(User Level: User is not logged in.)

सामान्यज्ञान

Sort By:

  • राष्ट्रवादी काँग्रेस चा २३ वा वर्धापन दिन

    १९९९ आणि २०१४ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले तेव्हा काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले. २००४ आणि २००९ मध्ये आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला मागे टाकले. राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले. काँग्रेसची जागा घेण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत साकार झाले.

  • एक नयनरम्य, देखणा सोहळा.. ‘बीटिंग द रिट्रीट’

    युद्ध सुरू असताना सूर्यास्त झाल्यावर रणांगणावरील सैनिक आपापल्या छावण्यांमध्ये परत जात. यावेळी एक सांगीतिक समारंभ आयोजित केला जाई. त्याला बीटिंग द रिट्रीट म्हणत. हाच सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या समारोपप्रसंगी रायसीना हिल्सवर होतो.

  • पहिल्या स्थानिक सेन्सॉर बोर्डची मुंबईत स्थापना

    ६ ऑगस्ट १९२० साली पहिल्या स्थानिक सेन्सॉर बोर्डची मुंबईत स्थापना झाली. याच बरोबर कलकत्ता, मद्रास, व रंगून स्थानिक सेन्सॉर बोर्डची स्थापना केली गेली.

    पहिले सेन्सॉर प्रमाण पत्र गोउमुंट कंपनी ला देण्यात आले.

    अमेरिकेत हॉलीवूडमध्ये चलचित्राच्या सेन्सॉरशिपची पहिली घटना घडली १८९७ मध्ये जेव्हा जेम्स कॉर्बेट व रॉबर्ट फिट्झसिमन्स यांच्यातील हेवीवेट वजनी गटातील सामना दाखवायला बंदी घातली गेली होती. १९१५ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने म्युच्युअल फिल्म कॉर्पोरेशन वि. इंडस्ट्रिअल कमिशन ऑफ ओहायो यांच्यातील खटल्यात सिनेमा हा तद्दन व्यवसाय असल्याने त्यावर सेन्सॉरशिपला विरोध दर्शविला होता. मात्र, १९१५ ते १९५२ या काळात स्थानिक, राज्य व केंद्र सरकारी पातळीवर सेन्सॉरशिप लागू करण्याचे बरेच प्रयोग झाले. अमेरिकन शासनाने सेन्सॉर बोर्ड स्थापन करू नये यासाठी १९२२ मध्ये रिपब्लिकन पक्षाचा वकील व वजनदार अशा विल हेज याच्या नेतृत्वाखाली प्रोड्युसर्स आणि डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन (PDA) ही संघटना स्थापन झाली जिने शासनाने हस्तक्षेप करण्याआधी स्वतःच काही बंधने घालून घेतली. १९३४ साली जोसेफ ब्रीनच्या नेतृत्वाखाली प्रॉडक्शन कोड अॅडमिनिस्ट्रेशन (PCA) या संघटनेने १ जुलै, १९३४ पासून पुढे येणाऱ्या सर्व सिनेमांना प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले. ब्रीनने हा कायदा अतिशय कडक व त्रासदायक केला.

    तथाकथित नैतिकता व धार्मिकता पाळणे हे अक्षरशः बंधनकारक केले. पुढे १९५२ साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात PCA चा अधिकार खूपच कमी केला. हा निर्णय 'मिरॅकल' या सिनेमाशी संदर्भित खटल्याशी संबंधित असल्याने त्याला 'मिरॅकल डिसीजन' (जादुई निर्णय!) म्हटले जाते. यानंतर 'द मून इज ब्ल्यू' या १९५३ च्या सिनेमात Virgin, Seduce इ. शब्दांचा प्रथमच वापर करण्यात आला. जगभरातील बहुतांश देशांत चित्रपटाच्या सेन्सॉरशिपशी संबंधित कायदे व बोर्ड अस्तित्वात आहेत. भारतात पहिला सिनेमा १९१३ साली आला आणि सेन्सॉर बोर्डाची स्थापना १९२० साली झाली.

    सिनेमेटोग्राफ एक्टच्या खाली सेंट्रल बोर्ड ऑफ़ सेन्सॉर ची १९५२ मधे स्थापना झाली. कालांतराने त्यात काही नवे बदल घडवून १९८३ मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ़ सर्टिफिकेशन असं नामकरण करण्यात आलं. आधी फक्त ‘यु’आणि ‘ए’अशी दोनच प्रमाण पत्रे दिली जायची..नंतर ती ‘यु’, ’यु/ए’, ’ए’ आणि ‘एस’ अशी विविध वयोगटानुसार,प्रेक्षकवर्गानुसार देण्यात येतात.मात्र हे देण्यासोबतच काही सीन्स, शब्द, वाक्यांना सेन्सॉर बोर्ड बिनबोभाटपणे कात्री लावते.प्रदर्शनाला बंदी घालते.

    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मट दिवस (Mutt Day)

    Mutt म्हणजे दोन वेगळ्या जातीच्या संबंधातून निर्माण झालेली प्रजाती. मुळात ती मुद्दाम प्रस्थापित न केलेल्या पण सहज प्रस्थापित झालेल्या संबंधातून निर्माण झालेली प्रजाती असते. हा दिवस मिश्र जातीच्या कुत्र्यांना वर्षातून दोनदा प्रेम करण्यासाठी आणि आनंद साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करतो.

  • लाकडी स्लिपरऐवजी सिमेंटचे स्लिपर घाालणे केव्हा सुरू झाले ?

    दोन रेल्वे रुळांमधील अंतर सारखे राहण्यासाठी स्लिपर्सचा वापर केला जातो. सर्वात प्रथम लाकडी स्लिपर वापरले गेले. डॉग स्पाईक नावाच्या मोठ्या खिळ्यांनी त्यावर रूळ बसविले जायचे. या स्लिपरचे आयुष्य दहा ते १५ वर्षांचे असते. हळूहळू लाकडी स्लिपरऐवजी स्टील स्लिपर अथवा कास्ट आयर्न स्लिपरचाही वापर सुरू झाला.

    जसजशी रेल्वे प्रणालीमध्ये सुधारणा होत गेली तसतसे या गोष्टींचेही आधुनिकीकरण करण्याची जरूर भासू लागली. कारण या स्लिपर्स अतिवेगाने जाणाऱ्या गाडयांसाठी कमकुवत ठरु लागल्या. त्यामुळे भारतीय रेल्वे बोर्डाने तज्ज्ञांची एक समिती नेमली. त्यांनी कॉंक्रिटचे स्लिपर्स वापरण्यासंबंधी सूचना केली. लाकडी स्लिपरऐवजी काँक्रिटचे स्लिपर वापरण्याने जंगलतोड वाचणार होती आणि ट्रकचे आधुनिकीकरण पुढे नेता आले असते.

    अशा तऱ्हेने १९६४-६५ च्या सुमारास हे स्लिपर्स प्रायोजिक तत्वावर वापरणे सुरू झाले. काँक्रिट स्लिपर्सचे आयुष्य ५० वर्षांचे असते. त्यामुळे खर्चात बचत झाली.

    काँक्रिटच्या स्लिपर्समध्येही दोन प्रकार होते. एका प्रकारात दोन ब्लॉक होते. ते एका लोखंडी पट्टीने जोडावे लागायचे. तर दुसरा सलग ब्लॉक लाकडी स्लिपरप्रमाणे असे. नंतर त्यात सुधारणा करुन प्रीस्ट्रेस्ड काँक्रिटच्या स्लिपर्स बनवल्या गेल्या. काँक्रिटच्या स्लिपर्स अधिक ताकदवान असून वजनाने हलक्या असतात.

    १९८०-९० मध्ये सुप्रीम कोर्टाने लाकडी स्लिपर्स वापण्यावर बंदी आणली. त्यामुळे आता भारतीय रेल्वेमध्ये सर्वत्र नव्या स्लिपर्स काँक्रिटच्याच वापराव्या असा दंडक आहे.

    आता हळूहळू मुख्य मार्ग, मग दुय्यम मार्ग अशा तऱ्हेने लाकडी, लोखंडी व स्टील स्लिपर्स काँक्रिटच्या स्लिपर्सने बदलले जात आहेत.

    कोकण रेल्वे ही पहिल्यापासून १५० किलोमीटर वेगाने गाडया जातील अशा हिशेबाने त्यातील सर्व यंत्रणा तयार केली असल्याने तेथे पहिल्यापासूनच काँक्रिटचे स्लिपर्स वापरले गेले आहेत.

    आता भारतात मालाच्या वाहतुकीसाठी दिल्ली-कोलकता आणि मुंबई-दिल्ली असे दोन स्वतंत्र मार्ग बनविले जात आहेत. त्यांच्यासाठी आणखी शक्तिशाली आणि प्रभावी स्लिपर्स लागणार असून तसे ते बनविले जातील.

    लाकडी स्लिपरऐवजी सिमेंटचे स्लिपर घाालणे केव्हा सुरू झाले ?

  • ब्लॅक फ्रायडे

    १९५०-६०च्या दशकात यूएसमध्ये ब्लॅक फ्रायडेला त्याचे नाव मिळाले जेव्हा फिलाडेल्फिया पोलीस विभागाने थँक्सगिव्हिंग आणि आर्मी-नेव्ही गेम्समधील दिवसाचा संदर्भ देण्यासाठी “ब्लॅक फ्रायडे” हा शब्द वापरला. तेव्हा शुक्रवार दिवस होता जेव्हा मोठ्या संख्येने लोकं शहरात खरेदी करत होते आणि गर्दी आणि समोरून येणाऱ्या वाहतुकीला तोंड देण्यासाठी पोलिसांना तासनतास कसरत करावी लागली.

  • विच्छा माझी पुरी करा

    २१ डिसेंबर १९६५ रोजी दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला. वसंत सबनीस यांचे 'विच्छा माझी पुरी करा' हे नाटक म्हणजे सबनीसांच्याच छपरी पलंगाचा वगाचीच रंगावृत्ती आहे. याचे संगीतकार होते तुकाराम शिंदे. ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकाने दादा कोंडके यांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. दादा कोंडके यांनी या लोकनाट्याचा कुठंही प्रयोग लावला तरी तो हाऊसफुल व्हायचा. त्या काळात दादा कोंडके यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या नाट्यनिर्मात्यांच्या नाटकांचा तिकीटांचा दर थोडा चढा असायचा. मात्र दादांनी आपल्या या लोकनाट्यासाठी ‌अगदी ‘जनता दर’ लावला होता. त्यामुळे त्यांचा प्रत्येक प्रयोग लगेचच हाऊसफुल व्हायचा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांच्या लोकनाट्याची ‘प्रॉडक्शन कॉस्ट’ खूप कमी होती. रंगमंचाच्या पाठच्या बाजूला एक पडदा असलं की दादांचं काम होऊन जायचं.

    गायिका आशा भोसले यांनी एकदा ‘विच्छा…’चा प्रयोग पाहिला. फक्त एक माणूस प्रेक्षकांना तब्बल साडे चार तास हसवतो, नुसतंच हसवत नाही तर प्रेक्षक खुर्चीवरून खाली पडायचाच तो काय बाकी असतो. अशाप्रकारचं दृश्य आशाताईंनी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं. हा अनुभव आशाताईंनी प्रख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या कानावर घातला आणि त्यांनाही हे लोकनाट्य पाहण्याचा आग्रह केला. त्यानुसार काही दिवसांनी आशाताई भालजींसह पुन्हा हे नाटक पाहायला आल्या. ते एवढं रंगलं की आशाताईंनी खूश होऊन दादांच्या युनिटमधील सगळ्यांच्या हातामध्ये सोन्याचं ब्रेसलेट घातलं. त्या नंतर गायिका आशा भोसले यांनी त्या काळी ‘विच्छा माझी पुरी करा' ’चा मुंबईतला एकही प्रयोग पाहायचा सोडला नव्हता. याच सुमारास भालजी ‘तांबडी माती’ या चित्रपटाची निर्मिती करीत होते. दादा किती कमालीचे कलाकार आहेत, हे एव्हाना भालजींना समजलं होतं. त्यामुळे त्यांनी या चित्रपटामधील एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेसाठी दादांची निवड केली. दादांनी याच चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

    दादा कोंडके, राम नगरकर यांनी हे नाटक गाजवले होते. राजकीय परिस्थितीवर मार्मिक पद्धतीने भाष्य करत, हळूच चिमटे काढत प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे 'विच्छा माझी पुरी करा' हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यांच्यानंतर अभिनेते विजय कदम गेली काही वर्षे सातत्याने 'विच्छा माझी पुरी करा'चे प्रयोग करत होते. 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्यातील महत्त्वाचे नाटक आहे.

    आजपर्यंत अनेकांनी या नाटकाचे प्रयोग केले गेले. या वगनाट्याची कथा, त्यातील राजकीय भाष्य आज ही ताजे वाटते. एकेकाळी तमाशा,वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु "विच्छा माझी पुरी करा" या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या "विच्छा माझी पुरी करा"या नाटकाने सिद्ध केली आहे! आणि हेच या नाटकाच सर्वात मोठं बलस्थान आहे. एक दोन नव्हे, तब्बल ५२ वर्षे या वगनाट्याने मराठी प्रेक्षकांना झपाटून टाकलं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • जमिनीची धूप कशी होते?

    माती वाहून लुप्त होते, त्याला आपण जमिनीची धूप झाली असे म्हणतो. धूप होत असलेली जमीन अनुत्पादक होत होत शेवटी वांझ बनते. ज्या गतीने निसर्गात जमीन तयार होते. त्यापेक्षा ती खराब होण्याची गती जास्त होते तेव्हा त्या जमिनीवर अवलंबून असलेली जीवनसृष्टी धोक्यात येते.

  • राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह

    अतिपोषण हा आपल्या देशात नवीन, पण वाढती समस्या झाली आहे. अतिपोषण हेसुद्धा एक प्रकारचे कुपोषण आहे.

  • व्हॅलेंटाइन डे

    ‘संत व्हॅलेंटाईन’ याने सम्राटाच्या आज्ञेविरोधात जाऊन प्रेमी युगल असलेल्या सैनिकांची गुप्तपणे लग्ने लावून दिली. सम्राटाला ‘व्हॅलेंटाइन’च्या त्या कृतीचा खूप राग आला. त्याने चिडून जाऊन ‘व्हॅलेंटाईन’ला देहदंड दिला. ज्या दिवशी ‘व्हॅलेंटाईन’ला मरण आले, तो दिवस ‘व्हॅलेंटाईन्स डे’ अर्थात ‘प्रेमदिन’ म्हणून साजरा करण्याची पद्धत युरोपीयन देशात सुरू झाली.