एक परीस स्पर्श ( भाग – ४७ )

(Gold)

आज सकाळी विजय त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी त्याच्या इमारतीतून बाहेर पडला. त्याच्या हातात पाण्याने भरलेल्या दोन बाटल्या होत्या. इमारतीच्या खाली त्याच्या ओळखीचे एक गृहस्थ भेटले त्याच्या हातातील पाण्याच्या बाटल्या पाहून ते म्हणाले, ” ह्या बाटल्यांची हमाली उगाच कशाला करतोस ? त्यावर विजय त्या गृहस्थाला म्हणाला, ” महिनाभर जर मी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन पाणी प्यायलो तर १२०० रुपये होतील आपल्या इमारतीचा मेंटेनन्स फक्त ८०० रुपये आहे. विजयचे हे उत्तर ऐकून तो गृहस्थ गप्पच बसला. विजयने जो विचार केला होता तो विचार त्या गृहस्थाने स्वप्नातही केलेला नसेल. विजय नेहमीच इतरांपेक्षा वेगळा विचार करतो म्हणूनच कोणी त्याच्या तोंडाला लागत नाही कारण त्याच्या प्रत्येक कृतीचे त्याच्याकडे कोणालाही पटेल असे स्पष्टीकरण असते.



Please Login to view Prime Content.