No Picture
शहरे आणि गावे

मुंबई जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावी झाला असला तरीही मुंबई शहरातील अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला होता.

No Picture
शहरे आणि गावे

मुंबई जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन्ही जिल्हे संपूर्ण नागरीकरण झालेले असल्याकारणाने येथे शेतीयोग्य जमीन नाही. भारतातील ऊस ही मुंबईची देणगी असे म्हणता येईल. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात ऊसाची लागवड चालू झालेली नव्हती.

No Picture
शहरे आणि गावे

मुंबई जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

रोजगाराकरता मुंबईत अनेक लोकांचे स्थलांतर झाले आहे अणि सतत होत असते. शहरात ६८% हिंदू, १७% मुस्लिम, ४% ख्रिस्ती व ४% बौद्ध अशी लोकसंख्या आहे. बाकी लोक पारशी, जैन, ज्यू, शीख इत्यादी आहेत. मुंबईत प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जात असून हिंदी, इंग्रजी, कोकणी या भाषादेखील बोलल्या जातात.

No Picture
शहरे आणि गावे

मुंबई जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले हे शहर आहे. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले आहे.

No Picture
शहरे आणि गावे

मुंबई जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

मुंबादेवी याच देवीच्या नावावरुन या शहराला मुंबई असे नाव पडले. या देवीचे मंदिर मुंबईमधील क्रॉफर्ड मार्केट येथे महात्मा फुले मंडईत आहे.

श्री बाबुलनाथ मंदिर मलबार हिल येथील १७८० मध्ये बांधण्यात आलेले श्री बाबुलनाथ मंदिर तेथील शंकराच्या पिंडीसाठी प्रसिद्ध आहे.

No Picture
शहरे आणि गावे

मुंबई जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

भारतातील पहिली रेल्वे मुंबई-ठाणे दरम्यान सुरू झाली. दि.१६ एप्रिल, १८५३ रोजी ती वाहतूकीस खुली करण्यात आली व त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. १८७० मध्ये मुंबईला कोलकाता या महानगराशी, तर १८७१ मध्ये चेन्नईशी लोहमार्गाद्वारे जोडण्यात आले.

No Picture
शहरे आणि गावे

मुंबई जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

मुंबईच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे भारताच्या औद्योगिक, आर्थिक राजधानीचा मान मुंबईस मिळाला आहे. जगातील ‘फॉर्च्यून ४००’ कंपन्यांपैकी चार भारतीय कंपन्यांची कार्यालये मुंबईमधे आहेत. मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात औषधनिर्माण, बांधकाम, अभियांत्रिकी, धातूउद्योग, रेशीमउद्योग, काचसामान, सिनेमा, प्लॅस्टिक, भारत व हिंदुस्थान पेट्रोलियम असे उद्योग आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

मुंबई जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

आजची मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुहा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

परभणी जिल्हा

Category:

 

परभणी परिसराशी अनेक पौराणिक संदर्भ जुळलेले आहेत. संत जनाबाईंच्या विठ्ठलभक्तीचा स्पर्श या जिल्ह्याला झालेला आहे. जिंतूरसारखे जैन भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाण या जिल्ह्यात आहे.शिवाय दक्षिण गंगेचा (गोदावरीचा) काठ लाभलेल्या या जिल्ह्यातून मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यरत आहे.

No Picture
शहरे आणि गावे

नाशिक जिल्हा

Category:

 

धार्मिकदृष्ट्या महाराष्ट्रात प्रसिध्द असणार्‍या नाशिक जिल्ह्याने औद्योगिकदृष्ट्याही मोठी प्रगती साधली आहे. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा सिंहस्थ पर्वातील कुंभमेळा येथे भरतो. पुराण काळात श्री प्रभु रामचंद्र, लक्ष्मण व सीतामाई यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे.