प्रथम रवा चांगला भाजून घ्यावा. एका कढईत तेल तापवत ठेवावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, कडीपत्ता, मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. १ लहान चमचा मीठ घालावे व कांदा चांगला शिजू द्यावा. कांदा नीट शिजला की त्यात रवा घालावा.
दुसर्या भांड्यात पाणी तापवत ठेवावे. रवा थोडावेळ कांद्याबरोबर परतावा. पाणी उकळले की भाजलेल्या रव्यात ओतावे. नीट मिक्स करावे. त्यात साखर व आवश्यकतेनुसार मीठ घालावे. एक वाफ काढावी. अशाप्रकारे तिखट मीठाचा सांजा तयार. यावर सजावटीसाठी आपण कोथिंबीर व खोवलेला नारळ घालू शकतो.
बटाटे चांगले उकडून थंड झाल्यावर सोलावेत. मिरची,आते यांची पेस्ट करावी. बटाटे थंड झाल्यावर किसून घ्यावेत किंवा कुस्करावेत. यात मिरची, आल्याची पेस्ट, जिरे पावडर, चवीपुरते मीठ व बारीक कोथिंबीर घासून चांगले मळावे. हे झाले सारण. कणीक चाळून कणीक व मैदा साधारण घट्ट भिजवून तयार केलेल्या सारणाचे लहान-लहान गोळे करावेत. गोळ्याच्या दीडपट आकाराचे पिठाचे गोळे करून त्यात पुरणाच्या पोळीप्रमाणे सारण भरावे व हलक्या हाताने पराठे लाटावेततव्यावर थोडे-थोडे तेल घालून दोन्ही बाजूंनी पराठे गुलाबी रंगावर भाजावेत.
बासमती तांदूळ अर्धा तास अगोदर भिजवून ठेवावा. कोथिंबीर , मिरच्या व कढीलिंब यांची बारीक करा. तेल गरम करून काजू-वाटाणे टाकून परतून घ्यावे . तांदूळ टाकून परतावे.
सर्व सामग्री मिसळा. पाणी कालवून गरम कणके सारखे मळा. चकलीच्या साच्यात मिश्रण भरून गोल आकारात पिळून गरम तेलात तळा. हवा बंद डब्यात बरेच दिवस साठवून ठेवता येते.
भूलोकमल्ल आणि सत्याश्रयकुलतिलक अशी बिरूदे असणारा राजा सोमेश्वर याचा ‘मानसोल्लास’ अर्थात ‘अभिलषितार्थचिन्तामणि’ हा ग्रंथ. (शतक १२ वे). हा ग्रंथ म्हणजे एक ज्ञानकोशच आहे. राजा सोमेश्वर हा चालुक्य कुलातील राजा असून त्याने स्वत: या ग्रंथाला ‘जगदाचार्यपुस्तक’ असे नाव दिली आहे. राजाचा आहार असा या मांडणीचा विषय असला तरी तत्कालीन पाककृतींचा परिचय त्याद्वारे करून देणे असा या लेखाचा प्रमुख उद्देश आहे. आधुनिक काळात पाकशास्त्र विषयाचे प्रशिक्षण महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थाना उपलब्ध आहे. परंतु १२ व्या शतकात सोमेश्वर राजाने सांगितलेले अन्नाविषयीचे तपशील आजच्या काळातही उपयुक्त आहेत.
तुपावर डाळीचे पीठ खमंग भाजून घ्या. छान वास आला की त्यावर दूध शिंपडून बाजूला ठेवा. मिश्रण कोमट झाले की त्यात पिठीसाखर, वेलदोडे, जायफळ, बेदाणा, काजू घालून मिश्रण कालवा. नंतर त्याचे बेताच्या आकाराचे लाडू वळा. मोदकाच्या साच्याला पातळ तुपाचा हात फिरवावा व प्रत्येक लाडू साच्यातून काढावा. आकाराच्या नाविन्यामुळे छान दिसतात.
कोथिंबीर निवडून घ्या. लहान, कोवळी देठे पण घ्या. कोथिंबीर धुवा आणि चाळणीत ठेऊन निथळून घ्या. पाणी निथळल्यावर कोथिंबीर चिरून घ्यावी. तेल आणि पाणी वगळता कोथिंबीर आणि सर्व साहित्य परातीत एकत्र करा. चांगले मिक्स करावे. १ टेबलस्पून तेल गरम करून मिश्रणात ओतावे. चमच्याने मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालावे आणि छान एकत्र मळून गोळा बनवा. त्याचे २ भाग करून लंबगोल आकाराचे गोळे/उंडे करा. भांड्याला आतून थोडे तेल लाऊन घ्या, त्यात ते गोळे ठेवा.
प्रथम बेबीकॉर्न शिजवून घ्या. मैद्यामध्ये पाणी आणि मीठ मिसळून मिश्रण तयार करा. बेबी कॉर्नचे दोन तुकडे करून मैद्याच्या मिश्रणात बुडवा आणि तेलात तळून घ्या. कढईत एक चमचा तेल गरम करून उभी कापलेली हिरवी मिरची घालून परतून घ्या. यात सर्व भाज्या, मीठ, अजिनोमोटो व शेजवान सॉस घालून चांगले परतून घ्या.
कोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून कपड्यावर कोरडी करायला थोडा वेळ पसरा. एका परातीत कोरडी झालेली कोथिंबीर, १ वाटीभर डाळीचे पीठ, मिरची, आले, लसूण वाटलेली गोळी, मीठ व रवा, चिमूटभर सोडा टाकून कालवा. कढईत तेल तापवून तयार पिठाचे चपटे वडे करून खरपूस तळा.
तांदूळ धुवून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावेत. दूध तापवून त्याला उकळी आली की त्यात तांदूळ घालावे व सतत ढवळत राहावे.
सुमारे तीस मिनिटे मंद गॅसवर शिजवावे. तांदळाचा दाणा हाताने दाबून पाहावा. मऊ झालेला असला व चटकन दाबला गेला की साखर घालावी व पाच मिनिटे आणखी चुलीवर ठेवून ढवळत राहावे. फार दाट वाटल्यास कपभर दूध घालावे. खाली उतरवून खीर गार झाली की त्यात वेलचीपूड व काजू, बेदाणे घालावे. ही खीर जेवणानंतर पुडिंगसारखी बाऊलमध्ये घालून खायला द्यावी.
Copyright © 2025 | Marathisrushti