अमरावती जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

विदर्भातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच अमरावती जिल्हा कृषीप्रधान असून लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्रावर अन्नधान्याची लागवड केली जाते. ज्वारी हे जिल्ह्यातील एक प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य पिकांखालील क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र ज्वारीखाली आहे.



विदर्भातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच अमरावती जिल्हा कृषीप्रधान असून लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्रावर अन्नधान्याची लागवड केली जाते. ज्वारी हे जिल्ह्यातील एक प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य पिकांखालील क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र ज्वारीखाली आहे. महाराष्ट्रातील फक्त अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा भागात कॉफीचे मळे आढळतात. तसंच कापूस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी पीक आहे. कापसाखलील क्षेत्र व कापसाचे उत्पादन या दोन्हींचा विचार करता हा जिल्हा राज्यात नेहमीच आघाडीवर असतो.जिल्ह्याचा डोंगराळ भाग वगळता इतर मैदानी प्रदेशात काळी-सुपिक माती मोठ्या प्रमाणावर आढळते. कापूस या पिकासाठी अगदी अनुकूल असलेली ही माती ‘रेगूर मृदा’ किंवा ‘कापसाची मृदा’ म्हणून संबोधली जाते.
अमरावती जिल्ह्यात तूर, गहू, हरभरा, ऊस, मिरची, मोसंबी व विड्याच्या पानांच पीक व उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. नागपूर प्रमाणेच अमरावती जिल्हाही संत्र्यांच्या उत्पादनात राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा या भागातील जंगलांमध्ये चांगल्या प्रतीचे बांबू मोठ्या प्रमाणावर आढळत असल्यामुळे येथे बांबूची लागवड जाणीवपूर्वक केली जाते.

Author