(User Level: User is not logged in.)

व्हिडिओज - temp

Sort By:

  • किशोरताई सांगीतिक संवाद – भाग ६

    शास्त्रीय संगीत शिकवणारी महाविद्यालये किंवा संगीत शिक्षण संस्था यापेक्षा गुरुपरंपरा का महत्त्वाची?, गुरु म्हणजे काय?, शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या शिष्यांनी कसलं भान ठेवलं पाहिजे? याविषयी ताईंनी व्यक्त केलेले विचार आजच्या भागात ऐकू या.

  • क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ३

    भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीयज्ञात स्वप्राणाची आहुती देण्यात महाराष्ट्र अग्रेसर होता. लोकमान्यांचे अग्रलेख सरकार विरुद्ध आग ओकत होते. सार्वजनिक उत्सवातून असंतोषचा वणवा भडकत होता. त्यातूनच प्रेरणा घेऊन चाफेकर बंधुनी रॅन्डचा वध करून मृत्यूला कवटाळलं.

  • क्रांतिवीरांची अमृतगाथा भाग १४-क्रांतीसिंह नाना पाटील

    महात्मा गांधीजीच्या चलेजाव चळवळी नंतरच्या काळात ब्रिटीश सरकारला समांतर अशी यंत्रणा महाराष्ट्राच्या काही भागात उभी करताना क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्वयंपूर्ण कारभाराचं सूत्र पुढे आणलं. त्यासाठी ग्रामीण भागातल्या बहुजन समाजात स्वाभिमान जागृतीचं काम त्यांनी निष्ठेनं आणि अथकपणे केलं. ‘स्वातंत्र्यचळवळीत सर्वसामान्यांचं योगदान’  हीच त्यांची भूमिका होती. परिणामी ‘प्रतिसरकार’ ही संकल्पना अस्तित्वात आली.

  • क्रांतिवीरांची अमृतगाथा- भाग १७ – भगतसिंग

    भगतसिंगाचे हौतात्म्यवेड तर पराकोटीला गेलेलं होतं! संसदभवनात बॉम्ब फेकून स्वतःहून साखळदंड पेहेरून घेतले होते त्याने! कारागृहात जगन्मातेशी स्वरचित कवितेतून त्याने अहोरात्र आळवणी चालवली होती ’मेरा रंग दे बसंती चोला…..भगतसिंग तसा इतर क्रांतिवीरांच्या तुलनेत सुदैवी ठरला. कारण त्याचं  नाव माहीत नाही असा कोणी भारतीय आज सापडणार नाही.

  • आधुनिक ठाण्याचे शिल्पकार सतीश प्रधान

    आधुनिक ठाण्याचे शिल्पकार सतीश प्रधान अनंतात विलीन झाले. ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे नाते निर्माण करण्यामध्ये ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष, पहिले महापौर आणि राज्यसभा सदस्य सतीश प्रधान यांचे मोलाचे योगदान आहे. ठाणे महानगरात त्यांनी उभारलेल्या विविध वास्तू त्यांच्या कार्याची साक्षीदार आहेतच, पण देशातले अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू क्रीडा क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याचे साक्षीदार आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफीत पाहून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करूया

  • किशोरताई सांगीतिक संवाद – भाग ३

    किशोरीताईंची सांगीतिक जडणघडण कशी झाली, विशेषतः गळ्यावर सुरांचे संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी काय केले, विविध वाद्यातून येणारे सूर कंठस्थ करण्यासह राग आणि वाद्य यांच्या संबंधाबाबत त्यांची मतं आज ऐकुया…..

  • गानसरस्वती किशोरी आमोणकर – आदिशक्तीचा धन्योद्गार!

    गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणाऱ्या ‘आदिशक्तीचा धन्योद्गार!’ या पुस्तकाचे प्रकाशन डिसेंबरमध्ये करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी या पुस्तकात किशोरीताईंच्या निमित्ताने प्रतिभावंत कलाकार, त्याची चंचलता, अस्वस्थता, प्रतिभेचं देणं सांभाळताना त्याची होणारी होरपळ यावर मुक्त चिंतन केलं आहे.

  • श्रीकौपीनेश्वराष्टक (शिवस्तुती)

    भगवान श्रीशंकरांच्या स्वयंभू आणि पुरातन मंदिरांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातल्या ठाणे नगरातील श्रीकौपीनेश्वर मंदिर. सुमारे हजार-बाराशे वर्ष पुरातन अशा या मंदिरातील शिवलिंग महाराष्ट्रातले सर्वात भव्य शिवलिंग मानले जाते.

  • क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग १

    भारतीय स्वातंत्र्ययुद्धात 1857चा उठाव, हे क्रांतीचं पहिलं पर्व मानण्यात येतं. बॅरकपूर छावणीत मंगल पांडे यांनी ब्रिटिशांविरुद्धातल्या युद्धाची आरोळी ठोकली. सार्जंट ह्यूसन आणि लेफ्टनंट बॉ यांना यमसदनाला पाठवून सुरू झालेल्या या युद्धामुळे 3 मे 1857 रोजी दिल्ली ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त झाली. दुर्देवाने हा विजय केवळ 133 दिवसांचा ठरला.

  • क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १८ – सूर्यसेन

    क्रांतिकारकांचे तुकडे केल्याने क्रांती नष्ट होत नाही, याचा दाखला दिला बंगाली शेरांनी. क्रांतीचं तिसरं पर्वही बंगालातच तेव्हा सुरू झालं, जेव्हा संपूर्ण चटग्राम शहर क्रांतिकारकांनी जिंकून अस्थायी भारत सरकारची स्थापना केली. सुभाषचंद्रांनी जे स्वयंसेवकांचे जंगी पथक उभारले होते, त्यातूनच‘’बंगाल व्हॉलेंटियर्स’ या क्रांतिदलाचा उदय झाला.

    विनयचंद्र बोस यांन बंगालचं सचिवालायच ताब्यात घेण्यासाठी आक्रमण केलं त्या कहाणीसह महिला क्रांतिकारकांची माहिती या भागात घेऊया. सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मिडिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’

    सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
    मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.