चार’ची गाथा …

आज ४ तारिख... चार (४) या आकड्याची आणखी गंमत बघा.....

थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे !

चारची खरी बाजू ' चार ' दिशेत
आहे !

' चार ' खांबांशिवाय घर बांधता येत नाही.

' चार ' गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.

' चार ' चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर ' चार ' बोटे उमटल्याशिवाय राहत नाहीत.

' चार ' शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली ' चार ' आवाज काढण्या सारखेच असते.

चौघे म्हणजे जणू ' चार ' वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात.

' चार 'चा 'वर्ग' केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.

"चार"च्या 'वर्गा'स पुन्हा "चार"ने गुणले की जगातल्या सर्वात 'बुद्धि'मान खेळातले चौसष्ट घरांचे 'बळ' मिळते !

यांची टीका ही ' चौफेर ' असते.
यांचे फटके म्हणजे ' चौकार ' असतात !

चारचे सामर्थ्य देवीच्या ' चार ' भुजांसारखे असते अन पावित्र गाईच्या ' चार ' पावलांसारखे असते...

ज्या विहिरींचे पाणी शेतकरी पिकाला पाजतो ती सुद्धा कमीत कमी ' चार ' परस खोल असावीच लागते.

' चार ' वाफे असल्याशिवाय मातीत बांध घालता येत नाहीत.

' चार ' पाकळ्या असल्याशिवाय फुलाला शोभा येत नाही !

जगातल्या ' चौघां 'चेही असेच असते. यांनी ' चार ' शिव्या दिल्या शिवाय जगाला शहाणपण सुचत नाही.

अन ' चार ' गोष्टी हिताच्या सांगितल्याशिवाय सुख दुःखे उमजत नाहीत.

ज्या घरात आपण राहतो तेदेखील ' चौसोपी ' असल्याशिवाय त्याला रुबाब येत नाही !

चौसोपी घराबाहेर ' चारचाकी ' असली की शान अधिक वाढते !

' चार 'चौघांना विचारल्याशिवाय खरे सत्य समजत नसते.

' चार ' लोकांपासून ' चार ' हात लांब राहिले तर खरे मित्रही कळत नाहीत !

युगे देखील " चार "झाली आहेत. कृत, त्रेता, द्वापार आणि कलीयुग ; यावरून ' चौघां 'चा महिमा जाणावा.

स्वर जरी सात असले तरी सामान्यतः बोलताना ' सारेगम ' कळले म्हणजे संगीत आले असं म्हटले जाते !

आपल्या जीवनाचे आधार देखील ' चार 'च आहेत - दोन हात अन दोन पाय !

वर्ण देखील ' चार ' आहेत. ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य नि शूद्र.

लीप वर्ष देखील ' चार ' वर्षानी येते !

जमीन सुद्धा ' चौरस 'च शुभ समजली जाते.

माणूस हुशार झाला की त्याला ' चौकस ' बुद्धीचा समजलं जातं ...

चारोळीत देखील महाकाव्याचा अर्थ लिहिता येतो, चारोळे खाल्ले की तब्येत सुधारते !

' चार ' ढांगा चालले की मातीचा अंदाज येतो.

' चार ' कडवी वाचली की कवितेची गोडी लागते.

' चार ' संवाद ऐकले की नाटके पहावीशी वाटतात.

' चार ' घास खाल्ले की पोट भरल्यासारखे वाटते.

' चार ' घटका लवंडले की आराम मिळाल्या सारखे वाटते.

' चार ' वाती प्रज्वलित केल्या की मनातला अन घरातला अंधार दूर होतो.

' चार ' पुस्तके वाचल्याशिवाय ज्ञानाची ओढ लागत नाही.

मंगलकार्य साजरे करताना सनई बरोबर ' चौ 'घडे वाजल्याशिवाय रंगत कसली ती येत नाही !!

' चार ' वाईट जर एकत्र आले तर मात्र ती चांडाळ 'चौकडी' होते.

' चार ' चांगले लोक एकत्र आले तर मात्र इतिहास बदलतो.

इतकेच कशाला चितेवर ' चार ' लाकडे ठेवल्याशिवाय चिता पूर्ण होत नाही.

' चौघां 'च्या खांद्यावर गेल्याशिवाय जीवनातला प्रवास पूर्ण होत नाही.

आयुष्याच्या अंती मातीत चिरनिद्रा घेताना सुद्धा ' चार ' फुट खोल खांदावेच लागते , त्याशिवाय शीणलेल्या जीवाला खरा आराम मिळत नाही !

सरते शेवटी असं म्हणेन की जीवनात जीवाला जीव लावणारे
' चार ' मित्र असल्याशिवाय जीवनाचा अर्थ उमगणार नाही, उमजणार नाही !!



आज ४ तारिख… चार (४) या आकड्याची आणखी गंमत बघा…..

थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे !

चारची खरी बाजू ‘ चार ‘ दिशेत
आहे !

‘ चार ‘ खांबांशिवाय घर बांधता येत नाही.

‘ चार ‘ गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.

‘ चार ‘ चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर ‘ चार ‘ बोटे उमटल्याशिवाय राहत नाहीत.

‘ चार ‘ शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली ‘ चार ‘ आवाज काढण्या सारखेच असते.

चौघे म्हणजे जणू ‘ चार ‘ वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात.

‘ चार ‘चा ‘वर्ग’ केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.

“चार”च्या ‘वर्गा’स पुन्हा “चार”ने गुणले की जगातल्या सर्वात ‘बुद्धि’मान खेळातले चौसष्ट घरांचे ‘बळ’ मिळते !

यांची टीका ही ‘ चौफेर ‘ असते.
यांचे फटके म्हणजे ‘ चौकार ‘ असतात !

चारचे सामर्थ्य देवीच्या ‘ चार ‘ भुजांसारखे असते अन पावित्र गाईच्या ‘ चार ‘ पावलांसारखे असते…

ज्या विहिरींचे पाणी शेतकरी पिकाला पाजतो ती सुद्धा कमीत कमी ‘ चार ‘ परस खोल असावीच लागते.

‘ चार ‘ वाफे असल्याशिवाय मातीत बांध घालता येत नाहीत.

‘ चार ‘ पाकळ्या असल्याशिवाय फुलाला शोभा येत नाही !

जगातल्या ‘ चौघां ‘चेही असेच असते. यांनी ‘ चार ‘ शिव्या दिल्या शिवाय जगाला शहाणपण सुचत नाही.

अन ‘ चार ‘ गोष्टी हिताच्या सांगितल्याशिवाय सुख दुःखे उमजत नाहीत.

ज्या घरात आपण राहतो तेदेखील ‘ चौसोपी ‘ असल्याशिवाय त्याला रुबाब येत नाही !

चौसोपी घराबाहेर ‘ चारचाकी ‘ असली की शान अधिक वाढते !

‘ चार ‘चौघांना विचारल्याशिवाय खरे सत्य समजत नसते.

‘ चार ‘ लोकांपासून ‘ चार ‘ हात लांब राहिले तर खरे मित्रही कळत नाहीत !

युगे देखील ” चार “झाली आहेत. कृत, त्रेता, द्वापार आणि कलीयुग ; यावरून ‘ चौघां ‘चा महिमा जाणावा.

स्वर जरी सात असले तरी सामान्यतः बोलताना ‘ सारेगम ‘ कळले म्हणजे संगीत आले असं म्हटले जाते !

आपल्या जीवनाचे आधार देखील ‘ चार ‘च आहेत – दोन हात अन दोन पाय !

वर्ण देखील ‘ चार ‘ आहेत. ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य नि शूद्र.

लीप वर्ष देखील ‘ चार ‘ वर्षानी येते !

जमीन सुद्धा ‘ चौरस ‘च शुभ समजली जाते.

माणूस हुशार झाला की त्याला ‘ चौकस ‘ बुद्धीचा समजलं जातं …

चारोळीत देखील महाकाव्याचा अर्थ लिहिता येतो, चारोळे खाल्ले की तब्येत सुधारते !

‘ चार ‘ ढांगा चालले की मातीचा अंदाज येतो.

‘ चार ‘ कडवी वाचली की कवितेची गोडी लागते.

‘ चार ‘ संवाद ऐकले की नाटके पहावीशी वाटतात.

‘ चार ‘ घास खाल्ले की पोट भरल्यासारखे वाटते.

‘ चार ‘ घटका लवंडले की आराम मिळाल्या सारखे वाटते.

‘ चार ‘ वाती प्रज्वलित केल्या की मनातला अन घरातला अंधार दूर होतो.

‘ चार ‘ पुस्तके वाचल्याशिवाय ज्ञानाची ओढ लागत नाही.

मंगलकार्य साजरे करताना सनई बरोबर ‘ चौ ‘घडे वाजल्याशिवाय रंगत कसली ती येत नाही !!

‘ चार ‘ वाईट जर एकत्र आले तर मात्र ती चांडाळ ‘चौकडी’ होते.

‘ चार ‘ चांगले लोक एकत्र आले तर मात्र इतिहास बदलतो.

इतकेच कशाला चितेवर ‘ चार ‘ लाकडे ठेवल्याशिवाय चिता पूर्ण होत नाही.

‘ चौघां ‘च्या खांद्यावर गेल्याशिवाय जीवनातला प्रवास पूर्ण होत नाही.

आयुष्याच्या अंती मातीत चिरनिद्रा घेताना सुद्धा ‘ चार ‘ फुट खोल खांदावेच लागते , त्याशिवाय शीणलेल्या जीवाला खरा आराम मिळत नाही !

सरते शेवटी असं म्हणेन की जीवनात जीवाला जीव लावणारे
‘ चार ‘ मित्र असल्याशिवाय जीवनाचा अर्थ उमगणार नाही, उमजणार नाही !!

Author