(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • पांडुरंग शास्त्रीं आठवलेंचा एक विचार

    स्वाध्याय परिवार… मॅगसेसे, टेम्पल्टन, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पद्मविभूषण पुरस्कार. असंख्य कार्यकर्त्यांचं पाठबळ.
    पांडुरंग शास्त्री आठवले ह्यांच्याबद्दल लिहावं तितकं कमीच आहे !!
    त्यांच्या नंतर आजही असंख्य राबते हात देशभर काम करत आहेत.
    त्यांचे विचार हा संपूर्ण भारतवर्षाला जोडणारा एक धागा आहे.
    पांडुरंग शास्त्री ह्यांच्या विचारात काय बळ आहे? त्यांचे विचार कोणती किमया करू शकतात ?
    विनय नावाच्या एका तरुणाचा हा किस्सा आहे. तो मला पहिल्यांदा भेटला तेव्हा गप्पा मारता मारता म्हणाला,
    ” दादा, मी बोटीवर पोर्टर म्हणून काम करतो. बोट जगभर फिरते. त्यामुळे अनेक महिन्यांनी घरी येतो.

  • आत्महत्त्या एका संवेदनशील शेतकऱ्याची

    प्रकाशन दिनांक :- 01/06/2003
    गुणवंतरावांच्या मृत्यूने नेहमीच चर्चिल्या जाणाऱ्या आणि केवळ चर्चिल्याच जाणाऱ्या प्रश्नांचे मोहोळ पुन्हा एकदा उठू पाहत आहे. प्रामाणिक आणि संवेदनशील माणसाला कर्तृत्ववान बनण्याचा अधिकार या समाजाने, शासनाने नाकारला आहे काय? यशाचे शिखर गाठणारा एक नंबरचा मार्ग आम्ही बंद केला आहे काय?

  • दारिद्र्य कल्पनेचेही

    प्रकाशन दिनांक :- 14/12/2003
    आपला देश गरीब आहे, असे आपण म्हणतो, सगळेच म्हणतात. स्वत:च्या नाकर्तेपणाला गरिबीच्या गुळगुळीत आवरणाखाली झाकण्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्यात आपण बऱ्याच प्रमाणात यशस्वीसुद्धा झालो आहोत. 'गरीब' या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ हेच सांगतो की, एखाद्या विवशतेमुळे, बाह्य संकटामुळे आलेली ती एक अपरिहार्य अवस्था आहे.

  • नियंत्रण की मुस्कटदाबी?

    शासनव्यवस्था कुठलीही असो, ती कोणत्याही एकाच घटकावर अवलंबून नसते किंवा त्या व्यवस्थेच्या सुचारूपणाला कोणताही एकच घटक जबाबदार नसतो. अगदी हुकुमशाही असली तरी हुकुमशहाला सैन्याची, मुलकी अधिकाऱ्यांची मदत घ्यावीच लागते. परस्परांशी संबंधित अशा अनेक घटकांनी मिळूनच कोणतीही शासन व्यवस्था प्रभावीपणे कार्य करू शकते, यशस्वी होऊ शकते. देशात किंवा राज्यात जेव्हा अराजकाची स्थिती निर्माण होते, तेव्हा दोष त्या व्यवस्थेचा, (मग ती कुठलीही असो) नसतो. त्या व्यवस्थेला संचालित करणाऱ्या एखाद्या प्रभावी घटकाला हानी पोचल्यामुळे, त्याचा सरळ परिणाम व्यवस्थेच्या संचालनावर होऊन अराजक निर्माण झालेले असते.

  • कोंडी झालेला उध्वस्त भारत

    प्रकाशन दिनांक :- 30/11/2003
    एखाद्या गोष्टीचे यथार्थ, वस्तुनिष्ठ मूल्यमापन करायचे असेल तर केवळ त्या गोष्टीच्या बाह्यरंग, रूप, आकारावरून कधीच करता यायचे नाही. तसा प्रयत्न केला तर हाती येणारा निष्कर्ष हमखास चुकू शकतो. एखादे साधे बीज असेल तर ते सकस आहे, चांगल्या प्रतीचे आहे, त्याचा वाण उत्तम आहे, हे केवळ ते बी हातात घेऊन सांगता येणार नाही.

  • सैनिकांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या सुमेधाताई

    आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्यासाठी झगडावं लागलं नाही. मात्र, मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून आपण कायम प्रयत्न करतो. खासकरून सीमारेषेवर तैनात असलेले सैनिक भारताचं रक्षण करतात, स्वातंत्र्य जपतात. मग ह्या सैनिकांसाठी काय करता येईल हा विचार सुमेधाताई चिथडेंच्या मनात आला आणि त्यांनी सियाचीन ह्या जगातील सर्वात उंच रणभूमीवर सैनिकांसाठी ऑक्सीजन प्लँट उभा केला. कारण शत्रूपासून कायम धोका असलेल्या सियाचीनमध्ये ऑक्सीजन नाही. त्याची उंची इतकी जास्त आहे की तिथे सज्ज असलेल्या सैनिकांना प्राणवायू मिळत नाही. म्हणून सुमेधाताईंनी तिथे ऑक्सीजन प्लँट उभा करून दिला.

  • तुम्हाला काय आहे… मुलगा? की रेसचा घोडा

    आपण मुलांना खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी अनेक क्लासेस लावतो. ज्यामुळे मुले रेसमध्ये ढकलली जातात आणि रेसचा घोडा बनतात.
    कसं ते सांगत आहेत निरेन आपटे.
    एक तरुण interview रूम मध्ये बसला होता. समोर तीन professionals चष्मा आणि tie लावून बसले होते.
    Executive engineer ने तरुणाकडे पाहून विचारले, “Tell me , जिथे खूप पाउस पडतो, तिथे जास्त प्रमाणात काय निर्माण होतं?”

  • सावधान श्रीकृष्ण जिवंत आहे

    कृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!
    एक बाप मुलाला म्हणाला, ” आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ

  • छोटीशीच; पण… खूप महत्त्वाची!

    प्रकाशन दिनांक :- 21/09/2003
    राघोबा दादांनी नारायणराव पेशव्यास 'धरावे' असा लिखित आदेश गारद्यांना दिला. तो आदेश गारद्यांच्या हाती पडण्यापूर्वी आनंदीबाईनी 'ध' चा 'मा' केला आणि शनिवारवाड्याच्या भिंतींनी अनुभवला क्रौर्याचा भीषण थरार! नारायणरावांच्या प्राणांतिक किंकाळ्यांनी अवघी पेशवाई हादरली.

  • नवरंगी साड्या – संस्कृती की मार्केटिंग ?

    नवरात्रीच्या नऊ रंगाचे कपडे नऊ दिवस घालायचे आणि फोटो काढून पाठवायचे. एक मजेचा भाग म्हणून छान वाटतं. पण ही काही परंपरा / धार्मिक रीत आहे का? अजिबात नाही. फेसबुक आणि सोशल मीडियाच्या काळाआधी म. टा. / लोकसत्तेच्या पुरवणी मधून नवरात्रीचे नऊ रंग छापून येऊ लागले. त्याबरोबर वेगवेगळ्या ऑफिसेस मधले ग्रुपफोटो छापायला लागले. प्रसिद्धी मिळाल्याने अजूनच हे प्रस्थ पसरत गेले.

    मन सहाजिकच भूतकाळात गेले. आई आजी कडे होत्या का एवढ्या साड्या आणि त्या ठेवायला मोठे वॉर्डरोब. घरात एक दोन कपाटं, त्यातले १-२ कप्पे मिळायचे. त्यात ५-६ नेहेमीचे कपडे,२-४ ठेवणीतले. त्यात नऊ रंगाचे कपडे मिळणं केवळ अशक्य. नवरात्रीतला भोंडला, सोसायटी/गल्लीतला रोजच्या कपड्यातला गरबा, अष्टमीला देवीचे दर्शन ह्या कशालाच पैसे लागत नसतं पण आनंद, भक्तीभाव, उत्साह हमखास असे.