No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ५३)

Category:

 

विजयने जितका पैसा कमावला तो सुरुवातीला भावंडांच्या शिक्षणात, वडिलांचे कर्ज फेडण्यात आणि त्या नंतर घरखर्चात त्याच्या आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणात आणि त्यांच्या आनंदात खर्च केला. तो खर्च करताना त्याला अपेक्षित होते कि त्याचे कुटूंब त्याच्यासाठी उभे राहील पण प्रत्यक्षता मात्र तसे झाले नाही. तोपर्यत वेळ निघून गेलेली होती. विजय आर्थिक दृष्ट्या अपंग झालेला होता. म्हणजे त्याला करावेसे तर खूप काही वाटत होते पण आर्थिक समस्येमुळे तो काहीच करू शकत नव्हता.

No Picture
साहित्य - ललित

माझे शिक्षक- भाग ५ (प्राध्यापक) (आठवणींची मिसळ १९)

Category:

 

शिक्षक आणि प्राध्यापक ह्यात मुख्य फरक कोणता ?सांगण कठीण आहे.तरी प्राध्यापकाकडून त्या विषयाचा व्यापक आणि सखोल अभ्यास अपेक्षित असतो.बरेचदा वर्गात १२५-१५०च्यावर विद्यार्थी असतात.शिक्षकांनी वैयक्तिक लक्ष देणं अपेक्षित असतं.अभ्यासांतील वैयक्तिक अडचणी प्राध्यापक वर्गात विचारांत घेऊ शकत नाहीत, त्यासाठी त्यांना नंतर भेटावे लागते.टीचर तास किंवा पिरीयड घेतात.प्राध्यापक भाषण म्हणजे लेक्चर देतात.त्या दृष्टीने लेक्चर श्रवणीय करणे, ही कला आहे.सर्व प्राध्यापकांकडे ती नसते.महाविद्यालयांत उपस्थिती घेतात अथवा नाही. त्यामुळे लेक्चर बुडवणे म्हणजे दांडी मारणे सोपे असते.कांही प्राध्यापक असे असतात की त्यांच्या तासाला दांडी मारावीशी वाटत नाही.मला अगदी पहिल्या वर्षापासून युनिव्हर्सिटीपर्यंत दोन्ही प्रकारचे प्राध्यापक भेटले.शिक्षक किंवा अध्यापक आपल्याला विविध विषयांचे ज्ञान देतात, प्राध्यापक आपल्याला आपण निवडलेल्या खास विषयांची सर्वांगीण माहिती देतात.मला विज्ञान व गणित विषयांत गुण अधिक होते.परंतु १८ वर्षे पूर्ण होताच नोकरी बघायची हा विचार मनाशी पक्का असल्यामुळे विज्ञान न घेतां मी कला म्हणजेच आर्टससाठी मी विल्सन ह्या सर्वात जुन्या, चौपाटीला असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला.पहिले एक वर्ष मी तिथे होतो.तिथले कांही प्राध्यापक त्याकाळी प्रसिध्द होते.मराठी साहित्यात समीक्षक म्हणून ओळखले जाणारे वा. ल. कुलकर्णी, संस्कृतचे वेलणकर शास्त्री, संस्कृतचेच गजेंद्रगडकर, स्वतः प्रिन्सिपाल आयरन, रसायनशास्त्राचे दाभोळकर, इ. ची नावे त्याकाळी प्रसिध्द होती.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ५२)

Category:

 

भविष्य कोणालाही बदलता येत नाही. त्याने ते बदलण्यासाठी लाख भर रुपये खर्च केले तांत्रिक आणि मांत्रिकाकडे पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांच्या राहत्या जागेत दोष होता. त्यांनी ती जागा वेळीच सोडायला हवी होती. पण माणसाचा मोह त्याच्या भावभावना आडव्या येतात. त्यात त्याच्या कुटूंबात कोणीही देवाधर्माचे काहीही करत नव्हते. फक्त संकट आले म्हणून त्यांना देवाची आठवण येत होती. त्याच्याकडून कधीही कोणताही दानधर्म घडलेला नव्हता. त्यात त्याच्या कुटुंबात आलेल्या सुना त्याही नास्तिक होत्या.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ५१)

Category:

 

अनामिकेसाठी आपण इतकी वर्षे वाया घालवली याचा आता विजयला पश्चाताप होऊ लागला होता. त्याच्या आयुष्यात आलेल्या इतक्या जणी त्याच्या आयुष्यातून ह्या ना त्या कारणाने दूर गेल्या त्याचे त्याला इतके दुःख झाले नाही जितके अनामिकेच्या जाण्याने होईल… कारण अनामिकेच्या बाबतीत त्याला असे वाटत होते कि त्याचे आणि तिचे जन्मजन्मांतरीचा नाते आहे . त्यामुळे काहीही झाले तरी त्यांचे मिलन हे होणारच ! मग अख्खं जग आडवं आलं तरी ! पण हे तोपर्यतरच वाटत होत जोपर्यत तिच्याही मनात त्याच्याबद्दल ओलावा आहे असे विजयला वाटत होते.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ५०)

Category:

 

काही दिवसापूर्वी विजयने एका किर्तनात एक कथा ऐकली ती कथा अशी होती की एका गावात एक मोठे साधू महाराज येतात.. त्या गावातील लोक खूपच धार्मिक असतात ते त्या साधूना लोक वर्गणीतून एक आश्रम बांधून देतात .. त्यावर ते साधू महाराज मानत विचार करतात या गावाने आपल्यावर उपकार केलेले आहेत त्या उपकाराची परतफेड आपल्याला करायला हवी म्हणून ते त्या गावकऱ्यांना सांगतात तुम्ही मला तुमच्या गावातील पन्नास विद्यार्थी द्या मी त्या पन्नास विद्यार्थ्यांना दोन वर्षे शिकवून ज्ञानी करेन त्याप्रमाणे गावकरी ४९ विद्यार्थी जमा करतात पण एक विद्यार्थी कमी पडत असतो. त्या गावात एक मुलगा असतो तो फक्त खात असतो आणि झोपत असतो. गावकरी विचार करतात ५० वा विद्यार्थी म्हणून ह्याला पाठवू या ! घरी झोपा काढतो त्या ऐवजी तेथे जाऊन झोपा काढेल. ठरल्याप्रमाणे ते साधू त्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करतात तो ५० वा विद्यार्थी आपल्या सवयी प्रमाणे मागे भिंतीला टेकून झोपा काढत असतो.  हा ! हा ! म्हणता एक वर्ष होते .. साधू महाराज त्या मागे बसलेल्या ५० व्या विद्यार्थ्याला  उठवून पुढे आणून बसवायला सांगतात आणि सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणतात,” एक गॊष्ट लक्षात ठेवा ! ईश्वर चराचर आहे …

No Picture
साहित्य - ललित

माझे शिक्षक – भाग ४ (आठवणींची मिसळ १८)

Category:

 

माझ्या जन्माच्या सुमारास माझ्या वडिलांना स्थिर नोकरी नव्हती.वकिली न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि १९३४मधे बेळगावला कोचिंग क्लासेस काढले.त्यांत खूप नुकसान झालं.क्लासेसना चांगले दिवस यायला अजून वेळ होता.त्यानंतर बेळगावचं घर विकून, कर्ज फेडून ते मुंबईस आले.वसईचे वाघ हायस्कूल, लालबाग-परळचे सरस्वती हायस्कूल, खारचे एक हायस्कूल अशा अनेक शाळांमधे त्यांना तात्पुरती नोकरी मिळत असे.पण कायमस्वरूपी कधीच मिळाली नाही.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ४९)

Category:

 

त्याने स्वतःपेक्षा अधिक प्रेम कधीच कोणावर केले नाही अगदी अनामिकावरही नाही… त्याने तिच्या आयुष्यातही कधी ढवळाढवळ केली नाही. तिलाही त्याच्या आयुष्यात कधी ढवळाढवळ करून दिली नाही. यापूर्वी त्याचे जिच्या जिच्यावर प्रेम होते तिच्या आयुष्यातही त्याने कधी  ढवळाढवळ केलेली नव्हती. त्याच्या मनात त्याच्याबद्दल यकिंचितही तिरस्कार नव्हता कारण त्याने तेच केले होते जे त्याला हवे होते.

No Picture
कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ४८ )

Category:

 

विजयला राजकारण कितीही आवडत असले तरी प्रत्यक्ष राजकारणात जाण्यात त्याला रस नाही… सक्रिय राजकारणात जाण्याची संधी त्याला अनेकदा चालून आली होती. त्यावर त्याचे स्पष्ट मत असते मला गल्लीतील राजकारणात रस नाही…  म्हणजे त्याला छोटा विचार करायला आवडत नाही असा आहे.

No Picture
साहित्य - ललित

माझे शिक्षक भाग – ३. (आठवणींची मिसळ १७)

Category:

 

आम्ही होतो, तो मराठीचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. मला वाटतं त्यावेळचे शिक्षक हायस्कूल सोडून गेल्यावर आठवीपासून एक एक वर्ग बंद करायला सुरूवात झाली.
ह्यामुळे आम्हा त्यावेळच्या विद्यार्थ्यांना आणि सरांना एकमेकांबद्दल आपुलकी कायम राहिली तरी एम. ए. हायस्कूलबद्दल ती आपुलकी कधी वाटली नाही.

No Picture
साहित्य - ललित

माझे शिक्षक – भाग २ (आठवणींची मिसळ १६ )

Category:

 

सातवी पर्यंतच्या शिक्षणांत बरेच सहाध्यायी होते. अंधेरीमधे ही एकमेव शाळा होती. ज्या मुलांच्या आईवडीलांना ही शाळा पसंत नसे, त्यांच्या मुलांना ते पार्ल्याच्या पार्ले टिळक विद्यालयांत घालत. अशी मुलं हाताच्या बोटावर मोजण्यासारखी होती.त्यामुळे मध्यम, उच्चमध्यम घरांतली सर्व मुलं इथेच प्रवेश घेत. मला आठवतयं की रत्नमाला या नटीचा मुलगा याच शाळेत होता.नीटनीटका वेष, तेल लावून व्यवस्थित भांग पाडलेले, चापून बसवलेले केस, ह्यामुळे तो उठून दिसायचा.पण स्वभावाने बुजरा असल्यामुळे मुलांच्या चेष्टेचा विषय व्हायचा.