकात्मतेसाठी मांडलेल्या संकल्पना … यातलं काय माहितेय तुम्हाला ? परदेशातून येणाऱ्या अमाप पैशावर जगणारी तुम्ही बांडगुळे आहात , तुम्हाला काय माहिती सावरकर , काय माहिती देशहित ? तुम्ही सगळे देशाला लागलेली वाळवी आहात . देश आतून पोखरत जाणारी वैचारिक , षंढ वाळवी . भ्रम फैलावणारी वाळवी . संपत चाललेली पण संपता संपता देशाचं , समाजाचं , संस्कृती , किती नुकसान करता येईल याचा विचार करणारी वाळवी . त्यासाठी वापरत असलेल्या शब्दांना लाखो करोडो रुपये मलिदा मिळतोय , याच निर्बुद्ध जगण्यात स्वतःचं सुध्दा नुकसान होतंय हे विसरून गेलेली बधीर वाळवी”. तो क्षणमात्र थांबला .

इंग्रजीतील सुप्रसिध्द कथालेखक ओ हेन्री याच खरं नाव विल्यम सिडनी पोर्टर.
विश्वास बसणार नाही पण त्याला पैशांच्या अफरातफरीच्या आरोपावरून तुरूंगात रहावं लागलं होतं.
त्या काळांत त्याने कथा लिहितांना ओ हेन्री हे टोपण नांव धारण करून आपलं लेखन प्रसिध्दीस पाठवलं आणि पुढे तो याच नावाने लिहित राहिला व प्रसिध्द झाला.
Copyright © 2025 | Marathisrushti