No Picture
शहरे आणि गावे - temp

औरंगाबाद जिल्हयाची भौगोलिक माहिती

Category:

 

औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. अनेकवेळा या जिल्ह्याला संभाजीनगर असेही संबोधले गेले आहे.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ च्या जनगणनेनुसार) इतकी आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात.

No Picture
शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

जगप्रसिध्द अजंठा लेणी – सोयगांव तालुक्यात औरंगाबादपासून सुमारे १०० कि.मी अंतरावरील अजिंठा येथे जगप्रसिद्ध कोरीव लेणी आहेत. ही लेणी रंगीत भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. येथे एकूण तीस लेणी असून, इ.स. पूर्व २०० ते इ.स. ६५० या काळादरम्यान ही लेणी खोदली गेली आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारतातील व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबादहून जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. औरंगाबादमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था योजनापूर्वक रीतीने १९३२ मध्ये सुरू झाली.

No Picture
शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय या जिल्ह्यात ऐतिहासिक काळापासून चालतो आहे. कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात होई.

No Picture
शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

औरंगाबाद हा पर्शियन भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ शाही गादीने वसवलेले शहर असा आहे. औरंगाबाद हे नाव औरंगजेब (इ.स. १६५९ – इ.स. १७०७) ह्या मोगल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले असावे, असे मानले जाते. सातवाहन, वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकुटसारख्या राजघराण्यांनी औरंगाबाद वसवले व आर्थिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केले. या राजवटींबरोबरच यादव, मुघल व निजाम यांच्याही राजवटी या भागाने अनुभवल्या.

No Picture
शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. येथे प्राचीन काळात कण्व ऋषींचा आश्रम होता आणि त्या काळी शकुंतलेने या गणपतीची पूजा केली असे म्हटले जाते.

No Picture
शहरे आणि गावे

अमरावती जिल्हा

Category:

 

चिखलदरा हे विदर्भातील एकमेव गिरिस्थान आणि राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण याच जिल्ह्यात आहे.  संपूर्ण महाराष्ट्रात केवळ याच ठिकाणी कॉफीचे मळे आहेत.  चिखलदरा विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.

No Picture
शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

विदर्भातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच अमरावती जिल्हा कृषीप्रधान असून लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्रावर अन्नधान्याची लागवड केली जाते. ज्वारी हे जिल्ह्यातील एक प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य पिकांखालील क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र ज्वारीखाली आहे.

No Picture
शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

संत गुलाबराव महाराज – प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील माधान या गावी जुलै, १८८१ मध्ये झाला.  रचली. वेदांत, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान-योग-मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन-स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धांत – हे त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होत.

No Picture
शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

अमरावती हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे – अंबागेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. याच जिल्ह्यातील मेळघाट परिसरात चिखलदरा व धारणी या तालुक्यांत आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यातील ८० टक्के लोकसंख्या कोरकू आदिवासींची आहे. तसेच या परिसरात कोलाम, बसोडे, गोंड, माडिया-गोंड, ढाणका यांसारख्या आदिवासी जमातींचेदेखील वास्तव्य आहे.