रत्नागिरी हे महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे भारतातील एक प्रमुख बंदर आहे.
हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्नागिरीचा महत्वाचा व्यवसाय आहे.
रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र कोकण कृषी विद्यापीठाशी जोडण्यात आले आहे.