हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. या व्रता दरम्यान, सूर्य, सूर्यपुत्र यम व त्याची बहिण षष्टी हिचे पूजन केले जाते.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) मते धूम्रपान आणि तंबाखूमुळे दरवर्षी 7 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो.
२९ मार्च १९३० रोजी ’प्रभात’चा ’खूनी खंजीर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील तस्ते गल्लीजवळच्या इमारतीत प्रभात फिल्म कंपनीची स्थापना १९२९ झाली. व्ही. शांताराम, फत्तेलाल शेख, केशवराव धायबर, सीताराम बी. कुलकर्णी व विष्णुपंत दामले या तत्कालीन चित्रसृष्टीतील धुरीणांनी मोठे ध्येय घेऊन ही कंपनी उभारली. बुद्धिमत्ता, पवित्रता, शालीनता, सौंदर्यता, कलात्मकतेचे बळ घेऊन नवे स्वप्न साकारण्यासाठी उगवत्या सूर्याकडे पाहून तुतारी फुंकणारी महिला असे कंपनीचे बोधचिन्ह अजरामर झाले. याच तुतारीच्या निनादाचे बळ घेऊन येथे अयोध्येचा राजा, गोपालकृष्ण, खुनी खंजीर, राणीसाहेब व बजरबट्ट उदयकाल, चंद्रसेना, जुलूम अशा मूकपटाची निर्मिती येथे झाली. खुनी खंजीरच्या छायाचित्रणाची त्यावेळी बरीच तारीफ झाली होती.
कालांतराने १९५२ मध्ये प्रभात कंपनी पुण्याला स्थलांतरित झाली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शारीरिक आणि मानिसक समस्यांपासून दिलासा देण्यात ॲक्युप्रेशर थेरेपीही खूप फायद्याची आहे. मात्र, शरीराच्या योग्य सांध्यावर ॲक्युप्रेशर केले तरच लाभ मिळते.
प्रसार भारतीच्या अखत्यारीत असलेल्या या स्टेशनचा पोहोच चांगला असल्याने ते चांगलेच लोकप्रिय बनले.
१८६५ मध्ये अमेरिकेतील सिव्हिल वॉर संपले. कापसाच्या किमती गडगडल्या व शेकडो व्यापाऱ्यांचे दिवाळे निघाले. आर्थिक संकटांनी हाहाकार उडाला. सांपत्तिक स्थितीतील हा चढउतार पाहिल्यावर परमहंस सभेतील जुनीमंडळी पुन्हा उत्साहाने कामाला लागली. १७ डिसेंबर १८६६ रोजी डॉ. आत्माराम पांडुरंग यांच्या घरी बाळ मंगेश वागळे, भास्कर हरी भागवत, नारायण महादेव ऊर्फ मामा परमानंद, सर्वोत्तम सखाराम मानकर, तुकाराम तात्या पडवळ, वासुदेव बाबाजी नवरंगे इत्यादी मंडळी उपस्थित राहिली. ह्या बैठकीमध्ये सामाजिक सुधारणेच्याच विषयाचा ऊहापोह झाला व विधवाविवाह, स्त्री-शिक्षण या कार्यास उत्तेजन द्यावे; बालविवाहाची चाल बंद व्हावी यासाठी प्रयत्न करावा, जातिभेदाची चाल वाईट असल्याचे उघडपणे प्रतिपादावे इत्यादी विचार झाला. परंतु ह्यासंबंधी झालेल्या नंतरच्या सभांमध्ये ऐहिक कल्याणावर विशेष दृष्टी ठेवून ही कार्ये हाती घेण्यापेक्षा मनुष्याचे ह्या जन्मी मुख्य कर्तव्य जे परमार्थसाधन त्याकडे विशेष दृष्टी ठेवली पाहिजे हा विचार कायम प्रार्थनासमाजाच्या स्थापनेचा निश्चय करण्यात आला.
पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा कमी होत आहे. २००४ मध्ये दक्षिण भारतात जी त्सुनामीची लाट आली त्यामुळे फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंदनी कमी झाला. पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चालल्याने ठरावीक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय घडीत लिप सेकंद ॲडजेस्ट करावा लागतो. १९७२ मध्ये सर्वात प्रथम लिप सेकंद ॲडजेस्ट केला होता. इंटरनॅशनल अर्थ रोटेशन ॲगन्ड रेफरन्स सिस्टीम सर्व्हिस ही आंतरराष्ट्रीय संघटना लिप ॲडजेस्ट करते. ३० जूनच्या मध्यरात्री किंवा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री लिप सेकंद ॲघडजेस्ट केला जातो.
१३ डिसेंबर २००१ हा दिवस संसदेसाठी इतर दिवसांप्रमाणे नव्हता. संसदेचे अधिवेशन सुरु होते. संसदेत शवपेटी घोट्याळ्यावरुन गरमागरम चर्चा सुरु होती. गदारोळामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. त्यानंतर जे काही झाले ते त्यावेळी ज्यांनी-ज्यांनी पाहिले ते आजही विसरु शकलेले नाहीत.
२७ डिसेंबर १९११ रोजी जन-गण-मन हे गीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कलकत्ता येथील कार्यक्रमात सर्वात पहिल्यांदा गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत रचलेले हे गीत भारताचे राष्ट्रगीत होईल असे त्यावेळी कोणाला वाटले ही नसेल.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या५साठी साप्ताहिक ‘नवयुग’ कमी पडू लागले म्हणून शिवाजी पार्कच्या सभेत मे १९५६ मध्ये सेनापती बापट यांनी आचार्य अत्रे यांना सुचवले की, लढा यशस्वी करायचा असेल तर एक दैनिक सुरू करा. आचार्य अत्रे यांनी घोषणा केली, ‘१५ नोव्हेंबरपासून ‘मराठा’ नावाचे दैनिक सुरू करेन.’
Copyright © 2025 | Marathisrushti