Articles by sachingadkari
स्मरणगाथा : ४
Category:
साहित्य - ललितपुस्तक पर्यावरण विषयावरचं होतं .
पण गोष्टीवेल्हाळ भाषा , अवतीभवतीच्या खोडकर , शंकेखोर आणि एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्या मुलांचे यथार्थ वास्तववादी चित्रण त्यातून उमलत जाणारी , औत्सुक्यपूर्ण कथा , मनोरंजनाबरोबर मुलांच्या पर्यावरणीय जाणिवांचा मांडलेला विचार आणि कुतूहल वाढवणारी आशयघन लेखनशैली !
मुलांना आकर्षित करणारं मुखपृष्ठ .
दिवाळी अंक आणि मराठी माणूस
Category:
साहित्य - ललितमराठी भाषेचा, मराठी माणसांचा किंवा महाराष्ट्राचा सर्वात मोठा साहित्योत्सव कोणता? यात मतभेद होण्याची शक्यताच नाही. सर्वांचं एका आवाजात उत्तर येईल – ‘दिवाळी अंक’. या उत्सवाचा ‘दिवाळी मुहूर्त’ कायम आहे हे त्याचं आणखी एक वेगळेपण. मराठीत ‘मनोरंजन’ मासिकाचा पहिला दिवाळी अंक १९०९ मध्ये प्रकाशित झाला. दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषे अक्षर वैभव ! १०६ वर्षे मराठी भाषेचा हा साहित्यजागर होत आहे आणि यापुढेही होत राहील.
प्राचीन भारतांतील विमाने
Category:
लेखसंग्रहकोणत्याही ज्ञानशाखेचा विषय निघाला की, ही शाखा आमच्या पूर्वजांना पूर्णपणें माहिती होती असें सांगणारे कांही लोक भेटतात. तर काहींचें म्हणणे असें असतें की, भारतांत असणारें ज्ञान है परभृत आहे. भारतीयांनी त्यांत स्वतःची अशी कोणतीहि भर घातली नाही. त्यांनी स्वतः काहीहि नवीन निर्माण केलें नाही. विचारांच्या या दोन्ही टोकांपैकी एकांत भारताच्या अभिनिवेशी अतिगौरवाचा भाग असतो, तर दुसऱ्यांतून न्यूनगंडाने पछाडलेल्या दुबळ्या मनोवृत्तीचें दिग्दर्शन असतें. परंतु कोणत्याहि परिस्थितीचें वास्तव ज्ञान हें प्रगतीला पोषक असतें. या वास्तवज्ञानाचा एक भाग म्हणून आज प्राचीन भारतांत असलेल्या काही विमानांचा परिचय घडविण्याचें ठरविलें आहे.
कल्हईवाला – जुनी आठवण
Category:
साहित्य - ललितस्टीलच्या, हिंडालियमच्या भांड्यांची चलती असली तरी या जमान्यात पितळी भांडीसुद्धा वापरली जातात. साहजिकच कल्हई करणे आले. दारी येणारा कल्हईवाला तात्काळ सेवा देणारा असतो.
कुतुब मिनार – भारताच्या इतिहासावरील दरोड्याचा साक्षीदार
Category:
लेखसंग्रहतथाकथित मशीद म्हणून दाखवल्या जाणाऱ्या या इमारतीच्या बाजूला एक बांधकाम उभे आहे त्याला ‘सराई’ म्हटले जाते. ‘सराई’ हा हिंदी-उर्दू शब्द सोडला तर त्या इमारतीत ‘मुस्लीम’ म्हणण्यासारखे काहीच नाही. ‘सराई’ म्हणजे यात्रेकरू किंवा प्रवाशांसाठी बांधलेला निवारा – धर्मशाळा. आपण महाराष्ट्रात त्यांना ‘ओवऱ्या’ म्हणतो.
नावात काय नाही?
Category:
लेखसंग्रहभारतात गाजणारा एक विषय आहे तो म्हणजे नामांतराचा, जे नाव सध्या आहे ते बदलण्याच्या मागणीचा. हे नाव कशाचेही असू शकते. रस्ता, चौक, बाग, शहर, जिल्हा, राज्य यांचे वा बस स्टँड, रेल्वे स्टेशन, विमानतळ यांचे वा विद्यापीठ, आस्थापना यांचे. स्वतःचे नाव बदलणारांची दखल बाकीच्यांनी घ्यायची गरज नसते. पण या सार्वजनिक ठिकाणांची नावे बदलण्यासाठी जनमताचा कौल घ्यावा लागतो. नाव बदलण्याचा आग्रह धरणारे ‘नावात काय नाही’ ची वाट धरणारे असतात.
दिवस आणीबाणी विरुद्धच्या लढ्याचे!
Category:
साहित्य - ललितकाँग्रेस सरकारने आणिबाणी लावली त्यावेळी मी बी.एस.सी फायनल ला होतो. माझा मित्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता डॉ. गिरीश वेलणकर हा एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला होता. आम्ही दोघांनी आपापल्या घरी सांगितले की या वेळी आम्ही ही परीक्षा देणार नाही. आणिबाणी विरुद्धच्या या लढ्यात यापुढे आम्हाला अटक किंवा काहीही होऊ शकते.
लाल माकड
Category:
लेखसंग्रहएकदा एक शिष्य आपल्या गुरुंना म्हणतो की मला असा एक प्रभावी मंत्र द्या ज्याच्यामुळे आत्मशांती लाभेल. गुरु म्हणतात की रोज तुझ्या आराध्य दैवतेचा नामजप कर आणि दुसरे कोणतेही विचार मनात येणार नाहीत याची काळजी घे. विशेषतः लाल माकडाचा विचार तर अजिबातच करू नकोस. आत्मशांतीचा इतका सोपा मार्ग कळल्यावर शिष्य समाधान पावला. त्याच दिवशी तो जपाला बसला.तेव्हा त्याला आठवले की लाल माकडाचा विचार मनात अजिबात आणायचा नाही.